1॥€800९॥४४७५ (_) (२८४९८1६८६०
()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,२२४
0) 192914
२०7१००. ॥४$७--/॥४]
खरगोटी
न्य्खक
रामतनय
किमत '- रुपये
प्रकाशक व व्यवस्थापक रा० ज० देशमुख देशमुख आणि कपनी. १९१ शनवार, पुणे २
संचालक भ० व्यं० देशमुख बी.ए., एल्एल्.बी.
(१) या कादंबरीचे पुनर्मुद्रण, भाषांतर इत्यादि सर्व प्रकारचे हक्क चि. रा. मास्कर गणेश वाळिंबे बी.एससी. बी.ई. (सिव्हिल) ५९४ सदाशिव पुणें २ यांच्या स्वाधीन आहेत.
(२) मुखपृष्ठावरील चित्र दीनानाथ दलाल यांचें आहे.
(३) मुखपृष्ठावरील चित्राचा ब्लॉक बॉम्बे प्रासेस स्टोडिमोंत
केला भाहे. भदरक बना क हा वि. गं. केतंकर व्यवस्थापक २१० मे १९४४
लोकसंग्रह छापखाना, ९२४ सदाशिव, पुणे २
अपण पश्चिका
य
माझे परमपूज्य वडील ती. राजारामबापू आणि मातुश्री आनंदीबाई यांच्या चरणीं खादर समर्पण
रामतनय
२१... 0 २: छि “रौ $११ ९७,600) .£&/ 9४८ “९७४. /९१) “२७
र२ “१० 7५७. /१!). «
७८... /५७.. ७...“
देडापुरव आणि कंपनीची प्रकाशन
"०५०७३३३ / के जह, “हि. ककि के ७०७५००००००
वि. स. खांडेकर फुलें आणे दगड घरट्याबोहेर स्री आणि पुरुष कालिका सायंकाल (आ. २ री.) अविनाश मंदाकिनी सहा भाषणे फुलें आणि काटे पाहले प्रेम (आ. २ री.) जळलेला मोहर क्रॉचवध पांढरे ढग ग. 5्यं. माडखोलकर अबशेष नागकन्या माझी नभोवाणी नवे संसार (जप्न) चेदनवाडी व्याक्तिरेखा ना. धा. ताम्हनकर तात्या भा. १ ला. तात्या भा. २ निवाडे भा. १ ला. ऱचंकमकी बच्चा नवरा
१॥1। १1
“४ “४.८५” ४४४४७४७४७४ ४४७४ ४०” ७-० 0४७ ७७ ७ “७४.०” '४/% ” %५४”१७ “* “४७४
*% ४४% “% ” * €%* “* €%" “ *४४%.”* “% “४ .”?* “0 “४*.”?* “0४% “7७ “7२ “7४% “* “7२ “7२.” “२ 7२”. “५ ५
६ अनेक आशीवाद ३1 चिं. वि. जोशी १ आणखी [चिमणराव (आ.२ र) नवें भारूड व 2 स्टेशनमास्तर र साने गुरुजी १ पनजन्म (आ. २ री.) ३ आस्तिक २1 सोन्या मारात१(आ-. २ री.) २ दत्तू बांदेकर १ सख्याहरी १1 १ नवी आघाडी १1 तूं आणि मी २] श्र. क. अत्रे १ साखरपुडा १॥ लात व,डमय २ द. र. कवठेकर १ अपुरा डाव ३ रेशमाच्या गांठी डु बा. म. जाशा स्माते-ल्हरी २ विचार लहरी २। पु. य. देशपांडे नें जग? २॥
देडापुयव आणि कंपनीचीं प्रकाडरर्न
“५५०५९३२” क” क. कि/ कळ के/२१७७ ० भाई बेके | रा. श्री. जोग १ रोयचरित्र १॥ ) २१ सोंदयेशाध आणि आनंद ८ | , र वि ० ना. म. पटवबधेन प. ले. वि. स. खंडिकर |, ___. नप :)। १ हितपत्र 9 १ काव्यज्योति १; « वि. वि. बोकील आनेदीवाई जयवंत १ बेबीची बहीण ३ १ पारंब्या ; टा ॑ सत्यग्राही । १ ग्रह आणि तारे डा
लक्ष्मण० सरदेसाई १ ढासळलेले वुरूज गै अनैत काणेकर १ धक्यांतून लाल ताऱ्याकडे २
प्रो, वि. ह. कुलकणी २ पिकलीं पानं (दु. आ.) १॥
र ऱ्व्यावताजेत २॥|;) काकासाहेब कालेलकर १ मह्मदेशचा प्रवास १1 ना. ह. आपटे १ फसगत १॥ य, दि पेण्ढरकर | १ प्रापंथ्निक पत्रे डै शाकुतला परांजपे २ घायाळ
४ मि.हेणीची बोरें र वि. म. भुस्कुटे
न स्टलिन 1 कृष्णाबाई मोटे र र
कमलाबाई टिळक
१ मीनाक्षीचे जावन २। १ आकादगंगा २1) र. गो. सरदेसाई रामतनय १? चलती नाणीं २ १ साखर गोटी "१
र २, र लेखकाचं निवेदन
ग्रामीण जीवनावरील “' साखर गोटी ” ही कादंबरी ईशकृपेते वाचकांना सादर करण्यांत सहाजिकच मला आनंद वोटत आहे.
ग्रामीण जीवनावरील माझपा पहिल्या दोन्ही कादंबऱ्यांचे कोतुक महाराष्ट्रांतील जनतेने आपलेपणाने केलें. म्हणूनच मला ही तिसरी कादंबरी लिहिण्यास हुरूप आला. अर्थात् ही कादंबरी प्रसिद्ध होण्याचें मुख्प़ श्रेय गुणग्राही वाचकांकडच आहे.
कारण, माझ्य़ा “ मोहित्यांची मंजुळा ” आणि “ खरा उद्धार ” ह्या दोन्ही कादंबऱ्यांची उत्क्रप्ट व विस्तत परीक्षणे महाराष्ट्रांतील विठ्ठानांनी आणि नियत-कालिकांनीं करून त्यांचा गुणगोरव केला. त्याच कादंबर््यांना ग्रामीण जीवनाचे सुविख्यात अभ्यासक श्री. ना. गो. चापेकर यांनी चिकित्सापूवक आणि विद्दतापूर्ण असा विस्तृत प्रस्तावनारूप आशीर्वादही दिला.
पुण्याच्या डे. व्ह. टा. सोसायटीने ह्या दोन्ही कादंबऱर्यांना भरपूर बक्षिसे दिलीं. ग्रामीण जीवनावरील संग्राह्य आणि वाचनीय ग्रंथ म्हणून सरकार मान्यताही ह्या कादंबर्यांता मिळाली. मुंबई युनिर्व्हासटीनें तर “खरा उद्धार * ही कादंबरी आपल्या इंटरमिजिएट आटंस् व सायन्सच्या परीक्षस * अभ्यास पुस्तक * म्हणून नमली.
ह्यामुळे पहिल्या कादंबरीच्या सव प्रति थोड्या दिवसांत खपून गेल्या. तिचें पुनमुंद्रण करण्याचा विचार करावा लागत आहे. दुसऱ्या कादंबरीच्या तर तीत आवृत्त्या निघाल्या आहेत.
पहिल्या दोन्ही कादंबर्यांतील लेखकाच्या निवेदनांत त्या कादंबर्या लिहिण्यांतील लेखकाचा विशिष्ट हेतु नमूद केला आहे. पण ह्या कादंबरीच्या बाबतींत तसें स्पष्टीकरण करणें स्थलाभावास्तव शक्य होत नाही. मात्र
(२)
ग्रेय एवढच सांगतां ग्रेईल कों, हथा कादंबरींतील बहुतेक घटना अगदीं सध्यांच्या काळच्या आहेत.
माझ्या पहिल्या '* मोहित्यांची मंजुळा ” हया कादंबरीचे कथानक असेंच १९२० ते १९२५ पर्यंतच्या खड्यापाड्यांतील मुख्यतः धम आणि जाती ह्या विषयींच्या अटीतटीच्या भर आंदोलनांतील आहे. ' खरा उद्धार ' ह्याही कादबरीचें कथानक १९३० ते ३३२ मधील सत्याग्रहाच्या खळ बळीं- तूत निमाळेल्या ग्रामीण जोवनविष्रपक विचारसरगणींतील आहे.
महाराष्ट्रांतील ग्रामीण जीवनही बहुविध स्वरूपाचे आहे. देश, कोंकण वगरे प्रादेशिक भिन्नतेच्या दृष्टीनें त्या त्या भागांतील समाज, त्यांच्या चाळीरीति व समजुती, त्यांच्या भावना व विचार इत्यादि बाबतींत मौजेची तफावत दिसून यते. म्हणूनच कथानकांतील समाज आणि त्याचें प्रादेशिक स्थान कळलें, म्हणज कोणत्याही ठिकाणच्या वाचकांना कथानकांतील ममं समजणें सुलभ जातें.
ह्या कादंब रोंतीळ पात्रे मुख्यतः देशावरच्या एका विशिष्ट भागां- तील व मध्यमवर्गाय मराठा समाजांतील आहेत. आणि तीं सव काल्प- निक आहेत. देशावरील मध्परम वर्गातील मराठा समाजाची भाषा बहुधा पाढरपेशा भाषेच्या वळणाची असते. ह्याकरिता तसली साधी भाषा ह्या कादंबरींत सामान्यत: योजळेली आहे.
एवढ निवेदन थोडक्यांत करून ही कादंबरी आमच्या प्रिय वाचकांच्या हाती नम्रतापूर्वक देत आहें.
अक्षय्य तृतीया ' सर्वाचा नम्तर शके १८६६ रामतनय
घराण्याला काळिमा 4
ह्गी आंबराईंतून हिंडत होती. तिची नजर चोफेर होती. आंबराईची
राखण करण्यास आली होती ती ! आंब्यांना पाड लागण्याचे
ते दिवस होते.
ती शेंदरी आंब्याखालीं आली. राघूनें चोंचावलेळे एक दोन आंबे खालीं पडले होते. ते तिनें उचलून आपल्या पाटींत घातले आणि गंमतीने आपल्याभोंवतीं एक गिरकी पण मारली !
नंतर ती इकडे तिकडे पाहात दुसर्या आंब्याखालीं गेली. तेथें एक भला मोठा आंबा खालीं पडला होता. तिनें तो उचलला. तो आपल्या दांतांनीं फोडला. तिनें तोंड वांकडें केळे आणि तो आंबा पण दूर फेकून दिला ! आंबटढाण होता तो!
तो लोणच्याचा आंबा होता, हें तिला माहीत होतें; पण ती भाज भानावरच नव्ह्ती ! तिचें लक्ष दुसरीकडं कोठ तरी गेलें होतें !
ती भर दुपारची वेळ होती. चेत्रमासांतील उष्ण उप्ण वाऱ्याची झुळूक त्या आंबराईत शिरे; पण तोंत प्रवेश केल्यावर तिला थंडगारपणा प्राप्त होई ! इतकी घनदाट आंबराई होती तो !
त्या आंबराईलगतच्या काळ्याभोर रानांतील एका भागांत नव्या छागणीचा वाढीस लागलेला ऊंस डोलत होता. त्याच्या कडेचे पापडीचें वेल कुपणांतील नव्या शेवर्यांना नुकतेच मिठी मारूं लागलेले होते! उंसा- शेजारच्या वावरांतील रताळ्यांचे दाट वेल मन मानेल तसे जमिनीवर झ्सरले होते. तिकडे तिची नजर गेली नाहीं.
तिच्या मळ्यांत लहानश्ली फुलबागही होती. तींतील किती तरी
डा आग वोट “अड पिळ डे नव ऱ्न्टे न नयायापा- 7-7“ र्न २ _. या. . व्टल् ---_ यपा
१० साखर गोटी
*७७/५-./%/४/१ /१/”१"” “१ “५ »£ * ८५ “ ९ “१२ 7१ “६. *, ४” ॥ 7.१ “५/१/५-५७५ » शस्ट *४१४५४ ४५ /-“-< “*/ /६/१/१५/* “५५-८४ /* ८५४*४१*-१५/४/५%/ 7 /* ४८१ €*/१ 2-५ ५१४ < ५५४५५४१”
गुलाबाच्या कळ्या उमलल्या होत्या. जाईजुईना कळ्यांचा बहर आलेला होता. तुळशीच्या उभट गोंडेंदार मंजिरी डोल लागल्या होत्या !
---पण कोणांकडेही तिची दृष्टि गली नाहीं!
तिची नजर तेथ्न कांहीशा दूर असलेल्या झोंपडीकडे लागलेली होती ! न्या झोंपडीच्या आसपास कोणाची हालचाल नजरेस येते कीं काय, हें ती निरखून पाहात होती ! पण तिची आश्या सफल झाली नाही !
तिनें त्यानंतर आपली नजर विहिरीच्या बाजूस वळविली. पण तिकडेही
तिला कोणीच दिसेना ! पुन्हा तिंमें सभोंवार पाहिले. आंबझरीच्या कांठच्या आंबराइंत कोणी नाहीं, अशी तिनें खात्री करून घतली; आणि विहिरी- ळगतच्या केळीच्या बागेकडे ती धांवत निघाली !
रंगी आज सुदर नवी हिरवी साडी नेसली होती. तिच्या डाव्या काखंत लहानशी पाटी होती. तिनें काचा मारला होता व आपला पदर कमरेला खोंवला होता. ती धांवत असतां तिच्या गौरवणं सतेज मांसल पोटऱ्या व मांड्या उमद्या केळींनाही लाजवितील, अश्या दिसत होत्या !
ती केळीच्या बागेत इकडे तिकडे बरीच फिरली. त्या बागेच्या पली- कडील झोंपडीकडेही वळली. पण तिला पाहिजे असलेलें तिचें माणूस तिला दिसेना !
त्यामुळे ती आतां कावरी बावरी झाली ! उन्हाच्या तापानें तिच्या गालावरचा लालसरपणा अधिक वाढला ! तिच्या रुंद व नितळ कपाळावर घर्मंबिदू चमक लागले. तिच्या टपोऱ्या निळसर डोळ्यांतील तीक्ष्णता वाढ लागली. तिच्या नाजूक आणि सरळ नाकांतून श्वासोच्छ्वास जोरानें होऊ लागला. तिच्या छातीच्या ठोक्यांचा जोर वाढू लागला, त्यामुळे तिचें उन्नत वक्षस्थळ खालींवर होऊं लागले.
ती आतां झोंपडीमागच्या उंच जागीं जाऊन उभी राहिली. तिनें पुन्हा इकडे तिकडे खूप पाहिलें. शेवटीं तिनें एक मंजुळशी शीळ घातली !
त्याही शिळेला उत्तर आलें नाही ! .
तिच्या कमानदार भुंवया जरा वर झाल्या. कपाळाच्या मध्यभागी चंद्रकोरीसारखी लहानशी अठी पडली ! इकडं तिकडे पाहात पुन्हा ,तित्ते झोळ घातली. तिलाही उत्तर येईना, म्हणून तिनें “ सावळ्या ओ ! .सावळया
थराण्याला काळिमा ११
५५१५-११ “५ “८५-५५ ४४४४१४१ “१29 -री" 2४ “५४४४४४४४४१ ह -१“४४५-०४५/४/*/४/९४-/१-१७१४०/१/ ७०७ कळ
ओ ! सावळ्या ओ! * अशी जोरानें हांक मारली. तिची ती मात्रा मात्रे ताबडतोब लागू पडली !
तिच्या त्या शिळेस उलट उत्तर म्हणूनच कीं काय, दुसरी एक गोड शीळ तिला ऐक येऊं लागली ! तिची हांक ऐकनच सावळ्या ती शीळ घालीत होता ! 1
ह्या अवेक्षित उत्तरामुळ रंगीचा चहरा खुलला. ती तोंडांतल्या तोंडांत मदु हंसली. या वेळीं तिच्या गालांवरील संंदेर खळी फारच मनोहर दिसू लागली !
रंगीच्या वयाला नुकतीच सतरा वर्ष पूणे झाली होतीं. मोकळ्या हवेंत स्वच्छंदाने तिर्चे आजपर्यंतचे आयुष्य गलेलें होतें. त्यामुळे तिच्या गरिराची योग्य वाढ झाली होती. तो मध्यम उंचीची होतो. तिचा बांधा सुबक होता. तिचें भरदार तारुण्य तरुणांना मोहवून टाकण्यासारखं होतें. तिच्या लावण्याची खुमारी तरुणांना वेड लावील अक्लीच होतो ! पण सावळ्याखंरीज इतरांना ती कस्पटासमान लेखीत असे !
तिच्या हांकेला गिळेच्या रूपानें उत्तर मिळालें खरें; पण तें नेमके कोठून मिळालें, ह्याचा अंदाज तिला बरोबर करितां येईना. म्हणून तिनें पुन्हा शीळ घातली. आपली जीळ दुसरें कोणी ऐकत आहे कीं काय, हें तिनें पून्हा चौकसपण पाहिलें.
तिच्या शिळेला दोनदां उत्तर आलें. तिनें सावळ्या कोठें आहे, हें बरोबर जाणले. तिचा आनंद गगनांत मावेना !
ती आतां तिकडे धांवत जाणार----
“इतक्यांत तिच्या कानीं 'रंगे ! रंगे ! ' अजया जोराच्या हांका आल्या
रंगीच्या मनाचा थोडासा विरस झाला खरा, पण हांक मारणाऱ्या व्यक्तीचा तिला तितकासा राग आला नाहीं ! ती व्यक्ति तिच्यावर प्रेम करणारी रखमा होती. ती सावळ्याची मामी होती. रंगीच्या अंतःकरणाचा ठाव तिच्याखरीज कोणाला लागलेला नव्हता.
रखमा वयानें तीस बत्तीस वर्षांच्या सुमाराची होती. ती वर्णाने निमगोरी असली, तरी तिचा चेहरा आकषंक व ठसठशीत होता. ती हाडा- पैरानें चांगली बळकट होती. ती धीट होती, पण जरा.भोळी होती. मात्र
र साखर गोटीं
“९०८५-०५. ५५५९५०. ००५५५/४/५६५/६६९४६-५./४०/४-//४४४५४४ १७५४४०४ ४५१0 “४४४४७५०७४५” “४”
त्ती इतकी तापट होती कों, तिला राग आला म्हणजे, तिच्यापुढ कोणाची मात्रा चालत नसे ! तिचे पतिराज सदोबा हे तिच्याच निवडीचे होते. त्यांची विठ्ठलभक््ति व ज्ांत स्वभाव पाहुन हा एक दुसरा तुकाराम जन्मास आला आहे, असें लोक विनोदाने म्हणत !
रखमा ही रंगीचे चुलते आबा मोरे ह्यांची दूरची नातलग होती. आबा मोरे यांच्या घरी तिची ये जा बरीच होती !
रखमानें रंगीला धांवत येऊन गांठलें. तिला नटलेलो पाहून रखमा म्हणाली,
“ रंग, कित्ती कित्ती छान दिसतेस ग तू ! ब्रह्मदेव देखील तुझ्या पाठीस लागेल! "
रखमा हंसली. तेव्हां लडियाळपणानें रंगी म्हणाली, “ काय मामी त चेष्टा चालविली आहेस, माझी ! --”
“र॒गे, चेष्टा नाहीं करीत मी तुझी ! ” रखमा गंभीरपणे बोलूं लागली. “ नाहीं तर काय, तो पानगांवचा भुजंगराव देशमुख इतक आबांच्या घरीं खेटे घालतोय ग कशाला ? अग, आत्ता आलाय, म्हणे तुला बघायला ---
“ कोण मेली कटकट माझ्याभोंवती ! आबांना सांग, रंगी आंब- राईच्या मळ्यांत नाही म्हणून ! ती गेली धरणाच्या शेतांत ! --
रंगी तुसडेपणानें बोलली.
“रंग, मी सांगणारच आहें तसं आबांना ! पण मळा बघायला आबाबरोबर इकडे येईल तो ! म्हणून तुला इशारा दिलाय ! सावळ्या ग कुठ दिसत नाहीं, इथं..... ह)
“ कुठं गेलाय, तो मला सांपडतच नाहीं ! मधांपासून कित्ती कित्ती
रखमानें सावळ्याच्या शोधांत जास्त पडूं नये, म्हणून रंगी असे बोलली.
“ अग, असल इथंच मळ्यांत ! तं इथं असल्यावर सावळ्या जायचा नाहीं, कुठुठु ' वुठठ ! --
रगी गालांतल्या गालांत हंसली. तिच्याकडे कौतुकानें पाहात तिच्या पाठीवर हात ठेवून रखमा म्हणाली,
“मी जातें घरीं आतां. रंगे, पण मी तुला सांगते, अलीकडे आबावर
-* पन्ना
व्पराण्याला काळिमा रह
कच
चांगली छाप पडली आहे भुजंगरावाची. मोठा अधिकार मिळाला आहे त्याला; संन्यांत लोकांची भरती पुष्कळ केली म्हणून ! अन् छानेशी बंदूकही सरकारनं दिली आहे त्याला ! अन् रंगे, मन्याला नोकरीवर ठेवलंय त्यानं ! अन दहा कोसांतलं सारं खटलं चालवून शिक्षा करण्याचा अधिकार ग मिळालाय त्याला. म्हणून तर आबांना तो हवा हवासा वाटतो ! आबाचं कसब माझ्याशिवाय कुणाला कळाथचं नाहीं, रंगे ! --”
इतकें सांगून रखमा निघून गेली आणि रंगी विचारमग्न स्थितींत -सावळ्याचा शोध करण्याकरितां साखरगोटीकडे निघाली.
ह्या दोघींचा संवाद सावळय़ाच्या कानीं पडला होता. तो साखरगोटी आंब्याच्या उंच शेंड्यावर होता. तेथन त्याला ह्या दोघी दिसत होत्या ; घण त्यांना सावळया मात्र दिसत नव्हता.
रखमानें सांगितलेली हुकोकत एंकून तो थोडा काळजींत पडला. दुपारच्या वेळीं रंगीला घेऊन तो गुपचूपपण बोरगांवला जाणार होता. म्हणून स्तर रंगी त्या वेळीं राखणीच्या निमित्ताने मळ्यांत आली होती. बोरगांवच्या मावशीच्या घरीं तो रंगीशीं लग्नही लावून घेणार होता, म्हणे !
पण तो आतां मनांत म्हणूं लागला, “ असलं चोरटं करणं कशाला 'पाहिजे ? खाज्या, बजा वगेरे आपले मित्र सांगतात, * नव्या पद्धतीनें आपण दृथंच लग्त उरकून टाक! * म्हणून तर आज आपण बोरगांवला जाण्याचें रहित करून इथं दडून बसलो! ह्या सावरगोटीलाही पाड लागलाय ! आज उतरू बरीचशी ! लग्नांत वांट हे आंबे ! गोड तोंडं होतीळ सगळ्यांची.
तो असं मनांत म्हणत होता, हें खरे; पण रखमामामींनीं सांगितलेल्या बातमीनें तो कावरा बावरा झाल्याशिवाय राहिला नाहीं ! कारण, भुजंगराव त्याच्या माहितीचा होता. पानगांवच्या जत्रेतील कुस्त्यांच्या फडांत भुजंग- रावानेंच त्याचा पाणउतारा केला होता ! आतां देखील आपल्या अन्नांत विष कालविण्यासच हा आला आहे, असें वाटून सावळ्याला भुजंगरावांचा फार संताप आला |
इतक्यांत रंगी भांवतच' साखरगोटीखालीं आली. त्याला अगदीं
पपप का पट 7: नयापपप ------०५ -“1टापाता-४टटशाप- “णाय
१9 साखर गोटी
उंच फांदोवर चढलेला पाहून तिच्या पोटांत धस्स् झालें! ती कळवळून म्हणाली,
“ सावळ्या ! सावळ्या ! उतर खालीं! ”
सावळ्या आंबे उतरीतच होता. मधूनच त्यानें तिच्याकड नजर फकली ! तो तिला पाहून गालांतल्या गालांत हंसला !
“ सावळ्या ! उतरतोस का नाहीं? नाहीं तर मी येईन तिथं बघ ! ” रंगी जोरानें म्हणाली आणि त्यांच्याकड टक लावून पाहूं लागली.
त्यानें उत्तर दिलें नाहीं. सांखरगोटीचा एक गोड पाड त्यानें दांतानें श्रावला आणि तो रंगीकडे फेकला. रंगीनें तो वरच्यावर झेलला. तिने लगेच तो तोंडाला लावला !
प्रेमाच्या गोडीची जाणीव त्या एकाच साखरगोटीने त्या प्रेमी युग्माला करूत' दिली 1.
तयानें अशाच पाडाच्या चार पांच गोट्या रंगीकडे फेकल्या ! त्यांचा आस्वाद ती घेत होती ! पण सावळ्याला त्या उंच शंड्यावरून उतरण्याचा तिचा आग्रह एकसारखा चालला होता. त्यांत खंड पडला नव्हता.
त्या फांदोवरचे सावळ्याचें काम संपले. तो त्या उंच फांदीवरून' सरसर खाली उतरू लागला.
उन्हाळ्यामुळ त्यानें आपले कपडे काढून ते साखरगोटीच्या बृध्याशी
ठेवले होते. तो फक्त लंगोट नेसलेला होता. तो एकवीस बावीस वर्षांचा गोरवणं तरुण होता. त्याची उंची अजमासें साडपांच फुटांपेक्षा कमी नव्हती. त्याचे सर्व अवयव गोटीबंद असून त्याच्या शरीरावर तारुण्याचे तेज ओसंडत होतें. त्याचें मुखकमल रंगीपेक्षां सरस नसले, तरी निरस तर खास तव्हतें. त्याच्या डोळ्यांत करारीपणाची विलक्षण झांक होती !
रखमानें त्याला कोणाची दृष्ट होऊं नये, म्हणून त्याच्या गळ्यांत काळा गोफ घातला होता. त्यामुळ त्याच्या भरदार कंठाची शोभा वाढली होती.
त्याच्या झरझर उतरण्यांतील चापल्य पाहून रंगी वेडी होऊन गेली.
तो खालीं आला. त्यानें अंगांत मलमलीची पेरण घातली. कमरेस धोतर गुंडाळले आणि त्यानें रंगीचे दोन्ही हात पकडले. तीं दोघे एकमेकांकड याहूं लागलीं. ती हंसली ! तोही पण हंस लागला !
घराण्याला-काळिमा र्फ त्यानें तिचे दोन्ही हात दाबले. रंगी मागे माग सरू लागली. तो पुढे येऊं लागला ! रंगीनें त्याचे हात मागे रेटीत म्हटले, “ सावळया कुस्ती खेळतोस होय ? भुजंग्याबरोबर कर लढत एकदांची !' मी पण पाहीन म्हणते, कशी गंमत उडते, त्याची ती ! --
“हो! हो! त्याला चीतपट करीनच मी! पण, रंग, आज तो तुझ्याकरितां इथं आलाय म्हण ! --
“येऊं दे कीं रे! चल आपण जाऊं या बोरगांवला ! --
“ तसं नको, रंग! करूं काय' करायचं तें इथंच ! कोण काय करतंय बघं तर! मी सांगेन सगळ तुला ! आतां साखरगोटीचे आंबे भराभर काढूं या. तृ घे खालीं पाट्या--
“ मी पण चढते, गोटीवर सावळ्या ! दोघेजण भरभर उतरूंआंबे ! --
सावळ्या आणि रंगी ह्यांनी साखरगोटीचे आंब पुष्कळ उतरले. त्यांचा ढोग त्यांनीं त्याच आंब्याच्या वक्षाखालीं घालून ठवला. तीं उभयतां मनसोक्त पाडाचे आंब खातच होतीं!
त्या वेळीं तिसरा प्रहर टळून गेला होता. दोघेही तहानभूक विसरली होतीं. त्यांच्या पोटांत साखरगोटीचें अमत भरपूर गेलेलें होतें. मग त्यांना भुकेची कसची आठवण होणार !
इतक्यांत तेथे मन्या रामोश्याची बायको सखी आली.
सावळ्याचा उपकारी स्वभाव सार्या आंबेगांवाला माहीत होता: शिवाय सावळ्याचा मित्र मन्या ह्याची तो लग्नाची बायको होती. ती रूपानें चांगली होती, पण स्वभावानें जरा एकांगी होती. मन्याला दारू पिण्याचा नाद फार असे. त्यामुळें तिचें आणि त्याचें भांडण होऊन ती माहेरीं आंबेगांवास' येऊन राहिली होती ! कांहींशा हलाखींतच ती तेथे दिवस कंठीत होती ! तिनें साखरगोटीचे सावळ्यानें उतरलेले आंबे पाहून ती त्यास म्हणाली,
'* सावळ्या साखरगोटी उतरलीस होय ! मग मला दे कों रे चार आंबे.
लगेच सावळ्य़ानें तिला पाटीभर आंबे दिले. ती आनंदित होऊन गांवाकडे परतली
ती आंबराई एका ओढय़ाच्या कांठीं होती. त्या ओढ्याचे नांवही
ती साखर गोटी,
*४-/१-,/" “४.४ “४ /५.”१./१९./% /१ ४१६५७.” “0४,५४० ४४५ ५४% »/% २५.५४ /% »० “५” ५ »१ /५ ४५१५७५ » “0 ८४१ ४//% »१ ८४४५१ “५/४/" “7 “१४१५५ /" “२.४ “१ 7१ “९५ _/४-४४../४५./ ४७% ह शोक ा
आंबेझरी असें पडलें होते. सावळ्या आणि रंगी चूळ भरण्यास आंबेझरीवर गेली. तिच्या कांठाशीं सावळ्याचे वडील हंबतराव यांनीं लहानसा घाट पण बांधला होता. तेथ दोघेजण बसलीं.
त्या वेळीं रंगी म्हणाली, |
“ सावळ्या, आज साखरगोटी उतरलीस हें बरें नाहीं झालं. हिच्याच- करितां तुमचं अन् आबांचं भांडण आहे ना ?--
“अग, माझा आंबा हा! मी उतरणारच ! बारा वर्षांनीं आंबे छागतात साखरगोटीला. असला गोड आंबा पांच पन्नास गांवांत नाहीं! मी हे आंबे साऱ्या गांवाला वांटणार ! काय करतील आबाते पाहीन मी ! --
“ सावळ्या बारा वर्षांपूवाची गोष्ट तुझ्या कानावर आहे ना ? असेच् आंबे लागले होते साखरगोटीला ! आणि अग बाई, इथंच तुझ्या बापाचा खून झाला ! रखमामामी सांगतात ना ती हकोकत ! ”,,/।।,
__ _ रंगीच्या अंगावर कांटा उभा राहिला ! त्या वेळीं सावळ्यानें तिला ओडून जवळ घेतलें. तेव्हां तर ती जास्तच कावरी बावरी झाली आणि दूर सरून म्हणाली,
“ सावळया, लग्न झाल्याशिवाय असं बरं दिसतं का? ”
त्या वेळीं सूय पश्चिम दिशशीं लगट करण्याकरितां वेगानें चालला होता. त्याचे मावळते किरण वृक्षांच्या विस्ताराच्या फटीतून त्या उभयतांना डोकावून पाहात होते.
इतक्यांत गांवच्या बाजूनें बऱ्याच लोकांचा घोळका आंबराईकडे येत असल्याचें सावळयाला दिसले.
ती मंडळी थेट साखरगोटीकडे वळली ! |
आबा मोरे यांच्या बरोबर ज्ञानू पाटील, भिक्या वेसकर, भुजंगराव देशमुख आणि आणखी दोन चार लोक होते !
साखरगोटीखालच्या आंब्यांचा ढीग पाहून आबांच्या रागाचा पारा पराकाष्ठंस चढला !
' “ सावळ्या ! सावळया ! सावळ्या ! ” आबांनीं जोरानें हांका मारण्यास सुरुवात केली.
सावळ्या निभंयपणे पुढं आला. .
थराण्याला काळिमा १५
च “ टी "अल्क ४ ४0१७ 009.” १०७0१५ /० ७ १.४९ ४० 09, / ४४७७७१, “क ७ “१७७० ७ ४0७ ९५००९ ७७ **/*४/४” “€ हब “4१.०१ “5 ९06... १७ळी, अग. अर. “० आळ लळे, हत्ये आह. आमह. मद. "ह, क. अल्दे, “क. आ. --/* शी “८ >... २५ ५५ “*. :>/५_/५ १२.४१ 7. ५७४ १८.४ “० आ ह क. आयदमळ ० क
पाटलांनीं त्याला विचारलें सावळ्या तं हे आंब उतरलेस ? होय. माझे आंब मींच उतरले-- सावळ्या नेटानें बोलला. त्याच्या कपाळास आठ्या पडल्या. डोळे लाल झाले. पण तो शांतपणे तेथे उभा राहिला. काय प्रकार होत आहे, हें तो लक्षपुर्वक पाहूं लागला. पाटलांनीं त्या आंब्यांचा पंचनामा केला ! वेसकर ते आंबे पोत्यांत भरू लागला ! त्याला ते आंबे चावडीत नेण्याचा हुकूम पाटलांनीं केला ! सावळ्या त्याला अडथळा करू लागला. तो ते आंबे कोणालाही पोत्यांत भरूंच देईना ? पाटील सावळ्याची समजूत करूं लागले. तो त्यांचें ऐकेना ! त्या वेळों मोठ्या ऐटीनें भुजंगरावांनीं मध्येच तोंड घातलें ! सावळयाला कायद्याच्या गोष्टी ते सांगू लागले. “ तुमचा येथें संबंध नाहीं भुजंगराव ! आपलें तोंड आवरा--' -सावळ्या गुरग्रला. भुजंगरावांना तो अपमान झोंबला. ते स्वतःच ते आंबे पोत्यांत भरू लागले ! सावळ्याचा राग अनावर झाला. तो भुजंगरावांच्या अंगावर चालून गेला ! त्या दोघांची झोंबाझोंबी सुरू झाली ! पाटील ती सोडवू लागले ! पण त्यामुळे सावळ्याला जास्तच चेंव आला ! क्षणार्धात त्याने भूजंगरावांना खालीं आदळले; आणि तो त्यांच्यावर स्वार झाला ! आंबेझरीच्या बाजूनें “ सावळ्या ! सावळ्या ! ” थांवत पुढे आली ! पण आबांनीं तिचा कान पकडला आणि म्हटले, “ काट, हेंच धरणाचं शंत तुझं ? माझ्याशीं लपंडाव चालवितेस ? माझी अब्रू घालवितेस ? मोर््यांच्या घराण्याला काळिमा फांसतेस ? --” हा प्रकार दिनराज अस्ताचलावरून पाहात होता. संतप्त झालेल्या माणसाप्रमाणे त्याचें मुखही लाल झालें होतें; पण रंगीवर आबांनीं
असें म्हणत रंगी
न्न वपक 00000 अ “नाणा कण णणापशीशीचीश शनी नाणी टककयाचाच्या आळलककीाभयककाचकयाक
१ट, साखर गोटी.
क 4५ - >“ ६. ।्- अ : ५८ * . १-८ ७.४५ २.७७ ४९७७४0 ७७0 फिक. पकी
चालविलेला गहजब त्याला बघवेना म्हणूनच कों काय, तो अस्ताचलाच्या पलीकडे झटकन निघून गला !
पण पश्चिम दिशादेवी कांहीं वेळ तेथच रेंगाळत असलेली दिसत होती. रंगीसारख्या खळकर वृत्तीच्या तरुणीला त्रास झालेला पाहून तीही संतापली असावी, असें तिचा तांबडा लाल झालेला मुखचंद्रमा पाहुन वाटत
होतें !
चोराचा गोंधळ ष्ट
&* ८ ट्क
साखरगोटी आंब्याच्या खालीं झालेल्या तंट्याची बातमी रात्रीं आंबंगांवांत वाऱ्यासारखी पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडीं तोच चर्चेचा विषय झाला. भुजंगरावांच्या सरकार दरबारच्या वजनाची माहिती लोकांना' होती. सावळ्याविषयीं त्यांना सहान्भूति पण वाटत होतीच. त्यामुळे त्यानें भ्जंगरावांना दुखविले, हें बरे केले नाहीं, भुजंगराव आतां दंश धरील आणि सावळ्याचा सूड घईल अशी त्यांना धास्ती वाटू लागली !
पण सावळ्याला त्या गोष्टीची दिक्कत वाटत नव्हती ! आपल्या न्याय्य हक्कांवरील भूजंगरावांचें अतिक्रमण त्याला सहन झाले नाहीं. साव- ळ्याच्या तरुण मित्रांनाही सावळ्यानें केले, तें योग्यच केळें असे वाटलें.
आतां आंबंगांवासारख्या लहान सहान गांवांतील तरुण मंडळी इतकी भोळसट राहिलो नव्हती ! निरनिराळ्या लोकनियुक्त निवडणुकीच्या सभा त्यांनीं पाहिल्या होत्या. जत्रेतील जमावापुढे झालेलीं अनेक राजकीय भाषण त्यांनीं एकलीं होतीं. खेड्यांतील लोकांना समजेल, अज्ना भाषत' त्यांचे हक त्यांना समजावून देणारे त्यांच्यांतीलच आतां नवे नवे वक्ते पुढे येत होते. त्यामुळे खेडगांवच्या तरुणपिढींत बराच निभयपणा येऊं लागला होता. कांहीं ठिकाणीं तर ती निभंयता बेपर्वाईच्या स्वरूपांत सरकारी अधिकाऱ्यांच्या अनुभवास येत होती ! त्यामुळें अशा कांहीं लोकांना भुजंग- रावासारख्यांची भीति मुळींच वाटत नव्हती ! |
भुजंगरावांना ह्या परिस्थितीची जाणीव होतीच. कॉग्रेसच्या राज- वटीच्या वेळों ते इकडील तरुणांचे पुढारी झाले होते ! महायुद्धाला
आ हय याक“... आयक आक कळ कट कल क, आ कळक उ ना 0-2: लप--८----८. पपी पा पशापीणाणाणी तकल्ला पभाणतीकीशणा 00. मयी वो कककन्वकयाड '
गोटी २० साखर गोटा | |
"५५१५ "५५०५४०५ १.०५४९..५-७-.
सुरुवात झाल्यानंतर त्यांनीं आपली पगडी फिरवली आणि ते सैन्यभरतीच्या उद्योगास लागले; म्हणून त्यांचा मानमरातबही वाढला.
त्या रात्रीं आबांच्या वाड्यांत आबा आणि भजंगराव यांचीं खलबतें रात्रभर चाललीं होतीं. एकादा दिवस थांबून मग काय तें करावें, असा त्यांच्या खलबतांतून निष्कषं निघाला होता.
सन्य भरतीस अडथळा आणण्याचा ग्न्हा सावळ्याच्या माथी मारतां येतो का, हें भुजंगराव पाहात होते. सावळ्यानें सरकारी कामास अडथळा आणला असा आरोप त्याच्यावर करतां आला असता, पण त्यांत आपलीही नाचक्की होण्याचा संभव भुजंगरावांना वाटत होता ! त्यामुळें त्यांच्या सरकार दरबारच्या वजनास धक्का, लागण्याचा संभव होता ! तेव्हां सावळ्यानें केळेला आंबराईतील अपमान तूर्त गिळावा; आणि दुसरें किटाळ त्याच्यावर आणून किवा उत्पन्न करून त्याला एकदम पकडण्याची योजना करावी, असें भजंगरावांनीं दूरदर्शीपणानें ठरविलें ! गेलीं तीन चार वर्ष राजकीय पुढाऱयांत वावरून त्यांनीं संपादलेला मुत्सद्दीपणा अशा प्रकारें त्यांना उपयोगीं पडला ! |
वास्तविक आंबराईत घडून आलेला प्रसंग अचानकच होता. तो कांही कोणीं मुद्दाम जाणूनबुजून उत्पन्न केलेला नव्हता. सावळ्याला साखर- गोटीचे आंबे उतरण्याची लहर एकदमच आली होती ! ही बातमी गांवांत ' पसरेल आणि आबा पंचनाम्याचा खटाटोप ताबडतोब करतील, अद्ची त्यालाही कल्पना नव्हती.
मग हें झाले कसें ? सावळ्याच्या उपकारी स्वभावाचा तो अपकारी परिणाम न कळतच घडून आलेला होता !
रखमाच्या लक्षांत ती गोष्ट अगोदर आली.
सायंकाळच्या सुमारास सवी रामोशीण रखमाच्या घरीं आली. तिला तिच्याकडून दाण विकत घ्यावयाचे होते. रखमा आपल्या घरची ज्वारी जरा स्वस्त विकी; पण रोख पैशाशिवाय ती कोणास विकीत नसे! सकाळीं सखीजवळ रोख पेसे नव्हते, म्हणून तिनें तिलाही पण ज्वारी घातली नव्हती ! आतां सखी येतांच रखमास म्हणाली,
कना ०००५८ > पायाला नक पथा अहणापणा 000 एकणणणटण0णी णी | कणकणीप लश? 0ी?! 0? टश शण पीप"? पपया कका कालीण कटीपटनापटटटटलल्न यापा
चोराचा गोंधळ २8.
कपटी 0 ४000/४५४५४०५४/%* ४४४७ ७४१ 9 7०%-८४.७९ १.७५ १ २.९.- 2५८, *.<- २“. २.»
“ दाणे घालतां का मला आतां ? मी अधेली घेऊन आलंय ! रखमामामी !_... ... द |
“ अग, सकाळीं आपल्याजवळ दमडीही नाहीं म्हणत होतीस, अन् आतां ग तुला चांगली अधेली कुठनं मिळाली ?-- ”
रखमा सुपांत दाणे घऊन येत असतां सखीला बोलली.
“ सावळ्याचे लई उपकार झालेती माज्यावर, रखमाबाई आज ! ”
“ त्यानं तुला पेसे दिले ?--
त्या तरण्याताठ्या सखीकडे रोखून पाहात रखमानें विचारलें.
“तसं नव्ह रखमाबाई ! “ मिस्किलपण्णे हंसत सखी बोलूं लागली, “ त्यानं साखरगोटीचे आंबे दिळे मला खायाला. पण घरांत दाणे नव्हते, म्हणून मीं बाजारांत नळे विकायला ते ! साखरगोटी संमद्यांना ठावं हाय ! उड्या पडल्या तिच्यावर ! दिडकोला एक एक अिकली मी ! --
“ अस्सं होय' ! --”' रखमा उद्गारलो.
“ पन रखमाबाय म्यां वंगाळ केलं हें! '' सवी डोळ्यास पदर लावून बोलू लागली “ आबा मोऱ्यानं मला आंबं इकतांना पाहिलं. त्यानं इचारलं; * कुगो आंबं दिलं तुला ? “ म्यां म्हटलं, “ सावळ्या आंब उतरतोय तिकडं गेलें मी. दिलं मला त्यानं हेआंबे ! .... '' एवढे बोलून सवी रडूं लागली !
“कां ग रडतेस ? सांग सगळं-- रखमा म्हणालो.
“ सांगायचं काय ? रखमाबाई. मला आबानं ज्ञानू पाटलाकडं नेलं. मो त्याला तेंच सांगितल. त्यो पानगांवचा भुजंगरावही होता बरोबर ! सावळ्याला पकडायला गेलेत ते!”
रखमाच्या काळजांत चर झालें !
“1 ऱ््ॅ -्ॉ
आबांच्या घरीं एक दिवस अगदों मोकळा काढण्यांत भुजंगरावांचा आणखी एक सुप्त हेतु होता. रंगीच्या सोंदर्याने ते भारून गेले होते. दुसर्या दिवशीं सकाळीं तिनें चहा आणिला, त्या वेळीं उभयतांची दृष्टादृष्ट झाली. रंगी तोंडांतल्या तोंडांत हंसली ! भुजंगरावांना समक्ष पाहातांच ते चांगले ताकदवान असावेत, असें तिला दिसले. अशाही जवानावर सावळानें विजय' मिळविल्याचें तिला कोतुक वाटलें; म्हणून ती हंसली !
"२-५ “४८ ४-/९%७ ७४ ४८० ४.१ &४७./ ७.४० “९.४७.”
"८-८ 7“ अन्नकापाकन्ा*---०ा-ा-्“पाा “र 7 एपी
३्र् साखर गोटी
>
"४५४७४५६. ५८१*/५/५/५५५/८-/ “४८ ५४१४५४१ “€ “१७ ४ अ शट 2४४ ४१ ४५४१४५५४५८ ५४/५४/५८५४ “५ “५/५»८५»
भुजंगरावांना वाटलें, रंगी आपल्यावर खूष असावी. म्हणूनच दिवसभर त्यांनी आबांचें घरही सोडलें नाहीं!
ते एकसारखे रंगीला निरवीत होते. ह्यापूर्वी त्यांची निराशा झाली होती. पण आजचे ग्रह पालटले आहेत, असें त्यांना वाटलें.
भुजंगरावही वयानें तरुणच होते. ते सावळय़ापेक्षां तीनचार वर्षांनीं अधिक वयाचे होते इतकेच. मोठे महत्त्वाकांक्षी होते ते. भॅटिकपर्यंतचा अभ्यासक्रम कसाबसा त्यांचा झाला होता. कांग्रेस चळवळींत अशा घरंदाज श्रीमंत मराठा वर्गास एकदम पुढारीपणाची संधि प्राप्त होत होती. तिचा फायदा त्यांनीं भरपूर घेतला. जिभवरही सरस्वतीचा कांहींसा वरदहस्त असल्यामुळे त्यांचें बस्तान चांगलेंच बसलें !
भुजंगराव सुमारें सावळया इतकेच उंचीचे होते. पण अंगानें जरा जाड होते. तें त्यांचें कमावलेलें गरीर होतें. ते वर्णाने सावळं असले, तरी नाका- डोळ्यांनी नीटस होते. देसर्यावर छाप बसवील, अशी त्यांची मुद्रा होती.
सौंद्यवान् पत्नी प्राप्त व्हावी, अशी त्यांची सहाजिकच मनीषा होती. पण रंगीइतको अथांग स्ंदर मुलगी त्यांना अद्यापि आढळली नव्हती ! म्हणून तर ते रंगीच्या माग लागले होते !
र; 1... ड्रॉ
सावळ्याचा दुसरा दिवस उदासवाणाच गेला. रगी त्याठा त्या दिवशीं भेटली नाहीं. तिनें आपलें घरच सोडले नव्हतें मुळी.
सायंकाळच्या वेळी सावळ्या आपल्या मळ्यांतील झोंपडीच्या बाहेर घोंगडी टाकून बसला होता. त्याची नजर केळींच्या बागेकडे होती. केळांचीं पानें वाऱ्याने एकसारखीं हलत होतीं. त्यामुळे केळी नाचत आहेत असें त्याला वाटत होतें. त्याच्या मनांतही असेच अनक विचार नाचत होते !
सावळ्याची आई वारल्यापासुन तो रखमाकडेच असे. दिवसा ती त्याला मळ्यांत भाकरी पोंचवी; रात्री तोघरीं जवणास जाई. साख'रगोटीचा. तंटा झाल्यामुळे गांवांत आणखी कांही गडबड व्हावयास नको, म्हणून तो त्या रात्री घरीं जवणास गेला नाहीं. दुसर्या दिवशीही रात्र पडली, तरी तो घरीं गेला नव्हता. रखमाला घरींही फार काम होतें. आबांच्या घरच्या हालचाली निरखण्याकरितांही तिनें घर सोडलें नव्हते. दुसऱया: दिवशी
चोराचा गोंधळ '९३ रात्रीं बराच वेळ वाट पाहिल्यानंतर तिनें सदोबांना जवण देऊन मुह्ाम सावळ्याच्या मळयाकडे पाठविलें
सदोबा मळ्यांत गले तेव्हां बरीच रात्र झाली होती. पण. चांदण पांढरे शुभ्र पडलें असल्यामुळे ती रात्र भयप्रद वाटत नव्हती, उलटी आल्हाद- कारकच ती वेळ होती
झोंपडीच्या बाहेर सावळ्या आपल्या मित्रांबरोबर बोलत बसला होता. खाशा, बजा वगरे.त्याचे मित्र तेथ जमले- होते. त्या मित्रांच्या टोळ- क्याचा पुढारी मन्या रामोशी मात्र त्या वेळी तेथ नव्हता !
संदोबांनीं आणलेल्या भाकरी सावळ्यानें सोडल्या. त्या भाकरी हातांवर घेऊन सारेजण खाऊं लागले. त्या वेळीं सदोबाच म्हणाले,
“ सावळ्या, साखरगोटीकरितां पुन्हा वाद निघाला, हें वरं झालं नाही, बाबा |! --'
संदोबांना सारेजण मान देत होते. त्यांची उमर चाळिशीला येऊन ठेपलेली होती. त्यांचा चेहरा भव्य व हाडपेर मजब्त होतें. ते साध्या भोळ्या विचाराचे विठ्ठलभक्त आणि ते कष्टाळू शेतकरो होते. त्यांचा सावळ्यावर जिव्हाळयाचा लोभ होता.
भाकरीचा घांस सावळ्याच्या तोंडांत होता. पांढरा कांदाही त्यांने हातानें फोडून त्याचा तुकडा तोंडांत घातला होता. तो चावून चावून गिळल्यानंतर सावळ्या म्हणाला, ।
“ आमचीच साखरगोटी मूळची, असं तुम्ही सांगतां ना सद्काका ? आमच्याच बांधाचा दगड साखरगोटीच्या पलीकडे आहेना?
“हें सारं खरं आहे, सावळ्या, * सदोबा बोल लागले “ पण बारा वर्षांची गोष्ट ऐक तरी एकदां. साखरगोटीला बारा वर्षांनीं आंबे येत असतात ! ह्या जुन्या दगडावरून तुझा बाप हंबतराव आपली साखरगोटी म्हणत होता. तेव्हां आबानं मोजणी आणली ! मोजणीदाराला लांच दिला ! आंबेझरी- पलीकडची आबाची हद्द त्यानें साखर गोटीपर्यंत आणून भिडवली ! अना रीतीनें सरकार दरबार आबानं जिकला. हंबतराव हरला! "
“अस्सं आहे काय ?'' खाशा म्हणाला, “ पण रंगीचा भाऊ हिमतराषच
जतक जाळ ककवन >>> ० 2->_>__>“_>> >. >> ज; ३ नन न य सव व अक मिनल पन पन्यवाज्न् नक - >*ाप-न-८-- अ > (नल पणी
२9 साखर गोटी
.£२../”./” ४
याचीच साखरगोटी असं लोक म्हणतात, म्हणून तर आम्ही सगळे रंगीलाच
"*_/_/ ४_/९. /२./ ५. ४५.//०.//९./ २.५१. ४५४४०४७. ७.” ७०/९./४ “0९.२.” ..”” २४%.”
“ रंगीची साखरगोटी हेंही खरंच कीं ! आबांचा पुतण्याच रंगीचा भाऊ हिमतराव. त्याची जमीन आंबेझरीच्या अलीकडची साखरगोटीला लागूनच. मग त्याच्याही हद्दीवर साखरगोटी येतेच कीं ! म्हणून हिमत-
संगळ्यांनीं एक मोठा सुस्कारा टाकला. “ आम्ही आतां मनगटाच्या जोरावर आमची साखरगोटी म्हणणार-- ” बजा त्वेषाने बोलला. आणि त्यानें दांतांनी एकदम कांदा फोडला.
“ऐका तरी माझं ! तुम्ही कोवळीं पोरं आहांत. तुम्हांला ठाऊक नाहीं ती गोष्ट ! ” सदोबा म्हणाले,
“ ऐकतों आम्ही सगळं. सांगा काका तुम्ही ! पाहात बोलला.
सावळ्यानें लसणीची चटणी आणि शंगदाण्याचें कूट घातलेला झुणका साऱ्यांच्या भाकरीवर आणखी घातला. त्या चांदण्या रात्री त्यांच्या त्या जेवणाला मजा आली होती ! सदोबाही तन्मयतेने त्यांना जुना इतिहास निवेदन करीत होते. ते म्हणाले,
“ पण हें तिघांतलं भांडण फार पेटलं. हेबतराव रात्रीची राखण करीत असे. तो आंब्याखालींच झोंपत असे. सावळ्यासारखाच गोरा गोमटा होता तो. शरीरानं चार जणांला भारी होता. पण रात्रीं त्याचा कुऱ्हाडीनं कुणीं गळाच तोडला ! दोन तुकडे केले त्याच्या देहाचे! खून झाला त्याचा !... ..
सदोबांच्या डोळ्यांना पाणी आलें. कोणी कांहीं बोलना. सवंत्र गंभीरतापसरली ! जो तो “ चू चू ” करूं लागला. सावळ्याच्या डोळ्यांत' अश्रू उभ राहिले. त्याच्या तोंडातील भाकरीचा घांस घोटाळूं लागला.
कांहीं वेळानें सदोबाच बोलं लागले,
“तो खन रंगीचा भाऊ हिमतराव ह्यानें केला, असा त्याच्यावर सरकारनें आरोप ठेवला ! खटला झाला. हिंमतराव फांशी जाणार असेंही लोक म्हणूं लागले. पण हिंमतराव तुरुंग फोडून पळून गेला. मोठा मस्तवाल
१4
बजा सदोबाकडं
ळय क >>>>>> ना ->>>->>>>>- >>>. > -२ बाप्टपापटटायापलट-ा-2 ८7 ८7: पण. ९-८ >> *५- १०-८८ ०“ "पगणाणा
चोराचा गोंधळ २५
वेहलवान' होता तो! कुणी म्हणतात, त्याला शिपायांनीं गोळ्या घालून मारलं. पण मला नाहीं खरं वाटततें ! ।
“विठ्ठल माउली ! विठोबा माउली ! तुकाराम.”
सदोबांच्या मनाला त्रास होत होता, म्हणून ते असें भजन करू लागले,
“ फार वाईट झाली ही गोष्ट खरी ! ” खाशा म्हणाला, “ पण आतां हिमतरावांच्या जागीं आपल्या रंगूताई ना ? त्यांच्याकडे साखरगोटी आली, तरी ती सावळ्याचीच सदूकाका ! ”
संदूकाक। हंसळे आणि गंभीरपणे म्हणाले,
“ आबा रंगी सावळ्याला देणार नाहीं. तो भुजंगरावाला देणार आहे. मला पक्कं ठाऊक आहे ते ! रंगी पणखष दिसते आज तरी त्याच्यावर ! आज त्याला चहा देतांना पाहिलंमी ! --'
“ सदूकाका, रंगी कुणावर फिदा होणार नाहीं, ती माझी आहे. विचारा तिला तुम्ही ! --
सावळ्या एकदम चिडून बोलला.
“ चेत्र तर उलटं द्या. वेशाखांतल्या पहिल्या मुहुर्तावर रंगीचं लग्न आंबा भुजंगरावाशी लावून देईल बघा ! -- '' सदोबांनी सरळपणे सांगितलें
“ चेत्रांतच रंगीचं लग्न होऊन गळलं तर ! --
खाशा म्हणाला.
“असं कुठं झालंय का? तो गुंडोपंत भट असं कसं लग्न लावील चेत्रांत ? --”
“ आम्हीच लावलं तर सदुकाका ! ” बजा गंभीरपणे बोलं लागला. “ हुरीपुरा काँग्रेसला गेलों होतों आम्ही. तेथे महात्मा गांधींनीं पायंडा पाडून दिलाय साध्यासुध्या लग्नांचा. एकमेकांनी गळ्यांत माळा घातल्या कीं होतं ते लग्न. आतां अशीं लग्नं पुष्कळ होतात. त्याला आम्ही * गांधी- विवाह ' म्हणतों ! --'
“ वण “* गांधीविवाह ' आबाला पसंत पडणार नाहीं--”
संदूकाका जरा त्रासून म्हणाले.
इतक्यांत रखमा तशा रात्रीची तेथे आली. तिनें सदोबांना कांहीसें
| 114
२
३ . साश्वर गोटी
/९%४९../५/१४४/ १४%/७४७४ ७ ७४४४७१० ७ ४४७५ १७१७४ ५” ०: मि ब्श धरा“ /०/५/ “ *< ४५१४५५ -५/४/”-५५/"-५%-०५०५/४//४/*,
सांगितलं. तरुण मंडळीना कांही न बोललेले बरें, असे तिला वाटल. सदोबा रखमाबरोबर निघाले. तिला खाणा म्हणाला उद्यां सावळ्या रंगीचं लग्न लावून टाक! तुम्ही या लग्नाला ! “ मेल्यांनो कसलं लग्न लावताय ! आबांच्या घरांत गोंधळ उडवून दिलाय चोरानं... ... रखमा सदोबाना घऊन जलदोने निघून गळी. सावळ्या त्यांच्या मागून गला.
चांडाळ चोकडी ३
कता मोरे याच्या गांवाबाहेरीळ वाड्यांत चोरानें गोंधळ उडवून देण्यास वास्तविक रगीची करणीच कारणीभत होती !
ती त्या दिवशी घरींच होती. तिनें थाटमाट पण चांगलाच केला होता.
तिनें स्वतः सकाळचा चहा पुरूप मंडळीना नेऊन दिला होता. त्या वेळीं सदोबाही तेथ होते. भजंगरावाकड पाहुन ती गालांतल्या गालांत हंसत होती !
रंगी खेळकर वृत्तीची होती. आबांना ती फार आवडत होती.
आबा मोरे यांचे वजन आंबंगाव भागांत चांगलेंच होतें. त्यांच्या वयाची चाळिशी उलटलेली होती. त्यांची उंची सुमारें सहा फूट असून त्याचा वण चागला गोरा होता. भव्य कपाळ, सरळ नाक, एंटदार मिज्ञा आणि घारे डोळे ह्यामुळे त्यांच्याकडे पाहिलें कों, हा गृहस्थ मोठा कारस्थानी असावा, असें कोणालाही वाटे.
तरुणपणी त्यांनी नाना ढंग केळे होते ! त्यांना संतति होई, पण ती फार दिवस जगत नसे !
त्यांना गोराबाई हो साधोभोळी पत्नी मिळाली होती. त्या उभयतांचेंही रंगीवर प्रम होतें. ।
-र्आणि रंगी तशीच कोणीही कोतुक करील अशीच खेळकर वत्तीची मुलगी होती. व्हा अकरा वर्षांची होईपर्यंत ती खेड्याच्या शाळेंत शिकली तेवढीच. त्यानंतर तिला आबांनीं शाळेतून काढलें. त्यापुढ ती दिवसां बराच वेळ मळ्यांतच असे. तेथ मुलांमुलींत यथेच्छ खळे. हलकें सलकें कामही
कट आनन. सननन्न्टप-_>५--- म-- > णा "णी तण कणी व ऱ्् (वत -
२८ साखर गोटी पण करी. सावळ्याची व तिची तेथच लहानपणापासूनची झालेली गदट्रो सर्वांना कौतुकाची वाटे !
आबांना रंगीचा फार लळा होता. तिचे आईबाप लहानपणीं वारले होते. तिचा एकुलता एक भाऊ हिमतराव हाही बारा वर्षांपूर्वी नाहींसा झाला होता. त्याची भली मोठी इस्टेट आबांनीं पूर्णपणें आपलीशी केलेली होती !
तसें कांहींही असलें, तरी रंगीविषयीं आबांना आपुलकी वाट. ते तिचे लाड पुरवीत. तिच्यावर सहसा रागावत नसत, हें खरें ! *
भुजंगराव तिला अनुरूप वर आहे, हें आबांच्या मनानें अलीकडे पुरे धतलेलें होतें. त्यांत कांहींसा त्यांचा स्वार्थी हेतुही होता !
ह्यापूर्वी मात्र आबांना सावळ्या पसंत होता. कारण त्यांच्या अंत'- करणांत कसली तरी एक टोंचणी सतत लागून राहिली होती. ती ते कोणासच उघड करून दाखवीत नसत ! कारण तसें करणें त्यांनाच धोक्याचे होतें. मात्र रगीचे जास्तीत जास्त कल्याण,झालें, म्हणजे त्यांना कांहींसें समाधान लाभणार होते !
त्से कल्याण भजंगरावासारख्या कोत मिळविलेल्या तरुणाशीं तिचा विवाह लावल्यानें होईल, असें त्यांच्या व्यवहारी वृत्तीला अलीकडं जास्त जास्त वाटू लागलं होते खरे !
पण रंगीनें मनानें सावळयालाच वरलें आहे, हयाची तितकीशी जाणीव आबांना नव्हती.
सकाळपासून भुजंगरावांना पाहून ती हंसे, डोक्यावरील पदर सरळ करीत त्यांच्याकडे तिरपी नजर टाकी. त्यामुळे तर भूजंगरावांवर ती नाखूष नाही, असें आबांचें अनुमान झालें असल्यास त्यांत नवल नाहीं !
दुपारीं आवा चावडींत कांहीं कामाकरितां गळे होते. भुजंगराव वाड्यांत एकटेच होते. आबा बाहेरच्या खोलींत आहेत कौ काय, ह पाहा" ण्याच्या मिषानें तिनें त्या खोलीत दोन तीनदां डोकावले. तेथ भुजंगरावांना एकट्यांनाच पाहून तिनें लाजल्याचें दाखविलें आणि पदर डोकीवर ओढून घेऊन ती चपळाईने निघून गेली ! पण भुजंगरावांच्या अंत:करणांतून ती मूळीच दूर गेली तव्हती !
च बह & चांडाळ चांकडा २९
*२>/४५/४४"-४ ४५/*-१-४५४४४४४४//५७१ “ २८४” 9" ४५४ “९” “४९ “४५/१.४//४-४४५.५”०५ “०४४१”
दुपारचा चहा त्यांना तिनेंच आणून दिला. त्या वेळीं ती गोड हसली ! भुजंगरावांना वाटलें, रंगी आपल्यावर चांगलीच खूष आहे !
त्या दिवशीं आवशीच्या वेळीं चांदण पण शुभ्र पडलें होतें. आकाश निरभ्र होतें. आकार्शातील चांदण्या चंद्राकडे टकमक पाहात होत्या !
उन्हाळ्यामळे आबांनीं बाहेरील अगणांतच बेठक घातली होती ते बलांना कडबा घालण्याकरितां मागील बाजच्या गोठ्यांत गळे होते. गडी माणसें घरीं गेलीं होतीं !
भुजंगराव एकटेच बैठकीवर बसले होते. आकारांत चांदण्याकड त्यांनी टक लावली होती. कसल्या तरी गोड विचारांत त्याचें मन घुटमळले होतें!
आबांच्या घरीं घारी नांवाची एक अस्सल खिलारी गाय होती. त्यांनीं ती लहानपणापासून पाळली होती. रंगीचा तिला आरंभापासूनचा ळा होता.
ती गाय भारी चपळ होती. रंगीखरीज ती कोणाला आपल्या अंगाला हात लावूं देत नसे ! गोंजारू देत नसे ! बांधू देखील देत नसे !
घारी नुकतीच व्याली होती. तिला सुंदर कालवड झाली होती. रंगीखेरीज ती कोणालाच आपली धार काढूं देत नसे !
भजंगराव अंगणांतील बेठकीवर विचारमग्न स्थितींत बसले होते, त्याच वेळी रंगी घारीची धार काढण्याकरितां हातांत स्वच्छ चरवी घेऊन अंगणांतून दरवाजालगतच्या गोठ्याकडे जाऊ लागली. तिकडे जात असतां पायांत कांहीतरी टोंचल्याचे निमित्त करून ती भुजंगरावापासून थोड्या अंतरावर वाकली. भुजंगरावांची दृष्टि तिच्याकडे होतीच. तेव्हां रंगीनें हंसत हंसत त्यांच्याकडे पाहिलें. नंतर ती तेथून पुढ गोठ्याकडं जाऊं लागली.
रंगी गोठ्याजवळ येतांच घारीनें हुकार दिला. वासरानें आईकडे ओढ घेतली. रंगीनें वासरू सोडलें. तें घारीच्या स्तनांना लागलें. घारी पान्हा घालुं लागली. रंगी घारीचे आचळ चोळ् लागली. लवकरच तिनें पूर्ण पान्हा घातला.
रंगीनें घारीच्या पुढे वासरू बांधलें. चरवी गुडघ्यावर ठवून ती धार काढु लागली.
३० स7खर गोटी कतपत मा पावा का ककती धार काढीत असतां ती गाण गुणगुणत होती. सख्या रे मनमोहना । येई सजणा हया रमणीच्या ऐकार्या गाना!
भजंगरावांच्या कानीं गाण्याचे मंजूळ स्वर पडले. त्या गाण्याने अगदी अधीर झाले->वेडेंच होऊन गेले म्हणाना ! -- |
वास्तविक भुजंगराव पुष्कळसे संयमी होते. आबांच्या घरी त्यांची नेहमीची य जा होती. रंगीची व त्यांची चांगली जानपछान होती.
रंगीच्या सोदयर्चिं व चापल्याचें त्यांनी अनक वेळां कोतुक केलें होतें रंगीनें नाजक दष्टीने आपल्याकड पाहावें, म्हणून त्यांनीं यत्न करूनही पाहिला होता. पण त्यांत त्यांना आतांपर्यंत यश आलें नव्हतें.
पण, आज भर तारुण्यात आलेली रंगी आपल्याकडे पाहून मधुर हंसत आहे, ह्याची त्यांना धन्यता वाटत होती. ह्याच तंद्रींत ते असतांना त्यांच्या कानीं तें गोड गाणे पडले. वि
--आणि ते झटकन उठले. दबत दबत पुढ चालले. रंगीच्या मागील बाजूस जाऊन ते उभ राहिले.
रंगीनें गोठ्यांतील घडवंचीवर कंदील ठेवला होता. एयाच्या प्रकाशात ती धार काढीत होती.
तिचे खालींवर होणारे मांसल दंड मोठे मनोहर दिसत होते. तिच्या हिरव्या चोळींतून वरखालीं होत असलेला उन्नत भाग तिच्या गोड सोंदर्यात अनुपम भर घालीत होता !
भुजंगरावांच्या हालचालीवर त्या मिस्किळ रंगीची नजरही पण होतीच. थोड्या वेळानें भुजंगराव आणखी थोड़ पुढे सरकल. त्यांनी हळूच ' म्हटले. आपण धार काढण्याच्या नादांतच आहो, असे रंगी पूर्णपणे भासवीत होती. त्यामुळे पुन्हा “ रंगू '' असे शब्द तिच्या कानी पडलेच !
ती माग पाहून हंसली, पण पुन्हा दूध काढ लागली. भूजंगरावांना
ह रं ग 4 ८*
> -___) चाढाळ च1/कडा 3
7-५... “२”. २३.५ *२/१/१/ '६_/% /'९. 7१ /* ४२ ४७ /7 २ /१%”/% ५/%/% * % %/£% ७ ४७ ५६ म. अ. क वि »% % ९ ५0 » > »% ७ 'ओ % ४" २४ “0 ४७% 0.४४"
आतां जरा जास्त धीर आला. ते आणखी पृढ सरकले. अगदीं तिच्या संनिध येऊन ठपले.
रंगी गाण म्हणतच होती.
भजंगरावांना आता राहावेना. त्यांनी तिच्या खांद्यावर हळूच हात ठेवला. त्यांचे सर्वांग थरारले. अंगांत गोड झिणझिण्याही संचारल्या !
पण ती नागीण भुजंगरावांच्या स्पर्शामुळे बेहाय चवताळली ! ती एकदम उठून उभी राहिली ! तिच्या गडघ्यांवरील दुधाची चरवी उपडी झाळी ! तिच्या नेत्रांतत आग बाहेर पडं लागली !
--““आणि काय सांगावें, तिने घारीच्या दहणाचा एक मोठा पोह उच- लळा आणि “मल्या ! मल्या । ” असे म्हणत त्यांच्या तोंडावर फकला !
'“आबा ! आबा ! आबा ! भामटा आलाय ! चोर आलाय ! " रंगी मोठमोठ्याने ओरडत अंगणांतून घराकड धांवत जाऊं लागली ! आबांच्या पत्नी गौराबाई घाबरल्या. त्या रंगीकडे धांवत आल्या. आबाही हातचे काम टाकन घरांत आले
रंगी फार घावबरलेळी दिसत होती. कांहीं तरी विशषष भयप्रद कारण घडल्याणिवाय ती अशी भिणारी मलगी नाहीं, हें आंबांना माहीत ठोतें
“घरांत चोर निरलाय--'
रंगीनें भीतभीतच म्हटले.
आबा सावधगिरीने घरांत तपास करू लागले. मागील बाजूचा कडबा वाजल्याचा त्यांना भास झाला. हातांत फरशीची कुर्हाड घेऊन ते तिकडे गले.
इकडे रंगीनें भयंकर अपमान केल्यामुळे भुजंगरावांच्या अंगाचा भडका उडाला. पण करतात काय बिचारे ? आणखी जास्त अपमान होऊं नये, म्हणन त्यांनीं धोतरानेंच तोंड पुसले. आणि हळूच दरवाजांतून निसटून ते बाहेर पडले ! ट
ते थेट आंबेझरीपर्यंत गेले. त्यांनी तेथें पाण्यानें तोंड धुतले. डोक्यावर पाण्याचे हाबके मारून मस्तक शांत करण्याचा प्रयत्न पण त्यांनीं चालविला!
न्न >> --र्णा--ापपाट-प-- -- उपपपपणीपापी पाप" पशा
२२ साखर गोटी
%५९५५-५%-५-”९%./९../ ४. १७४९६ “५ ४. “0७.” “५७/१७/७४७४. ७९७ १७७७ ४. /७/७0 “00 ४१२७ “७ ७ 7२७ 7५ 2५ ५. “५ ल्क शश ४-५ “/४४* “१ * /९ /% ५१ ९०८१ ४५५४९८१ »€ “7५-४५”.
सावळ्या आणि रंगी ह्या दोघांनींही आपली मानखंडना केली दोघांचा हा गुप्त बत असावा असें वाटन न्या दोघांचाही सूड घण्याची कल्पना त्यांच्या डोक्यांत थेमान घालू लागली !
पुन्हा ते आवांच्या वाड्याकडे वळळे. रंगीनें आपल्या नांवाचा बोभाटा केला आहे कीं काय, ह्याचा अंदाज प्रथम त्यांना काढावयाचा होता !
त्या वेळीं आबा वाड्याच्या सर्व आवारांत हिंडून आले होते. त्यांना चोराचा सुगावा लागला नव्हता. ते रंगीकड येऊन तिळा खोदून खोदून माहिती विचारीत होते.
भूजंगराव दरवाजाच्या बाहेरील बाजूस दडून उभे राहुन तें बोलणे एंकत होते.
आबा विचारीत होते--
“ रंगे, चोर आला म्हणतेस. त्या वेळी भजंगराव अंगणांतच होते ना? त्यांना कां नाहीं हांक मारलीस ? --
“ तें अंगणांत असते, तर त्यांनीं चोराला झोडपले नसतें का आबा ! मी धार काढावयास गेलें, तेव्हांच ते बाहेर निघून गले होते ! --
रंगी चाचरत चाचरत बोलली.
“ पण चोर वाड्यांत शिरला, हें तरी खरं का? माझ्या वाड्यांत कोणी भामटा शिरण्याचं धाडस करायचा नाहीं !| माझ्या फरशीचं पाणी जगाला माहीत आहे |! --
आबांनीं हातांत घेतळेळी फरशी पुढ करून म्हटले.
आबांच्या ह्या ओलण्यावर रंगीला उत्तर देतांयेईना. ती घाबरल्या- सारख करू लागली.
आबांना वाटलें, रंगी घाबरली. इतक्यांत रखमा तेथे आली. तिला गौराबाईनीं हांक मारून आणिले होतें. रखमा रंगीच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणालठी--
“ रंग, घाबरू नको अशी ! आबासाबांच्या वाड्यांत कोणी भामटा शिरायचा नाहो. त्याचा वचक गांवभर आहे ! --
* मामी ! “ रंगी जरा धीर दाखवन म्हणाली, “मी खरंच घोंगडी पांघरून आलेला माणूस पाहिला. भजंगरावांकडे आला असेल, म्हणून मी
चांडाळ चौकडी ३९ गप्प होतें. पण तो माझ्याकडच आला ! त्यानं एक मला ठोसा दिला ! दुध सांडलं ! कंदीलपण त्यानंच विझविला ! मी अगदीं खरं खरं सांगतें मामी ! --”
रंगी अगदीं मनापासून बोलत असल्याचें दाखवीत होती. आबा आणि 'गौराबाई यांना तें खरें वाटत होतें. पण रखमाला कांहीं बंका येऊन तिनेंच विचारलें--
“ रंगे, मग भुजंगराव तरी केव्हां बाहेर गळ ? चोराचा पाठलाग करण्याकरितां ते बाहेर पडले कीं काय़ ?--"
भुजंगरावांना वाटलें आतां ही संधि ठीक आहे. ते दरवाजांतून घाईने भांत येत येतच म्हणाले,
“आबा,तो चोरनसावा. तो माझ्या पाळतीवर आलेला इसम असावा, तो माझा शोध रंगोजवळ काढीत असावा ! मीही कांहीं बेसावध नव्हतो. मी त्याच्या माग लागलों. पण तो दरवाजांतून झपाट्यानें निसटला. मी चांगला ओढ्यापर्यंत त्याचा पाठलाग केला. पण तो आंबराईच्या अंधारांत पळाला---
भूजंगरावांचा शब्द कानीं पडला, त्याबरोबर रंगी घरांत निघून गली. तिच्याबरोबर गौराबाईही गेल्या. भुजंगरावांचें बोलणे ऐकन आबांना आइचय॑ वाटलं. त्यांना कसला तरी एक संदय आला. थोडा वेळ त्यांनीं आणखी विचार केला. त्यांना खात्री वाटली. आणित्यांनीं रखमाला विचारले,
“ रखमा, जवायला आलाय का ग सावळ्या तुझ्याकड ? ”
“ कालपासन् तो घरीं आलाच नाहीं-- रखमानें उत्तर दिलें.
“ मग तो कुठं असेल ? सदोबांना हांक मार बरें?
आबा संशयी मुद्रेने बोलले.
. रखमानेंच सदोबांना सावळ्याचें जवण देऊन मळ्यांत पाठविले होते आबांना सावळ्याचा संशय येत आहे, हें तिनें जाणले; तिला वाटलें--
“ भूजंगरावांच्या मागं सावळ्या हात धुवून लागेल देखील ! रंगी- करितां भुजंगराव येथं ठाण मांडून राहिले आहेत. तेव्हां त्यांना आणखी अद्क् घडावी, म्हणून आबांच्या वाड्यांत सावळ्या येण्याचा संभव आहे--"
३४ साखर गोटी
रखमा लवकर उत्तर देत नाहीं, हें पाहन आबा रागाने म्हणाले
रखमा, बोलत कां नाहोंस ? मला कळतंय सगळं ! हा सारा
बंडावा सावळ्याचा दिसतोय ! तुला नाहीं पटत ?--"
रखमाला आबांच्या म्हणण्यांत कांहीं अर्थ असावा, असें बाटत होतें. इतक्यांत भूजंगरावच जोरानें म्हणाले
“तो सावळधाच ! माझी खात्री झाली अगदीं ! नाहीं तर आंबराईं- नील साखरगोटीच्य़ा बाजूला कोण पळत जाणार? काय दृष्टपणा हा ! मी म्हणत होतों, कालच्या तंट्यामुळे पोलिस आले, तर त्यांना थातूरमातूर करून द्यावें वाटस लावन ! फार तर सेन्यभरतींन घ्यावं त्याला ! पण ट्याचं कपट आतां चांगलंच कळलं-- . औ. "७
भजंगरावांचें बोलण एकन आबांनींही एक सुस्कारा टाकला आणि त म्हणाले,
“ साखरगोटी उतरण्यांत मला सावळ्याचा खोडसाळपणा दिसला ! वापाची झाली तीच गत पोराची व्हायची, दुसरं काय ? --"
रखमा आवबांचें बोलण एकत होती. आवांच दृष्टाव्याचे उद्गार तिच्या मनांत भीति उत्पन्न करीत होते. त्यामूळे तिचे आंग थरारले !
“ रखमा, जा सदोबांना माझ्याकड पाठव पाहं.--
आबा म्हणाले. त्यांना आतां भुजंगरावांशीं बोलावयाचे होतें. म्हणून त्यांना रखमा तेथ नको होती.
रखमालाही तेथे उभ राहाणे नकोच होतें. तिला सावळ्याला इशारा द्यावयाचा होता. सदोबा मळ्यांत गळे होतेच. त्यांना हांक मारण्याच्या निमित्ताने ती तडक मळ्याकडेच गेली. तेथे सावळ्याचे मित्र दिसल्यामळ ती त्याला विशष कांहीं बोलली नाहीं. सदोबांना घेऊन ती जलदीने घराकडे निघाली होती.
तिला पोंचविण्यासाठीं सावळ्या त्यांच्या बरोबर आलाच होता. ते सवे हळहळ बोलत आबांच्या घरापयंत आले |
रखमा मळ्यांत सदोबांस. हांक मारण्यास जात आहे, हें रंगीस माहीत होतें. त्यांच्याबरोबर सावळ याही आल्पाधिवाय राहाणार नाहीं. अशी तिची
-- -- ------:<:--:---: “पापा “>>> णाल
बाया“. “ ८ “णा
चांडाळ चोकडी ३५
>--ऱ्क व्शा क ाटरकाणशाएपापाशाणपीणी "टणाटण
कल्पना होती. म्हणून ती ब्हिदिशेच्या निमित्ताने तपेळी घऊन वाड्याच्या बाहेरील बाजूस घुटमळत होती.
अपेक्षेप्रमाणे रंगीला सावळ्या भेटला. तिला सारी गंमत सावळ्याला केव्हां सांगेन असें होऊन गेलें होते. पण खाजा, बजा वगेरे मित्रांनी धांवतच येऊन तेथे सावळ्याला गांठलं.
सारेजण सदोबांच्याच घराकडे वळले. घरांत गेल्याबरोबर तेथे रखमा एकळेली हक्तीकत सर्वाना सांगत होती.
मिस्क्रिल रगी एकसारखी हंसत होती ! सावळ्या तिच्याकड कोतुकानें पाहात होता ! रॉ क्र क
पण त्याचवेळी भुजंगरावही सावळ्यासंबंधी आबांजवळ बोलत होते. अर्थातच ते सावळ्यास कळण शकय नव्हतें !
भुजंगराव म्हणत होते--
“ सावळ्याचा कांटा प्रथम येथून काढला पाहिज, आबासाहेब ! फारच डाळ नासली आहे त्यानें ! त्याला संन्यभरतींत कसें तरी गंतवा आबासाहेब ! गू रपणा दाखविण्याची संधि पुन्हा येणार नाही अशी ! ' साळुंख्यांच्या कुळाचा मोठेपणा वाढविशील त् ! नतर रंगी पण तुला देईनच कौं ' असं कांही तरी सांगा आणि घाला त्याला एकदां रिक्रूटभरतीत ! --
“सर हें सारं भजंगराव '' आबा बोल लागले, “ कार्टीला पण आतां जास्त कळू लागलं आहे. तीही पण अलीकडे त्याच्या मागे मागेच असते. तेव्हां त्याला येथून उचलला पाहिज, हें खरं--''
भ॒जंगराव थोडा वेळ स्वस्थ होते. त्यांच्या मनांत आणखीही भयंकर विचार येत होते. तसे करण्याचा निश्चय त्यांनीं त्या वेळी केलाच. पण आबांना त्या वेळीं तो त्यांनी सांगितला नाही. तसें करण्यास त्यांना ती संधि योग्य वाटत नव्हती. कारण आबांच्या पत्नी गौराबाई ह्या जेवणाची वर्दी देण्यासाठीं किती वेळ तिष्ठत उभ्या असलेल्या भूजंगरावाला दिसत होत्या. आबांचें त्यांच्याकडे लक्षच नव्हतें !
त्या दिवशीं जेवणास बराच उशीर झाला होता. मोलकरीण एका बाजूंच्या कोपर्यांत पेंगत बसली होती. आबांच्या घरी आवशीस गडीमाडसे
३६ साखर गोटी
०४०५५८४४५१ “४५५४ 0५४१८५” ४५५” “८ 0"/*/५/५/ “7५7 ८५ “ह १८ ८ “५५ /५* १८५५४ * *१५४५४५/४४१४१/%/५४४-॥५ ९४/४५/१४७७
नसत; तीं आपआपल्या घरीं जेवावयास जात. रात्रीं मात्र राखणीस सर्वजण वाड्यांत येत असत. तीं येऊन झोंपली देखील होतीं ! बारा वाजण्याचा 'मुमार झाला होता त्या वेळीं !
जवणास बसत असतां आबांनीं रंगीची चौकशी केली. ती घरांत नसल्याचें त्यांना समजलें. त्यामुळे आबांना तिचा विलक्षण राग आला. ते गोराबाईंनाच वेडवांकड बोल लागले. रंगी रखमीच्या घरीच ह्यावेळी गेली असली पाहिज, हें त्यांनीं ताडले.
ते जेवणाच्या पाटावरून ताडकन उठले आणि रखमीच्या घराकडे चाळले.
रखमाच्या घरांत निरतांच आबांना अनपेक्षित देखावा दिसला !
खाशा, बजा वगरे गंड तेथे त्यांना दिसले.
त्पांनीं अळीकडे लोकांवरीळ आबांच्या दबदब्याचा फुगा फोडण्यास -सुरुवात केली होती !
आबा त्यांना चांडाळचोकडी म्हणत.
त्या मंडळोंत सावळ्या होताच आणि रंगीही पण होती.
त्यामुळे आबांच्या आंगचा भडका उडाला !
अकल्पित घटना व्हे
मक | ५:८० ७००७००.
बा ज्यांना गड किवा चांडाळचौकडी अशीं नांवे ठवीत, तशा गडांच्या टोळ्या महायुद्धाच्या सुरुवातीनंतर सात आठ महि-
न्यांच्या अवधींत पुष्कळ ठिकाणीं निर्माण झाल्या होत्या. त्या गुप्तपणानें आपला कारभार चालवीत असत. तर्हेगांव तालवयात त्या टोळ्यांनी बराच धुमाकूळ घातला होता !
ह्या टोळ्या त्या भागांतील श्रीमंत लोकांना धाकदपटशा दाखवीत ! त्यांना खंडण्या मागत ! त्या सक्तीनें वसूल करीत. कोणी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला, तर रात्रीं बेरात्री त्यांच्या घरावर हल्ळे चढविण्यास ह्या टोळ्यांतील लोक कमी करीत नसत !
आणि गंमत अशी कों, हे लोक अशा प्रकारें मिळालेलं धन, किवा धान्ये पुष्कळसे गोरगरिबांना वांटीत !
ह्यामुळ कंगाल स्थितीतील लोकांची सहानभति ह्या लोकांकडे झुके. त्या लोकांच्या दऱयाखोऱ्यांतील झोंपड्या किवा गांवांतील लोकांचें लक्ष जाणार नाही, अशी मोडको तोडकीं घरें त्यांचीं आश्रयस्थाने होत !
मध्यम स्थितीतील लोकांच्या नजरेस ह्या टोळ्यांतील लोक पडत नसत असें नाहीं, पण कोणी जावें त्यांच्या वाटेला, असें म्हणून दे केव्हांही आपल्या कानांवर हात ठवीत ! र
पानगांवचा मन्या रामोशी ह्या सर्व टोळ्यांचीं सुत्र अत्यंत गुप्तपणे आणि कौशल्याने चालवीत असे ! तो त्याचा ग॒प्तपणा इतका असे की, भजंगरावांना देखील त्याचा यत्किचित संशय वाटत नव्हता ! भुजंगरावांचा मदतनीस म्हणून त्याची ख्याति होती. भुजंगराव संन्यभरतीच्या दौर्यावर
पाभर क» पयला ८-५ पशाणापापणण शीण परश शी ी?0ती
३८ साखर गोटी
असोत किवा सरकारी अधिकार्याच्या भटीस निघोत, मन्या त्यांच्या बरोबर अगदीं सावलीसारखा अस.
मन्या रामोजी सडपातळ, मध्यम उंचीचा, पंचविशी उलटलेला तरुण होता. तो निमगोर्या वर्णाचा आणि सरळ नाकाचा असून त्याची दष्टि अत्यत ती&ण होती.
चपळाइत त्याची बरोबरी करणारा तरुण क्वचितच सांपड ।! उच उंच भितींवर तोल सांभाळून चढण, काठीच्या साहाय्यानें उंच कृपावरून उडी मारून जाण, बंदुकीने नम बरोबर साधण हा तर त्याच्या हातचा मळ अस
मात्र त्याच्या अंगी असलेला सांगण्यासारवा कोणता मोठा दोप असेळ, तर तो दारूच्या व्यसनाचा होय '
ह्या नव्प़ा तरुणांनी श्रीमंत लोक म्हणजे भांडवलवाळे आणि गरीव लोक म्हणजे मजूर असल्या तत्त्वज्ञानाची भाषण पुष्कळ सभांतून एकली होती. त्यांचा पगडा त्यांच्यावर चागलाच बसला होता! ह्या अधेवट ज्ञानाचा विकृत परिणाम त्यांच्या चळवळीत झालेला दिसून येत असे!
भुजंगरावाबरोबर सेन्यभरतीच्या सभांना मन्या लष्करी गणवेप घालून जात असे.
आदश सैनिकाचा नमुना म्हगून भजंगराव त्याच्याकडे बोट दाखवीत.
मन्या अद्या सभांना गला म्हणज तो दलित वर्गाचे सुक्ष्म निरीक्षण करी. त्या वेळी त्यांची कमाळीची विपन्नावस्था त्याच्या नजरेस येई. अज्ञाच एका सैन्यभरतीच्या दूरच्या दहिवडीच्या सभेस भूजगरावांना दुसऱया दिवशी जावयाचे होतें. त्याची आठवण त्यांना राहिली नव्हती. पण त्या दिवशीं सकाळी मन्या भुजंगरावांची मोटार घेऊन आला, तेव्हां एकदम व्यांच्या लक्षांत ती गोष्ट आली.
प्रवासाची तयारी करीत असता भुजंगराव आबांना हळुहळू सांग नठागले-- |
“रंगीवर चांगली नजर ठेवा, आबासाहेब ! सावळ्या बिघडवील तिला ! आतां सावळ्याचा कांटा काढे लवकरच ! पोलिस स्टेशनवर जाऊन सावळ्याची चांडाळचोकडीच गिरफदार करण्याची तजवीज करीत आहें, मी !
- | 4-2 नाट
पपा हयाचा 7 "५ 0 ऱ २ >>> न
शषेकल्पित घटना ३९
०-८ ५ » १.८ २... २-४ ऱच्ळ २.” १५-&%४४_ “४.१५ /% “/% //% »/४_”/% » ५/”/",” २” २ ८ २.» ५. २ "% 7".४80%. «- ७ २,» २, ८०९२ *६_.»० ५/ ४ ५. “११.” ४१.” ४८ * ८ ५, १५ ५ ४० फव
पोरटीला आतां घरांतच डांबून ठवतों,. तुम्ही तिची काळजी करूं नका, भुजंगराव--' , , , आबा जरा चाचरतच बोलले | ज्र , ऱ््ॅ जे ठरल्याप्रमाणे दहिवडीस दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास भुजंग- रावांची मोटार आली
तेथ पन्नास साठ गांवची तरुण आणि मध्यम वयाची पुरुष माणसं जमलेली होती. त्या भागांत त्यावर्षी पुरेंसें धान्य पिकलेले नव्हतें, त्यामुळे तेथील लोकांची अन्नान्न दणा झालेली होती.
सभस आलेल्या तरुणांत बरेच जण पाप्यांच पितर दिसत होते! कपडालत्ता महाग झाल्यामुळे त्या लोकांचें नसण्याचें वस्त्र अपुरे होतें ! त्यांच्या पेरणी फाटलेल्या होत्या ! त्यानी खाद्यावर टाकलेल्या घोंगड्यांना मोठ मोठ भोसके पडलेले होते ! विलक्षण महघंतेमुळे जनावरांना लागणाऱ्या चार्याकरितां त्यांना पसा पूरा पडत नव्हता; त्यामुळे त्यांच गाई, बेल कसा- यांच्या दावणीस गळे होते ! लळोकांची ही हृदयद्रावक स्थिति पाहन आणि त्यांची सारी माहिती एंकून मन्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले ! भजंग- रावांच्या हृदयालाही पाझर फुटला !
आपल्या भाषणांत प्रथमच भजंगराव म्हणाले--
“ सेन्यांतच सर्वाना दाखल होतां येईल, असें नाही. तरुणांना तसें करणे हक््य आहे. इतरांना गहरांत चाललेल्या य॒द्धाच्या अनेक कामधंद्यांत पुष्कळ मजुरी मिळेल. तरी त्याचा फायदा लोकांनी घ्यावा. म्हणजे त्यांची झाळेळी अन्नान्न दगा तरी कमी होईल ! --”
एका खंडवळाने मध्येच विचारले--
" पुन्या म्हम्हइंत लड कामधेंदा मिळल म्हनतां. पन ततं जान्याला, आट चार दिस जगन्याला पेस हवंत ना ? त्या लंकंत सोन्याच्या इटा हती ! हतंच आमाला कामद्या ! --
“ कांहीं हरकत नाहीं. आपण तसाही प्रयत्न करू '”. वेळ मारून नेण्या- करितां कांहीं तरी बोलावयाचे म्हणून भुजंगराव बोलले.
नंतर ते आपल्या मुख्य विषयाकडे वळले.
9० साखर गोटी'
//४%-८४% /४- १९/९२/४७७४ “7 ७ “१ “०७ ४१ ८ /%५ >». ५ आ. २८ /९ “र. “€*-५/६/* /* »५/५९- »५./५५//५९५.”१ -”*०*५./-/४,
कौग्रेसच्या चळवळींत चांगले वक्ते म्हणून भुजंगरावांची प्रसिद्धि झाली होती. पण आज त्यांच्या वक्तृत्वाचा जम बरोबर बसेना. त्यांचें सारें लक्ष आंबंगांवाकडे गेलेलें होतें.
तशा मनस्थितींत भजंगराव जं कांहीं बोलले त्याचा सारांश असा होता-
“ मराठ्यांच्या काळीं आपल्या माणदेशी तट्टांनीं दिल्ली गांठली होती ! तेव्हांच्या संताजी घोरपडे, धनाजी जाधव ह्या शूरांची आठवण करा; आणि संन्यांत दाखल व्हा ! आतां कोणालाही संन्यांत प्रवेश मिळतो. आतां येथं लष्करांत दाखल झालेले कांहीं लोक आले आहेत. त्यांना खुशाल विचारा. त्यांत ठक््या मांग, बहिरू कोळी, मारुती जमदाडा वगरे लोक आहेत.
लष्करी पोषाखांतील मन्या रामोशी कसा तरतरीत दिसतो तो पाहा. तुम्हांला पगार, खागें, पिणे, कपडालत्ता लष्करांत भरपूर मिळेल. तुमच्या बायकापोरांच्या पोटापाण्याची सोय सरकार चांगली करील--”
भूजंगरावांनीं भाषण लवकरच आटोपतें घेतलें.
अन्नाला मोताद झालेल्या पुष्कळशा तरुणांनीं सेन्यभरतींत नांवें दाखल केलीं. कांहींना वाटलें,--“ आज दोन घांस तरी सुखाने खाण्यास मिळतील. घरी उपाशीं मरण्यापेक्षा संन्यांत दाखल होण्याने भुकेनें होणारे हाल तरी वांचतील ! --”
मुकेच्या यातनांपेक्षां अधिक दुःखदायक यातना तरी कोणत्या असणार, असें वाटून निभयतेनें लोक नांवें नोंदोत होते !
दहिवडीचीं कामें आटापतांच भुजगरावांची मोटार सायंकाळच्या सुमारास परत निघाली. प्रथम आपल्या पानगांवीं जावें, असं त्यांनीं ठरविलें होतें. पण सावळयाचा बंदाबस्त करण्याकरितां ते प्रथम तालुक्याचे ठाणें असलेल्या तऱहेगांवींच गेले. तेथे त्यांनी आपल्या मनासारखी सगळी व्यवस्था करून घेतली. त्यामुळें त्यांच्या मनास जरा समाधान वाटलें.
आणखी चार पांच दिवस भुजंगराव दोर्यावरच होते. आपल्य! गेरहजेरींत सावळ्याचा सूड उगवला जावा, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनो दोर्याचा कार्यक्रम वाढविला होता !
दोऱ्यावर असतांना मन्या भुजंगरावांच्या सर्व हालचालींचा मोठ्या कौशल्यानें उपयोग करून घेत असे. संन्यभरतीकरितां ज्या सभा होत 'त्यांत
नन व्यक. (पन. 0) फज्जा नने हा -. जे विंबुन.,्ं ॉेबऑशश॒ररषिबा
क नटला ककटटापीणा तीण
अकल्पित घटना 9९
क यक अ २७.७४ १७.५७ ४४%. ७४ ७...” ७.४ ४७.४ ४.५ ४.” ७.५ ४७.५१, ३७.४ ७../४ ३... ७.४ २४ ४७.७ '१2...४/ 0५७... ._./” 70७...४” ऐ७-४०१ 487७७ कचव '२..५४७..८०७...५४/ के...७४ १३...«””....४” २५...» १७. .& पके..&£ ४...” २..&” पे, ५”... १.७४” ७. ४४१७४४ च.” २७, .£” १७...” "र%..४०” १.४” १७...४” के...” *..& १७.० ७...७/ २७४७७.” “ये
त्याचे अनुयायीही जमत असत ! आपल्या कामाला योग्य असे तरुण शोधून ते त्यांना आपल्या जाळ्यांत ओढीत असत. शिवाय भुजंगरावांच्या कार- स्थानांची बित्तंबातमी मन्या मिळवीत असल्यामुळें सावळ्या, खाशा वगेरेंना तो आंतून अगदीं बिनचूक सूचना देत असे !
भुजंगराव रंगीकरितां फार उत्सुक आहेत, हें मन्याला माहीत झालेलें होतें. मन्याशीं बोलतांना मधून मधून तो विषय भुजंगरावांच्या तोंडून निघे.
दोरा संपल्यानंतर ते पानगांवीं जाण्यास निघाले. मन्या आणि भुजंगराव हे दोघंच त्या वेळीं मोटारींत होते.
मन्याचा आणि सावळ्याचा आंतून फार लोभ आहे, हें भुजंगरावांना माहीत नव्हतें, त्यामुळ ते जरा मोकळेपणाने मन्याला म्हणाले--
“* मन्या एक काम कर कीं! सावळ्या, खाशा वगेरेंना रिक्रट- भरतींत आण को! ...”
“ सावळ्याला मी संन्यभरतींत दाखल करतोंच बघा. ” मन्या झटकन म्हणाला, “ पण खाशा, बजा ह्यांना मी नाहीं भरतींत आणणार ! ---”
“तसं कां पण ?--
भुजंगराव मन्याकडे तीक्ष्ण दृष्टीनें पाहात बोलले.
“ फक्त सावळ्या एकदां दूर गेला, म्हणज तुम्हांला रंगी मिळणार ! मग दुसरे काय करतात आपल्याला ?
मन्या भूजंगरावांना टोंचून बोलला !
“ मन्या, तू भुजंगरावाला अजून ओळखलं नाहींस! रंगीपेक्षां सवाई पोरी माझ्या पायाशी लोळण घालीत येतील ! रंगीकरितां झुरणारा मी माणूस नाहीं ! ' भ्जंगराव आवेशाने म्हणाले.
“मी कुठं म्हणतो तसं ! “ मन्या बोलं लागला, “ रंगीचं तुमच्यांवर मन आहे मला ठाऊक आहे! पण सावळ्या तिला नाचवील, म्हणून माझं म्हणणं असं ! सावळ्याला तुरुंगच दाखवावा भुजंगराव ! ”
मन्या अगदीं भ्जंगरावांच्या मनांतलेच बोलत होता. त्यामुळें ते त्याच्यावर खूष झाले आणि सावळ्यावर आपण कोणते आरोप .ठवले आहेत; आबांनीं देखील त्याच्याबद्दल कोणत्या तक्रारी केल्या आहेत; पोलिस
पट ण णा पी प?0ट0ीणी0ी000 ण 2 क ज्य अककेकळक ककी. -. “__ -- -प--- ---- > -_ -८ ---- ऱ्ह -ट--र----- -> ह यास मिळना यी कमान
४२ साखर गोटी
सावळ्याला केव्हां पकडणार आहेत; वगेरे गुप्त हकीकत त्यांनीं मन्याच्या कानांवर हळुहळू घातली !
त्याच वेळीं मन्याला भजंगरावाच्या विषारी अंत:करणाची चांगली कल्पना आली !
मन्यानेच भुजंगरावांना आतांपर्यंत चांगला हात दिला होता. श्रीमत पण केलें होतें!
मन्या लहानपणापासून चोरीचा धंदा करी. त्याच्या बापाने त्याला त्या धंद्यात प्रवीण केलें होतें !
मन्या संस्थानच्या हहीत दरवडे घाली आणि मिळालेले सोनेंनाण भुजंगरावांच्या स्वाधीन करी ! भुजंगराव तें आटविण्याची व्यवस्था करीत ! मन्याला जरूर लागल तेवढे पसे देत ! पण ते मिळालेल्या संपत्तीच्या मानानें अगदीं अल्प असत ! पांच सहा वर्षांच्या अवधीत भुजंगराव चांगले श्रीमंत झाले होते. सरकार दरबारींही त्यांनी वजन ठंवले होतें. राजकीय' चळवळींतही ते मराठ्यांचे पुढारी म्हणून नांवारूपास चढले होते. अशा रीतीनें संपत्ति आणि सत्ता त्यांच्या पायांशी लोळण घालीत होती.
फक्त एकच' उणीव त्यांना भासत होती ! ती प्रेमाची उणीव भरून काढण्याकरितां त्यांच्या आतां खटपटी चालल्या होत्या !
मन्या त्यांच्या बरोबर नेहमींच असे. तो त्यांचा शरीरसंरक्षक होता असें म्हणण्यास हरकत नव्हती. त्यानें भूजंगरावांच्या संगतीनें पुष्कळ राज- कीय सभा पाहिल्या होत्या. त्यामुळे चांगल्या चांगल्या लोकांचीं भाषण त्याच्या कानांवर पडलीं होतीं. त्यांतील श्रीमंतांविरुद्ध गरीब; भांडवल. वाल्यांविरुद्ध मजूर असल्या विचारांची भाषण त्याला पटत होतीं.
कां नाहीं पटणार ? कंगालांना मोहिनी घालणारी जादू ह्या तत्त्वज्ञानांत आहेच.
अलीकडे त्याला भुजंगराबांच्या लोभी वृत्तीचा तिटकारा येऊं लागला होता. त्यांनाही आपल्या कर्तबगारीची थोडी चुणूक दाखवावी, असें त्याच्या ममाने घेतलें होतें! आज तो त्याच विचाराच्या तंद्रींत मोटार चालबीत होता !
पानगांवच्या खिडीजवळ मोटार आली. त्या वेळीं बराच अंधार
“अकल्पित घटना ४६
"२९-५०. “५८५ ४-८ €“-“. 5“: *“< *“*< व *>* “४-४ २ ४-४ ४-९४१४/१* १८४४-४५ ४४८ ४० 09०४०0१५७० ७००७, “धका.
पडला होता. सडकही चांगलीश्ी नव्हती. मोटार सावकाश चालविण भाग होतें.
खिडींतून मोटार पुढ जाऊं लागळी. पण एके ठिकाणीं रस्त्यावरच दगडांचा ढीग घातलेला दिसला ! मन्या सावध होता म्हणन बरं, नाहीतर अपघातच' होणार होता ! त्याला मोटार थांबवावी लागली !
इतक्यांत मोटारीवर हल्ला ज्ञाला ! भजंगराव गांगरून गळे! खिशात पिस्तूल असून ते बाहेर काढण्याचे त्यांना सुचना ! मन्या मात्र बंदुकीच्या फेरी झाडत होता. त्याच्या गोळ्या अचूक लागल्या की काय कोणास ठाऊक ! हल्ला करणारे पळून गले खरे !
भुजंगरावांना हा नवा अनुभव मिळाला. पुन्हा दरवडेखोर हल्ला करतील, अशीही भीति त्यांना वाटली. म्हणन ते परत तर्हेगांवकडे निघाले
तर््हेगांवीं पोलिस-ठाण्याजवळ त्यांची मोटार थांबली. भुजंगराव आपली बंग शोवू लाग. त्यांना ती सांपडेना. तेव्हां भुजंगराव म्हणाले--
“ मन्या, आपली बंगरे कोठे आहे ? चोरट्यांनीं लांबविळी तर नसेल ना ?...
मन्या काहीं बोलेना. तो कसल्या तरी काळजीत दिसत होता. तेव्हां त्याला भुजंगराव म्हणाले---
मन्या बोल कौं ! बंग कोठ आहे का पाहा! कसला विचार चालविला आहेस? ...''
“जाऊंद्या बॅग ती! चोरट्यांनी लांबविली असेल ! पण मला वाईट वाटतंय, माझ्या बंदुकीनं कोणी मेळें तर नसेल ना ? माझ्या हातून हिसेचें पाप घडलें भुजंगराव ! तुमच्याजवळ पिस्तूल असून तुम्ही उडविळं नाहीं! मीमात्रपापकेलं!... ... |
“ अरे, पाप कसले आहे ह्यांत ?--”
“ पापच तें ! मी आहे गांधींचा चेला ! मी नाहीं कोणाला मारणार ! ”
“ वारे गांधीच्या चेल्या ! महात्माजी दारू पिऊं नको म्हणून सांगतात, मग तू रे कशी दारू पितोस ?--
“ सखीची खोड मोडण्याकरितां मी दारू पितो भुजंगराव? ती -म्हणते दारू पिऊं नको. मी मदद बायांच्या आहारीं जाणारा नाहीं भुजंगराव !
>>>. ाा----प-----*-- -भ-->>>>--
9४ साखर गोटी.
बायकांच्या नादीं लागणारे भित्रे होतात. रंगीचा ध्यास लागला म्हणून तुम्ही भ्याला ! खिशांतलं पिस्तूल देखील तुम्ही काढलं नाहीं ! --”
मन्याचें तत्त्वज्ञान उपरोधिक होतें, हें भुजंगराव जाणत होते. त्यांच्याशीं. फुका वाद करण्याचें त्यांनीं थांबविले.
बॅग गेली! तिच्याबरोबर तींत असलेले दोन हजार रुपयेही गले !' पेसे गेळे म्हणून भुजंगराव तळमळत होते ! मद्य घेण्यास पेसा राहिला नाहीं, म्हणून मन्याही तळमळूं लागला !
ह्या अकल्पित घटनेनें सावळ्यावर आणखी आरोप आणतां येतील, असें लक्षांत आल्यावर भुजंगरावांची तळमळ कमी कमी होऊं लागली.
भुजंगरावांस ठरल्याप्रमाणे अगदीं बेमाल्म चाट बसली ; आपण ठरविलेली गोष्ट बिनचूक पार पडली; ह्या आनंदांत मन्या देखील आपल्या. आवडत्या दारूला त्या रात्रीपुरतें विसरला !
नवा खटाटोप प
चि १-टटटणा भान >>. - * ८*./४%-/१%.” ४.” ४ “९ /%५ ”% ४ /”% ८८ //% “२.
रंगीला घराबाहेर जाऊं द्यावयाचें नाहीं, हें आबांचें म्हणणें गौरा- बाईना पटेना. अशा रीतीनें तिला वागविल्यास त्यांत आपलेच
हंसें होईल, असें त्या म्हणं लागल्या. पण प्रथम आबांना आपल्या पत्नीचे म्हणगें पटलें नाही.
वास्तविक पाहातां आज आबांना आलेलें ऐशवये रंगीचेंच होतें. आबा राहात असलेला वाडा रंगीच्या वडिलांचा होता. अर्थात् तो तिचा एकुलता एक भाऊ हिंमतराव याचा होता. आबांनीं तरुणपणीं नाना रंगढंग केले होते. त्यामुळ त्यांना कज झालें होते. हिमतरावांचा जमीनजुमला, पेसाअडका हातीं आल्यानें ते क्रणमुक्त तर झाले होतेच, शिवाय आंबेगांवच्या सधन गृहस्थांत त्यांची गणना होऊं लागली होती ! असें असतां त्या संपत्तीच्या खऱ्या मालकिणीला बंधनांत ठवण्याचें पाप आबा करीत होते !
पण आबांच्या मनाला कसल्याच पापाची दिक्कत वाटत नव्हती. ह प्राप्त झालेलें एश््वय देखील आबांच्या पदरीं सरळ मार्गानें पडलेलें नव्हतें, असा लोकापवाद होता खरा ! पण तसल्या लोकापवादाची पर्वा आबांना नव्हती. हिमतरावांच्या मत्युपत्राप्रमाण त्यांच्या मिळकतीचा ताबा सरळ आबांकडे आला होता.
ह्या कामांत गुंड॑ंभट आणि मगनशेठ ह्यांची सववस्वी मदत आबांना झाली होती, त्यामुळें तें मृत्युपत्र बनावट असल्याचा भाऊबंदांनीं केलेला दावा खोटा ठरून आबा विजयी झाले होते !
पण त्यांचें आंतलें मन सांग कीं, हिमतरावांची सारी मिळकत रंगीचीच
> णा “*
9६ साखर गोटी
आहे ! म्हणूनच रंगीला घरीं डांबून ठेवावे, तिचे बाहेर जाण बंद करावें, असे भजंगरावांनीं सुच विळे असले, तरी आबांना मनापासून तें तितकेसं पटत नव्हतें!
गौराबाईंना रंगीच्या शुद्ध आचरणाची जाणीव असल्यामुळे त्याना ती कल्पना देखील पसंत नव्ह्ती. पण बायकोच्या मताची तितकीशी पर्वा करणारे आबा नव्हते.
आंबराईतील मळ्याची राखण रंगी अशी काळजीने करी की, तें काम पगारी गड्यानेंही होणे शक्य नव्हतें. ही जाणीव आबांना होती. पण रंगी मळ्यांत गेल्यास सावळ्या तिला भेटेळ आणि आणखी नव्या कटकटी निर्माण होतीळ असें त्यांना वाटत होते. म्हणून थोडे दिवस त्यांनीं तिला मळ्यांत जाऊं दिल नाही.
सावळ्या आणि रंगी यांचा विवाह व्हावा, अशी आवांची पहिली इच्छाही होती. सावळ्या भाबडा आहे, तो कांही हिमतरावांची मिळकत रंगीच्या मालकोची आहे, असं म्हणणार नाहीं. त्यामुळे तंटाबखडा केव्हांही माजण्याचें कारण नाही, असें त्यांना वाटत होतें.
पण “ साखरगोटी माझी आहे, मीच तिचे आंबे उतरणार ” ह्या सावळ्याच्या वल्गनांनीं आबांचे सावळयासंबंधीं पहिलें मत बदलले !
भूजंगरावांचा स्वतःचा मोठा जमीनजुमला आहे. त्यांच्याजवळ आतां मायाही चांगली झालो आहे. त्यामुळ रंगीच्या वारशाच्या हक्काचा विचार त्यांना य:कठिचित वाटेल. रंगीचे सौंदर्य हेंच भुजंगरावांना बहुमोल वाटत. आहे, म्हणून आबांची सहानुभूति आतां भुजंगरावांकड वळली होती.
पण लग्नाचा विचार असा व्यापारी पद्धतीनें होण्याचे जूने दिवस गले. प्रेमाच्या ओलाव्यानेंच ह्या विचारांची जोपासना होते आणि ते सुफल होतात, ही नवी जाणीव आबांना तितकीशी नव्हती !
रंगीकडे वारसाहक्काने जाणार्या संपत्तीकडे भुजंगराव दुलंक्ष करतील, अशी खोटी आशा आबांना वाटत होती. गरिबांना वाटणार्या संपत्तीचा मोह फार थोड्या प्रमाणांत असतो. संपत्तीच्या वाढत्या प्रमाणांत श्रीमंतांचा हा मोह वाढतच जातो. त्यामुळे क्षल्लक फायद्याकरितांही ते प्रयत्नांचा
नाग ----><--[>----प-नापपपपप---पपप-ापपाी८ प पी प २000२00 २0000४
नवा खटाटोप 2७ आटापिटा करितात, ह्याची जाणीव आबांना नव्हती. आपल्या स्वार्थापुरतें आपल्याच दष्टीनें पाहाणाराची अशीच स्थिति असते !
निवडगुकींत मतें मिळवून देण्याचें कोशल्य भूजंगराव आणि आबा ह्यांच्या अंगी आहे, असें काग्रसच्या पुढार््यांनाही दिसून आलें होतें. म्हणून काग्नेसच्या अमदानींत भुजंगरावांवरोबर आबांनाही मानमरातब मिळ लागला होता. कौग्नरेसच्या मद्यपानबंदीची झळ आबांनाही लागली होती. कारण त्यांचा गांव दारूबंदीच्या कक्षेत होता. त्यामुळे त्यांना स्वतःला मद्याचा घोट मिळण दुमिळ झाले होते !
आतां तिकडील मद्यपानबंदी उठावयाची होती. आबांचा विचार भूजंगरावांच्या साहाय्यानें एक दोन गृत्त्यांचा मक्ता घेण्याचा होता. त्यांत पृष्कळ फायदा होईल, अशी त्यांची कल्पना होती, म्हणूनही भुजंगराव सध्यां "यांचे आवडते झाले होते !
त्यांच्या आवडीचें हें कारण गोराबाईनी जाणले होते. रवमालाही तें कळलें होतें.
स्वार्थाच्या रोखानेंच आबाच्या हालचाळी चालत असत. शोंताची राखण', गाई म्हशीची जपणूक रंगी फार काळजीनें करी. वयामुळे आबांचा त्रास वांचे; पेसा वांचे आणि मनासारखी काम होत. म्हणूनही रंगी त्यांना प्रिय होती.
दोन चार दिवस रगीला घरांतच डांबून ठवल्यानें तिच्या हातून हीं काम होईनात. आबांचे नुकसान होऊं लागलें.
गाय दूध देईना ! मळ्यांतील भाजीपाल्याची चोरी होऊं लागली !
सावळ्या गांवी नव्हता. चार पांच दिवस कोणास त्याचा ठाव ठिकाणा समजलेला नव्हता. खाक्या, बजा वगेरे त्याचे मित्रही गांवीं नव्हते. कोणी म्हणे, सावळ्या संन्यांत शिरला. कोणी म्हणे, सावळ्याला पोलिसांनी पकडले !
ह्या बातम्यांनी रंगी काळजींत पडली. तिला कांहीं सुचेना. तिच्या हातून कामधंदा होईना. ती चिडखोर बन लागली.
भुजंगरावांच्या फजितीची खरी हकीकत तिनें अद्यापि कोणास
9८ साखर गोटी
सांगितली नव्हती. रखमास देखील ती कांहीं बोलली नव्हती । ती गंमत सावळ्याला प्रथम सांगावी, अशी तिची इच्छा होती. त्याकरितां ती त्याची वाट पाहात होती. पण सावळयाचा पत्ताच नव्हता !
रंगी उदासवाणी झाली. तिला अन्नही गोड लागना. गौराबाईना तिच्या मन:स्थितीची कल्पना आली. पण त्यांना कांहीं करितां यंत नव्हतें !
आबांच्यावर त्यांचें तितकेसे वजन नव्हतें. त्या संदर होत्या, पण त्यांचा एक डोळा चकणा होता, म्हणून आबांना त्या आवडत नव्हत्या !
आबांचें खरें म्हणा किवा खोट म्हणा, रखमावर लक्ष होतें किवा प्रेम होतें. तसें कांहीं तरी होतें खरें !
रखमानें सांगितलेले आबा सहसा मोडत नसत ! गौराबाईंना त्यामुळें रखमाचा मत्सर वाटे. पण रखमाचें वर्तन शद्ध असल्यामुळे गौराबाईंच्या मत्सराची परिणति दषांत झाली नव्हती.
आबांचें मन वळविण्याचें सामथ्ये रखमात होतें, हें लोकांनाही दिसत असे; पण त्याचें कारण कोणी कांहीं म्हणत, कोणी कांहीं म्हणत; पण खरें कारण कोणांसच ठाऊक नव्हतें !
सावळ्या आणि रंगी याच्याप्रमाणेंच आबा आणि रखमा यांचें लहानपण शेतांत काम करण्यांत, खेळण्याबागडण्यांत गळें होते. लहानपणीं एकमेकांचा ओढा एकमेकांकडं असे. सावळ्या आणि रंगी याप्रमाणे आबा आणि रखमा हा त्या वेळचा लोकांच्या कौतुकाचा विषय होता !
आईबापाच्या लडिवाळपणामुळ रखमाचें लग्न लहानपणीं झालें नव्हतें. ती वयांत आली, तेव्हां तिचें लग्न आबांशीं लावण्याचा विचार तिच्या वडिलांचा होता.
आबा आणि रखमायर्यांचें लग्न ठरल्यासारखंही होतें ! पण मध्यंतरी कांहींना कांहीं कारणें झालीं. आबांना मिळकतीचा लोभ सुटला. रखमाच्या बाजूनें तशी मिळकत कांहीं मिळणारी नव्हती. फक्त तिचें प्रेम त्यांच्यावर होतें.
त्यामुळे तिच्या वडिलांनी करावयास सांगितल्यामुळे आबाकरितां करूं न्यत तीं खोटीं कृत्ये रखमानें केलीं व आबांचा गळा सोडविला !
नवा खटाटोप 9९
४१/६५/५१४४ ४४-४४” ४५५४० ४४ ह 7२ *६ शन २4 ९५४४ "५४४१ /७४४/४-४/% ४७ ४//४/१/१४७५९/ “१०९१. *७/७%-७
'पण दुसर्याच्या गळ्याला मात्र फास लावला ! तिनें प्रंमामुळ हें पाप केलें. पण त्यामुळे तिच्या सात्त्के मनाला रुखरूख लागली. आबाशीं लग्न केल्यानें असलीं अनेक पापें करण्याचा प्रसंग कदाचित् आपल्यावर अनेकदां येईल, असें तिला वाटलें ! इतक्यांत तिचे आईबाप साथीच्या रोगास बळी पडले ! त्यानंतर पुष्कळ दिवस ती उदासीनपणे वागली ! तिच्या मताचा निर्णय ठरेना ! आबांचा लकडा पण तिच्या मागे लागला ! तिच्या मनांत प्रेम आणि सात्त्विकता यांचा झगडा चालू झाला. अखरीस 'त्यांत तिच्या सात्त्विक वृत्तीने प्रमाला जिकलें ! तिनें आबाशीं लग्न करण्याचें 'नाकारून भोळया सात्त्विक वत्तीच्या सदोबांशीं लग्न लाविलें ! त्यामुळे आबा स्वेच्छाचारी बनले ! रखमाला फार वाईट वाटल ! तिच्याच खटपटीनें गौराबाईशीं त्यांचा विवाह झाला. पण अद्यापि रखमाचा शब्द त्यांच्याने मोडवत नसे. स्वार्थी व दुष्ट माणसाच्या अत:करणांतही कांही मऊ पापुद्रे असतात. तसल्याच प्रकारचा आबांच्या हृदयांत रखमाबद्दलचा हा नाजूक पापुद्रा होता ! ..4 > श्र सावळ्या मळ्यांत नव्हता. तो कोठं गला, हें रखमाला कळलें नव्हतें. सावळ्या मळ्यांत आला कीं, रंगीला आपण आपल्याबरोबर आंबराईत "नेऊ, असें रखमानें ठरविले होतें. सावळ्याच्या झोंपडीकडे तिची व सदोबांची नजर होती. ती झोंपडी म्हणजे सावळ्याचें तें मळ्यांतील लहानसें घरच होतें. त्याला कुलूप लावून सावळ्या पांच सहा दिवस कोठ तरी भटकत होता ! रखमा घरकाम आणि शंतकाम दोन्हीही मोठ्या हुंबाड्यानें उरकीत असे. ती आपला साधा सुधा प्रपंच तन्मयतेने करी. दिवसभर कामांत असल्यामुळं तिचा वेळ तेव्हांच निघून जाई ! एके दिवशीं ती आपल्या दूरच्या शतांतून घरीं चालली होती. तिच्या डोक्यावर वाळलेलें शेण भरलेली पाटी होती. दिवस मावळून गेल्यामुळे -ती झपझप पाय उचलीत होती. ती माळावरील उंचवट्याच्या जागीं आली. 'तेथून आंबराई तिला जवळच दिसत होती. पण अंधार पडूं लागल्यामुळें
अलका टाचण ण 0. 7 माळ न. 749: 299 ६७” :> >-३ ब प न्य 1 पक मती क
ष्ठ साखर गोटी'
घरीं लवकर जातां यावें, म्हणून ती आडवाटनें जाऊ लागली. त्या वेळीं अंध:कारानें आपले हातपाय चांगळेच पसरले होते.
त्या वाटेने लपत छपत एक व्यक्ति चाललेली होती. ती व्यक्ति कोण आहे, हें तिला ओळखतां येईना. तिचा पोशाक तिला विचित्रच दिसत होता. त्या व्यक्तीच्या डोक्यास चौकोनी टोपड्यासारखीं लोंकरीची काळी टोपी होती ! मिशा भरदार पण पांढर्या जुभर होत्या ! अंगांतील सर्व कपडं काळे कुळकुळीत होते !
रात्रीच्या वेळीं कोणी तरी हा चोरटा येत असावा, अस वाटून तिनें हातांत एक गोलसा धोंडा घंतला आणि ती म्हणाळी--
“* कोण आहे ?”' बोल नाहीतर हा धोंडा आलाच ! टाळक फोडल्या- शिवाय तो राहाणार नाहीं!
रखमाच शब्द त्या व्यक्तीने ऐकळे. आणि विशेष कांही न बोलतां ती व्यक्ति रखमाकडे यण्याकरितां वळली.
पुन्हां रखमा ओरडून बोलली-- |
“ खबरदार, पुढं पाऊल टाकशील तर! हा धोंडा आलाच बघ!”
रखमानें धोंडा फेकला. तो त्या व्यक्तीचें नेमके टाळकें सडकणार होता. पण असल्या प्रकारास ती व्यक्ति निर्ढावलेली होती. तिनें तो धोंडा चुकविला आणि जरा पुढ सरकून ती व्यक्ति म्हणाली,
“ रखमा मामी, दुसरा धोडा नको फक ! मी आहें!”
रखमानें त्या व्यक्तीचा शब्द ओळखला. आणि ती हंसली व म्हणाली,
““मन्या, मेल्या, कसलंर सोंग घतलस हें ! मला फसविलंस कीं!
मन्याही हंसला आणि म्हणाला,
“ मामी रामोशाची जातच अल्ली ! तूं भ्याली नाहीस ना?
“मन्या, खरं सांगते तुला ! माझा पहिला दगड चकला, तेव्हांच भ्याले मी! कारण माझा नम कधीच चुकायचा नाहीं ! तेव्हां हें भूतच असेल असं वाटलं मला ! किती दिवसांनीं,आलास इकडं ? सखी रडते आहे तुझ्या नांवानं ! तिला नांदवायची नव्हती, तर लग्न रे कशाला केलंस तिच्याशी ? ... ”
मनन
नवा खटाटोप ५१
हह %८ ४०५०-८५ ८५८” ४५ 0५/१५/१०५०
९७८४१.” १- ४- ४४-०४” >... ६.» अटच श्या ण्ध्ट २. ६०५ ची “२ “२५४८ ४८४ १४. २८४१ ७-४८
मामी रागावं नको अशी ! मी दारू पितो, म्हणून तीच रुसून आली आहे माहेरी इकडे ! मी काय करूंत्याला?... ... ही “तू दारू सोड म्हणज झाल ! '' रखमा म्हणाली “ सोडीन ! सोडीन मामी ती केव्हां तरी ! विलायती दारू भजंगराव चोरून आणून देतात मला ! थोडी घेतो मी ! तुमच्या गांवच्या ग॒डभटाला देखील औषधाकरितां देत असतों मी ! -- मन्या हंसला आणि * चल मामी मी तुला गांवापर्यंत पोंचवितो, असं णून त्यानें तिच्या डोक्यावरची पाटी घतली. त्यानीं आडवाटंनें रखमाचे घर गांठले अंधारांतून तो परत जाऊं लागला, इतक्यांत रखमा म्हणाली दम जरा, मी तुला भाकरी आणन देतें. सग्वबीकडे जाऊन खा तुम्ही ! तीही उपाशीं मरते आहे रे -- रखमा घरांत गली, तिनें घरांतल्या सवे भाकरी आणल्या. त्यांवर तेळ तिखट घातलें आणि त्या मन्याच्या स्वाधीन केल्या. “मामी त् आई आहेस आमची ! मन्या सहृदयतेनें उद्गारला. 'जा! जा! घरीच जा आता--' रखमा कळवळ्यानें बोलली. पण मन्या फक्त हंसला ' मात्र जातांना पंचवीस रुपयांची चवड त्यानें मामीच्या हाती सग्वीला देण्याकरितां दिली. आणि तो अंघारांतूनच लगंच गप्त झाला ! रखमाच्या डोक्यांत कांहीतरी नवा प्रकाश पडला. मन्या कोठ गला असाबा, हें तिनें मनाशीं ठरविलें. तिचा स्वयंपाक झाला, जेवणे आटोपली ! भर मध्यान्हीची किट्ट काळोखांत ती बाहेर पडली. ती थेट सावळ्याच्या मळ्यांत आली ! सावळय़ाच्या झोंपडीत सावळ्या आणि त्याचे स्तेही बोलत बसले होते. त्या मंडळींत मन्याचा आवाज ऐकून तिला सावळ्याची काळजी वाटूं लागली ! मन्याच्या जाळ्यांत सावळ्या सांपडला आहे, असें तिला वाटलें. ती त्यांचा संवाद चोरून एकू लागली--.
ब“ पा र्ाण णा णिणी कोधीश 00 कळा ० ह... बक
५२ साखर गोटी
खाशा बोलत होता. तो म्हणाला--
“ मन्या, तुझं कसब खरं लेका ! बंदुक उडवीत असतां माझ्या हातांत पैशाची बंग दिलीस कीं ! --”
“ पण, तुम्ही वेळेवर आलांत ! बरोबर काम केलेंत ! ह्यांतही तुमची कर्तबगारी आहेच कीं ! --” मन्या बोलला.
“ पण असा लटारूपणा करणं योग्य आहे का?"
सावळ्या सोम्यपण म्हणाला.
“ ळेकाचा आहे श्रीमंत ! गरिबांच्या माना मुरगाळूनच श्रीमंत झालाय ! त्याचा पेसा आमचाच ! ” बजा बोलला.
“ सावळ्या ! सावळ्या ! आतां लेका रंगीबरोबर लग्न लावून टाक. दागिन्यांची तजवीज मन्या करतो आहे ”
खाल्या हंसत हंसत म्हणाला.
“ पण रंगीला असल्या दागिन्यांची जरूरी ताहीं
सावळयानें लगंच उत्तर दिलें.
मध्यान्ह उलटून गेली होती. मन्यानें कोठेतरी हल्ला करण्याचें अगोदर ठरविल्याचे दिसत होतें. सावळ्यानें दुसऱ्या दिवशीं दुपारीं यावें; जुळल्यास रंगीला भटावें; आणि रात्री पुढचा बंत ठरवावा; असें खाशानें सुचविले. आणि ती टोळी मार्गास लागली.
रात्र उजळू लागल्याने त्या लोकांच्या हातांतील चमकणारीं शस्त्र रग्वमाला दिसली.
रखमा कोणाच्या दृष्टीस न पडतां घराकडे परतली.
सावळ्याचा हा नवा खटाटोप तिला कांहीं केल्या पसंत पडेना !
0५७४७
भांडण लावणारं नांव दढ
चले पाहाटंची वेळ होती. रंगी जागी झाली. ती उठून बसली. तिच्या वाड्यांतील कोंबडीं आरव लागलीं. गोठ्यांतील जनावरांची
घ्रसघस चालू झाली.
रंगी बाहेर अंगणांत आली. चंद्रोदय होऊन चंद्र कांहींसा वर आला होता. ती चंद्राची कोर तिला किती तरी आल्हादकारक वाटली. जणूं पूव दिशेच्या भालप्रदेशावरील ती कुंकुमाची कोरच होय !
तिची हालचाल घारी गाईच्या लक्षांत आली. लगेच तिनें हुंकार दिला. रंगी घारीजवळ गेली. तिची पोळी ती चोळ लागली. तीही आपल्या मानेने तिला कुरवाळूं लागली. रंगीला वाटलें, ही गायत्री म्हणजे जणूं आपली आईच होय. लगंच तिनें घारीच्या शेपटीला हात लावला. ती आपल्या डोळ्यांला लाविली. रंगीनें घारीला नमस्कार केला आणि ती परत जाऊ लागली. तेव्हां गाय'हंबरू लागली. जणूं आपल्यापासून आपलें मलच दूर जात आहे, असेंही तिला वाटलें असेल !
गेले पांच सहा दिवस ती उदासवाणी दिसत होती. घरीं बसूनच होती. कामधंद्याकडे तिचें लक्षच नव्हते. पण आज पाहाटपासून ती पूर्वी- प्रमाण उत्साही दिसत होती. ह्याचें कारण तिच्याशिवाय कोणास कसें समजणार ?
झुजू मुंजू दिस लागलें. थंडगार वारा सुटला. शेतकऱ्यांच्या गृहिणींचें दळण चाललें होतें. गडीमाणसें शेणगोठा करूं लागलीं होतीं.
रखमाचें दळण आटोपले, तेव्हां चक्क उजाडले होतें.
7 “पाशा टीणा १) 00 कळटलीण0 000 भनमामाहक. क. कळक भक कजय... | ०५ ___ ना रकन न्य >“ ४०० /-२ एप “00 -_ ८: “भा टक णार टिक
"टी ५४ साखर गोटी
इतक्यांत “ रखमा मामी ! रखमा मामी ! ' अज्ञा तिला गोड स्वरांत हांका एंक आल्या
रखमाने दार उघडल. ती रंगीला पाहून चकित झाली आणि म्हणाली-
रग, इतक्या लवकर तू उठलीस कश्याला पोरी ? काम आटपून मी येणारच होते तुझ्याकडे तुला आंबराईत नेण्याकरितां! ”
“ मामी सावळ्या मळ्यात आलाय का ग? मला आलासा वाटतो. सांग, मामी सांग ना मला. '
“* अग, मळ्यांत आलेला सावळ्या मला ग इथं कसा दिसणार? तुला कसं कळलं ? का रात्रीची गली होतीस मळ्यांत ? सध्यांच्या पोरट्या काय करतील कृणाला कळायचं नाही, बाई!
रखमा रगीकडे पाहात हसू लागली. रंगी ओशाळून तिला म्हणाली-
“तसं नव्हे मामी ! मला पाहाटे स्वप्नांत सावळघा दिसला ! त्यानं मला शीळ घातली ! मी मळ्यांतच होतें, असं मला वाटत होतं! मी जागी झाले. डोळ उघडले तों सावळ्या कुठे आहे? मामी ! सारें स्वप्नच! मला झोंप येईना, म्हणून तुला आलें विचारायला ! आणि तुझ आपलं कांही तरीच ! --''
ह्यावर रखमा कांही बोलली नाही. तिने रगीला घरांत नेलें. रगीनें आपलें डोके रखमाच्या मांडीवर ठवले. रखमा तिच्या कानशिलावरून हात फिरवू लागली. जण् त्या म्रायळेकीच असाव्या अस वाटत होतें !
रॉ र शि
सकाळीं नऊ दहा वाजण्याच्या सुमारास आबाची धादल चाल झाली होती. त्यांना अगदी जरूरीच्या कामाकरितां परगांवीं जावयाचें होते. सकाळीच भुजंगरावांचा तांतडीचा निरोप आला, म्हणून त्यांनी घाईघाईने निघण्याची तयारी चालविली होती.
इतक्यांत कालही मळ्यांतील ऊंस कोणाच्या तरी बेलानें खाल्ला, अशी बातमी गड्यानें येऊन सांगितली
रंगी मळ्यांत राखणीस जात नाहीं, त्यामुळे नुकसान होत आहे, हयाची जाणीव आज आबांना चांगलीच झाली !
भांडण लावणारं नांव ५५
४७५/”५ ७९०७७१६. ४७.” १७ &९. ४७०१५. ७ १४०७९ “४७४४७९.” ४४% »१५ ९५ »९.०९.१ ९६-४९ ८१.” ९४७” “४७१७ ९ ७९, ४६.०६. ४-१ ४४१७ १४७१५०७ १७१/ फक क्विक” १%/”भितनितेकॉ' पिकामकमेकशक ७ चकनेदहाम्येक/”मिडावियेई? चेक कदीन्पकन्येकेळ
सावळ्याही कोठ तरी परगांवीं गेला आहे, हें आबांच्या कानावर होतेंच, म्हणून रंगीला आज मळ्यांत पाठवावें, असें त्यांच्या मनानें घेतलें.
इतक्यांत रखमा आली. तिच्या डोक्यावर जेवणाची पाटी होती. हातांत कालवण घातलेले भांडं होतें. तिनें आपला पदर दांतांत धरलेला होता.
रंगीला आंबराइंत आपल्याबरोबर नेण्याकरितांच ती आली होती. आबांना विचारल्याशिवाय रंगीला मळ्यात नतां यावयाचे नाही, हे गोराबाईंच्या कडून तिला कळलेंच होतें.
आबांच्या मनाचा ठाव घेण्याकरिता ती त्य़ांच्याकड पाहून खुदकन हंसली !
आबांचा जामानिमा चालला होता. ते आरशांत पाहून आपला फेटा साफसूफ करीत होते. त्यांची दृष्टि रखमाकडं गली. तेव्हा आपणहूनच ते रखमाला म्हणाल--
“बरी आलीस रखमा ! रंगीला तुझ्याबरोबर आंबराईत ने. जनावरांनी उंसाचा अगदीं फडा पाडला आहे ! कुणाची ग्र हों! कोंडवाडाच दाखविला पाहिजे त्यांना !
रखमाला पाहिज होती ती परवानगी आपोआपच मिळाली. त्यामुळे कांहीं न बोलतांच ती घरांत रंगीला हांक मारण्यास चालली. तेव्हां आबा तिच्या पाठमोऱ्या बांधेसूद शरीराकडे निरखून पाहात म्हणाले--
“रखमा, जरा एंकून घ माझं. रंगीवर चांगलं लक्ष ठव. सावळ्या आज मळ्यांत नाही. तो आला तरी बायकांनी पुरुषाबरोबर कसं वागायचं असतं, हें रंगीला समजावून सांग. ती आतां कांही लहान नाहीं, पोरचेष्टा करायला !
रखमानें माग वळून पाहिले. तिने फक्त “हृं ' ! म्हटलें आणि आपली मान पण हलविली.
आबा तिच्याकडे पाहात होते. रखमा घरांत गली, तरी त्यांची नजर तिकडेच होती. त्यांच्या मनांत तिच्याशी आणखी बोलावयाचें होतें काँ "काय, न कळ!
री. जॉ रॉ रवमाबरोबर रंगी आंबराईत आली. तेथ तिला पुष्कळ मोकळंपणा
५३६ साखर गोटी
“४७५५९६ ४४५१५०९. ४-/४-/१ “४७४४४८०.
वाटला. गला आठवडा बागेत बागडणाऱ्या फुलपांखराला बाटलींत कोंडून ठेविण्यासारखा तिला गला होता !
सावळया दुपारीं येणार आहे, हें तिला रखमानें सांगितलें होतें, तरी देखील ती त्याच्या झोंपडीजवळून जाऊन आलीच !
रंगी आपल्या मनाशींच' हंसत होती. तिनें मळयाभोंवतीं एक चक्कर मारली. जनावरांनीं पुष्कळ नासधूस केली होती ! उंसाच्या कडंच्या गोवाऱ्या कोणी लांबविलेल्या दिसत होत्या ! बागतले टपोरे गुलाब कोणी देठासकट खोडून नले होते ! साखरगोटीचे डहाळे कोणी तोडलेले होते ! पालापाचोळ्याचा खच त्या झाडाखालीं झाला होता ! त्यांवर दुपारच्या वेळचे सूर्याचे प्रवर किरण मधून मधून पडलेले होते! जणूं त्या पाला- पाचोळयाची राख करण्याकरितां तेथ ते अवतरले आहेत, असें वाटत होतें!
सावळ्याची गाठ पडतांच तिला त्याच्याशीं पुष्कळ बोलावयाचे होतें. भुजंगरावांच्या उडविलेल्या फजितीची वाच्यता तिनें अद्यापि कोणाजवळ' केली नव्हती. रखमाजवळही ती कांहीं बोलली नव्हती. मात्र सावळ्याला' ती हकीकत केव्हां सांगेन, असें तिला होऊन गेलेले होतें.
सावळ्यानें भ् जंगरावांची जिरविलेली रग तिनें प्रत्यक्ष पाहिलेली होती. तिला त्या वेळीं कंसाचा पाडाव करणाऱ्या श्रीकृष्णासारखा सावळ्या, वाटला होता !
तिनेंही भूजंगरावांचा फजितवाडा उडविला होता. त्यामुळे आपणही सावळयाच्या पराक्रमाला शोभसें आहोंत, असा तिला आत्मविश्वास वाटत होता ! पण त्याला तो निवेदन करण्याची संधिच तिला गेल्या आठवड्यांत मिळाली नव्हती. त्यामुळे ती आज सावळ्याच्या भटीविषयी अत्यंत उतावीळ झाली होती.
दुपार झाली तरी, सावळ्या आला नव्हता. त्यामुळें रंगीचा हुरूप ओसरू लागला. त्याची जागा काळजीने धेतली. चेहरा जरा कोमेजूं लागलेल्या चमेलीच्या फुलासारखा दिसं लागला.
इतक्यांत सावळयाच्या झोंपडीकडे हालचाल झालेली तिला दिसली. एकदम तिच्या चर्यवर लाली उमटली !
अपण पटपट पाप ता -- न 2८-एपपपाप-"प----५ा---<.----7---------८-८-८-८-८४----ा टाडा न
मांडण लावणारं नांव ५७
लगेच तिनें आपली गोड शीळ घातली. त्या शिळेला ताबडतोब शिळेनेंच उत्तर मिळालें !
तिचा आनंद गगनांत मावेनासा झाला ! तिनें लहान मुलांसारख्या ऐेन तीन उड्या देखील मारल्या !
रखमा दुसरीकडे काम करीत होती. तिच्या कानीं ह्या शिळा आल्या. तिलाही सावळ्या आल्याचे समजलें. ती आपलें काम भरभर आटोपून आंबराईकडे जाण्याच्या तयारीस लागली.
रंगी साखरगोटीजवळ उभी होती. सावळ्या आपल्याकडे धांवत येईल, अशी तिची कल्पना होती. पण तो लवकर येईना, तेव्हां ती अधीर झाली. आपण तिकडे जावें, असें तिला एकदां वाटलें. पण तिचाही स्वाभिमान जागृत होता; तो तिला तसें करू देईना.
मधला मार्ग म्हणून तिनें रखमास हांक मारली.
रखमा ताबडतोब रंगीपाशीं आली. तिनें रंगीकडे पाहिलें. उमलती चाफेकळी भर दुपारच्या उन्हाने किचित् मळल्शी होते, तशी रंगी तिला दिसली !
रखमानें तिला जवळ घेतलें. इतक्यांत तेथे सावळ्याही धांवत आला. रंगी त्याच्याकडे पाहुन हंसली. त्या वेळीं तिच्या गालावरील गोड खळी खुलून दिसली.
सावळ्याचा चेहरा गंभीर होता. त्याला पाहून रखमाच' समय- सूचकतेनें म्हणाली--
“ रग, अशी कष्टी होऊं नकोस, बाई ! सावळ्या कांहीं वावगा वागावयाचा नाहीं--'
“मी तसं कुठं म्हणते मामी ! ” रंगी सावळ्याकडे पाहात हंसत हंसत बोलं लागली. ” उगीच आपलं तुझं कांहींतरी म्हणणं ! पण एवढं खरं कीं, आबांचा राग सावळ्यावर फार झालाय. मी करायला गेलें एक आणि झालं भलतंच ! --
“रंग, काय केलंस आणि झालं काय भलतं सांग तरी मला ! -- ”
सावळ्या धाईघाईनें बोलला.
ते सवंजण जवळच्या आंब्याखालीं बसले.
ष्ट साखर गोटी त्या दिवशी उप्मा अतिशय होत होता. पक्षी देखील आंबराईच्या
आश्रयाला आले होते. त्यांवकीं कांही कावळे काव काव करीत होते. रंगीने वर पाहिले आणि थोड्या वेळाने ती बोलं लागली.
आपण घारीची धार काढण्यास जात असतां भजंगरावांशी मिसर्किलपणा कसा केला, त्यांना आपण तोंडघशी कसें पाडले, व त्यांची फजिती कशी झाली, ही हकीकत रंगीने रंगात येऊन सागितली.
त्या वेळी रखमा आणि सावळ्या ही खो खो हंस लागली ।
“ कार्ट, मला देखील कळं दिलं नाहीस हें ! मी त्याच वेळी त्याच दांत त्याच्या घशाखाली चांगळे घातले असते ! --
रखमी रंगीकड पाहात हात हलवीत म्हणली.
“ पण मामी, मीच वात्रटपणा केला होता त्याला अहृल घडण्याकरितां ! नाहीतर, भुजंगराव तसा कांही वाईट माणूस नाहीं!
रंगीनें खरीच गोष्ट पण ती सावळ्याकडे मिस्किलपण पाहात जरा . ठागट स्वरांत सागितली.
“ मग कर लग्न त्यांच्याशीं, रंग । --
र्खवमा हंसत हंसत म्हणाली.
सावळ्यानें मान डोलावून तिला संमति दिली आणि तो मिस्किलपण हंसू पण लागला !
रंगीला रखमाएवजी सावळ्याचाच राग आला आणि ती चवताळून म्हणाली,
“ सावळ्या रंगीला कोण समजतोस त १--'
तिला जास्त बोलवेना. तिच्या डोळ्यांत अश्रु उभ राहिले. आपण केलेल्या चेष्टबद्दल रखमालाही वाईट वाटलें.
सावळ्या नरमाईच्या भाषत बोल लागला,
“ रंगे, आबा आपलं लग्न कांही सुखासुखी होऊ देणार नाहीत. त्यांचा ओढा आतां भुजंगरावाकडं आहे. त्याला पण तू फार आवडली आहेस. तस केल्यानं आबांचा मान वाढणार आहे. मन्या सगळं सांगत होता आम्हांला ! त्याला सारं कांहीं ठाऊक आहे. म्हणून मी रखमाच्या बोलण्याला मान डोलावली. रागावू नकोस अश्ी--
१1
मांडण लावणारं नांव “५९
त्यानें रगीच्या पाठीवर हळूच चापटी मारली आणि तिच्याकडे तो पाह लागला.
त्याच्याकडे भूवग्रा वक्र करून पाहात रंगो म्हणाली--
* नको, वात्रटपणा असा ! आता काही आपण लहान नाही इतके ! मामी काय म्हणेल आपल्याला ! ---'
सावळ्यानें अगदीं ज्ांतपणें उत्तर दिले-<
“रंग, मामी ग काय म्हणणार ? ती तुझी सासू होणार आणि आईपण आहेच---
रखमानें तिला आपल्याकडे ओढले, आपल्या एका हातानें तिच्या मानेला वळसा घालून दोन्ही हातांची मिठी तिच्या गळ्यांभोंवती मारली.
रंगीची नजर सावळ्याकडे होती. सावळ्याची नजर पण रंगीकडेच होती. सावळ्यानें सहज आपला हात पूढे केला, रंगीनेंही पण सहजच त्याच्या हातावर हात ठवला.
त्याच वेळी उभयतांनी एकमेकांना मनाने वरले. रखमानेंही मनानेंच कन्यादान उरकून घेतलें !
काही वेळ सवंजण स्वस्थ होते. त्या तिन्ही व्यक्ती समाधि-स्थितींत असल्याचा भास होत होता.
ह्या समाधि-स्थितीचा भंग खाशाच्या हांक मारण्यानें झाला !
ताबडतोब सावळ्या झोंपडीकडे जाण्याकरितां उठला. आंब्यावरचे दोन कावळे एकमेकांत भांड लागले. दोघांचा काव काव असा कर्कश ध्वनि त्यांच्या कानांवर पडत होता!
रखमाला त्यांचा भारी राग आला. ती उठली, तिने हातांत धोंडा घेतलेला पाहतांच कावळे पण उडून गेले !
...! ... .. 4
सावळ्या, खाशा आणि बजा यांचीं खलबतें बराच वेळ चाल होतीं. तिसऱ्या प्रहरपर्यंत त्यांचें बोलणें संपलें नव्हतें. ते दोघे मन्याचा खास निरोप घेऊन आले होते.
“ आबा आणि भुजंगराव हयांनी गुप्त व्य्ह रचला आहे. उद्यां सकाळी मोटारनें आंबंगांवांत येऊन रंगीला घेऊन ते जाणार आहेत. रंगीचें लग्न
३० साखर गोटी
भजंगरावांशीं लावण्याचा त्यांचा गप्त कट ठरला आहे. शिवाय आणखी
कांहीं तरी त्यांचें भयंकर कारस्थान चाललेले आहे. त्याची माहिती तो आपल्या
माणसाबरोबर संध्याकाळपर्यंत कळविणार आहे. म्हणून रंगीचा विवाह
एकमेकांच्या गळ्यांत माळा घालून आजच उरकून घ्यावा... ... 1. मन्याच्या निरोपाचा असा एक दरींत निष्कर्ष होता.
तसा घाईनें विवाह करण्यास सावळ्याचें मन धजना. म्हणून त्यानें रखमास बोलावून आणलें. तिला सारी हकोकत सांगितली. ती म्हणाली--
“ आम्हांला काय बायकांना कळतंय ह्यांतलं. आपल्यांत लग्नाला भट लागत असतो. आमच्या आंबेंगांवांत भटाशिवाय लग्न लावीत नाहींत; मराठा भट देखील नाहीं चालत आम्हांला ! --
“ मामी ! “' बजा सांग लागला, “ आतां पुष्कळ ठिकाणीं नुसत्या एकमेकांच्या गळ्यांत माळा घालून लग्नं होतात. कोणीं आतां नांवं ठवीत नाहींत! गांधीनी पण असा पायंडा पाडून दिलाय ! मला ठाऊक आहे. ”
खाशानेंही बजाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
“ करा काय करायचं तें ! कांहीं का कराना, लग्न झालं म्हटलं म्हणज कोणी रगीच्या लग्नाची गोष्ट काढणार नाहीं. तिला मी आमच्याच घरीं नेऊन ठवीन. नाहीं कारे सावळया? ... ...
रखमा उत्सुकतेनें बोलली.
सावळ्याच्या विचारानें त्या दिवशींचाच लग्नाचा बेत नक्की ठरला. पण नुसत्या माळा घालून लग्न झालें, तरी खरें लग्न भुजंगरावांचा कांटा काढून मोठ्या थाटामाटानें करावे, असें रखमाच्या विचाराने साऱ्यांनी ठरविलें.
संध्याकाळच्या आंत हा बेत उरकावयाचा आणि तो साखरगोटी- खालच्या सावळ्याच्या वडिलांच्या समाधीजवळ गुपचूप उरकावयाचा, असें निश्चित झाले !
जो तो कामास लागला. साखरगोटीखालची जागा खाल्या व बजा स्वच्छ करू लागले. रगी व सावळ्या माळा करण्यांत दंग झाले. रखमा पंचारतीचें सामान आणण्याकरितां गांवांत निघाली.
ती भाविक स्त्री प्रथम घरीं न जातां विठोबाच्या देवळांत गेली. तिनें
मांडण लावणार नांव निक
"१४५९७४४ ८४ ४.९४१ ४४४४४०९ १५८९ /९ “९ »४४७ ४४/४४/४४७५ ४० ४४-०१.” ९ “४१ ५.
मनोभावें देवाची प्राथना केली. देवाच्या पायांवर मस्तक ठेवून तिनें, त्याला मनानें लग्नास येण्याकरितां निमंत्रण दिलें.
जातां जातां मगनशठकडून नारळ, सुपार्या वगेरे सामान तिनें खरेदी केलें.
मगनशेठ तिला इतके सामान कशाला पाहिज, हें खोदून खोदून विचारीत होते. रखमा उडवाउडवीची उत्तरें देत होती.
हा सारा प्रकार शेठजींच्या दुकानांत जठा मारून बसलेले गुंडभट ऐकत होते. ते नुकतेच तर््हेगांवाहन आले होते. ते कसल्या तरी विचाराच्या तंद्रींत होते. त्यामुळे रखमाच्या हालचालीवर त्यांची बारीक नजर नव्हती. 'पण सामानाची भली मोठी पाटी उचलन नेत असतां त्यांनीं तिच्याकडे संगयित दष्टीनें पाहिलें
पाहिजे असलेलें सामान घेऊन रखमा आंबराइत चालली. तिलाही आंबेझरीच्या बाजूकडे गुंडभट गेलेले दिसले.
संध्याकाळच्या सुमारास रखमा आंबराईत यऊन पोहोंचल्.
रंगीनें सावळ्याच्या गळ्यांत आणि सावळ्यानें रंगीच्या गळ्यांत माळा घातल्या. गोरज मुहुर्तावर हा समारंभ गुपचूप पार पडला.
रखमानें उभयतांच्या कपाळास कुक लावून त्यांना पंचारतीनें ओवाळले.
सावळ्या आणि रंगी यांनीं सावळ्याच्या वडिलांच्या समाधीचें दर्शन घतले.
सर्वजण सावळ्याच्या झोंपडीकडे निघाले. अंधार पडण्याचा सुमार झाला होता. त्या वेळीं उंसाच्या बाजूस कांहीं हालचाल चाललेली रखमाच्या लक्षांत आली. उंसांत जनावर शिरलें असेल, असें वाटून रखमा काठी घेऊन तिकडे धावली. तिच्या नजरेस गडभट पडला. तो तोडलेली भाजी तेथेंच टाकून धूम पळत गांवाकडे निघाला !
रखमा हया क्षूद्र भटाचा पाठलाग करण्यास गेली नाहीं.
रंगीचें सासरचें नांव साखरगोटी ठवावें, असेंच पुरुषांच्या मतानें
रले. पण रखमा म्हणाली, “ नको बाई असलं भांडणं लावणारं नांव !
मी आपली रंगीच म्हणत जाईन तिला ! ”
ब्राह्मणाचा शाप छि
24 द. व र > गंड भट गांवांत गला, तो प्रथम मगनशठच्या दुकानी गला. त्याच्याच
२३२» दुकानी रखमाची हालचाल त्याच्या नजरेस पडली होती, म्हणून तर तो तिच्या मागून गुपचूप आंबराईकडे गेला होता.
आंबराईतील आबांच्या मळ्यांतील उंसाकडेंची भाजी तोडून तो गेले दोन चार दिवस नेत असे ! त्या उंसाच्या आड उभा राहून तो साखर- गोटीखांली चाललेला समारंभ पाहात होता. तसें करीत असतां उंसाकडेंच्या गोवारीच्या शंगा पण तो तोडीत होता !
लग्नाचा चाललेला पोरखळ पाहून तो खूप संतापला होता. त्यांत पुन्हा रखमानें त्याला पाहिल्यामुळे तो अधिकच चिडून गला होता !
मनांत दबून राहिलेला त्याचा हा राग मगनशंठच्या दुकानी बाहेर पडला !
त्यानें तावातावाने तेथे सावळ्याचा पोरकटपणा जगजाहीर केला ! लग्नसमारंभांतील त्याच्या मिळकतीवर पाणी पडल्यामुळे त्याचा संताप भडकला होता !
भांडण लावण्याच्या कामीं ग॒ुडभटाचा हातखंडा असे. चाललेल्या भांडणांत भर घालूनही कोणीकडन तरी लभ्यांश साधण्याचा त्याचा राजरोस धंदाच होता म्हणाना !
त्याच्या ह्या वृत्तीचा उपयोग आबा हरहमेश करून घत असत. म्हणून तर आबांचा आणि त्याचा लोभ होता. गंडभट नहमी म्हणे, “ आबांवर माझं असं वजन आहे को, माझ्यावांचून त्यांच्या घरचें पानही हलावयाचें नाहीं ! --"
र्या
ब्राह्मणाचा शाप दडे
५४. ४४-४१ /४९/४ /४/% 7९४४४४ 7४ 9 ॥९.१ ९ 7४४१ “९४” “४ १- ८८ ६३४ २८४८१५४४४४ “५५४५” ५५/४//४५.//४.५/९/”९./..४५ ९» «८.४
मगनशठला गंडभटाच्या वल्गनांतील फोलपणा माहीत होता. तेव्हां आतां सहज डवचण्याच्या हेतूनें मगनशठ गुडभटाला म्हणाले,
“ग्रुजी, आतां तुमचं आबांच्या घरचं वजन राहिलं नाहीं ! तुम्ही आपलं उगीच म्हणावं तसं! .......”
मगनशठचें बोलणे गुंडभटाला लागलें. ते ताडकन तेथून उठले आणि जातां जातां म्हणाले,
“ चाललोंच आबांच्या वाड्यांत ! सांगतो त्यांना सगळं! तो क्षत्रिय कांही धमंबुडव्या नाहीं । --'' गुंडभट निघाले. त्यांनी जातां जातां तंबाखची एक फक्को तोंडांत टाकलीच. ।
ग्डभट चांगला पन्नाशीच्या सुमाराचा व्राह्मण होता. त्याच्या कपाळा- वरील पांढरे आडवे गंध त्याच्या काळया कुळकुळीत वर्णास शोभून दिसे. त्याचें नाक बसकें असून डोळे तरतरीत होते. लहानपणच देवीचे वण त्याच्या तोंडावर उठावून दिसत असत ! खांद्यावर धोतर, आणि डोक्यास मळकट जरीचा रुमाल हा त्याचा गांवांतील पोगाक सर्वाच्या परिचयाचा होता.
ती ग्डभटाची बुटकी मात आबांचा चांगला समाचार घेण्याच्या हेतूने त्यांच्या वाड्यांत आली होती. पणते घरीं नाहीत, हें समजल्याने गुडभट मनांतल्या मनांत हिरमुसला. तरी देखील गोराबाइईंच्यावर उसळून तो म्हणाला ---
“ आबा नसतांना असा प्रकार ह्या वाड्यांत कसा घडला? मी तुमच्या सात पिढ्यांचा उपाध्या मेळोंय वाटतं ?--'
भटजींना काय उत्तर द्यावे हें गौराबाईंना सुचना. त्या सोम्यपण म्हणाल्या,
“* घरांत माणसं नाहींत, भटजी ! ते आल्यावर त्यांना सांगा सगळं ! आम्हां बायका माणसांना सांगून काय उपयोग ? --'
“ बजावतों गोराबाई तुम्हांला ! तुमची फूस असली पाहिज ह्याला ! भटांशिवाय' तुमच्या इथं लग्त कधीं होतं का? चंत्रांत झालेलं लग्न कुठं ऐकलंय का ? --” गुंडभट तावातावाने म्हणाले.
इतक्यांत तेथे सदोबा आले, त्यामुळें गौराबाईना हायसें वाटलें.
नट, टन “पा “> -->>< >->---८----1------------*>>>->-----ाा
$£ साखर गोटी
खक ७ ७ ५०€५०४५-५ १.१७ -“0.
"४४९७ 5“ “४.४४” 9 ७१७,” »४ “४१५ “09-//१/९५//१-//%/१ “५ अ. हट न” / “ / “५ २.” १०.५%५१. '२./४./ “१ ९४५१ “६.»९९./४./४/%७
गुंडभटांनीं सदोबास छंडण्यास सुरुवात केली. त्या सरळ वत्तीच्या माणसाला गुंडभट आडवं लागले.
गुंडभट आवांच्या वाड्यांत भांडण्याकरितों गला आहे, ही बातमी मगनझठच्या दुकानांतून गांवभर पसरली होती. म्हणून तो तमाशा पाहण्या- करितां काळोखी रात्र होती, तरी आबांच्या वाड्यांत बरेच लोक जमले.
गुंडभटाच्या तोंडाला आतां फार जोर चढला !
“ घर्म बुडाला ! धम बुडाला ! ” असा टाहो फोडण्यास त्यानें सुरुवात केली !
रंगी रखमाच्या घरीं होती. सावळ्या आणि त्याचे मित्र ह्यांना पुरणपोळीचें जेवण घालण्याचे तिनें ठरविलें होतें. तिचा स्वयंपाक चालला होता. शेजारीपाजारी तिला मदत करीत होते.
आबांच्या वाड्यांतील ग॒डभटांनीं चालविलेली बडबड तिला कोणी तरी सांगितली. ग्डभटाविषयीचा तिचा संताप अनावर झाला! रखमा खरकट्या हातांनींच आबांच्या घरीं आली.
तेथें “ धर्म बुडाला धर्म बुडाला ! “ ही गडभटाची बडबड चाललीच होती. ती एंकतांच तिच्या अंगाचा तिळपापड झाला !
रखमानें गुंडभटाचा तो अवतार पाहिला. सदोबा तेथ आहेतसें पाहून ती त्यांना उद्द्शन म्हणाली--
आबा घरांत नाहींत, सांगा त्या भटाला ! हाकलून द्या त्याला ! चला आपल्या घरीं ! रात्र बरीच झाली आहे--
“ आतांच्या आतां चार मंडळींत ह्याचा निकाल लागला पाहिजे-' गुंडभट ओरडून बोलं लागले. “ चंत्रांत लग्न लागतं ? मोर्यांच्या कुळांत कुणीं अस एकलं तरी का? हें लग्न नव्हे! पोरखेळ आहेहा! मी भट गांवांत होतो, कांहीं मेलों नव्हतो ! धर्म बुडाला! हरहर! धम बुडाला ! "
रखमा चवताळली, पण संयम ठवून ती सदोबांनाच उद्देशून बोलली--
“ बडबडूं द्या भटाला असाच ! ह्याच्यापेक्षां रामोशी बरा--
लोकांदेखत रखमानें आपली अब्रू घेतली, असें गुंडभटाला वाटलें. त्यानें मिश्ांवरून हात फिरविला ! त्याची मिळकत ब्डाल्यामुळें त्याला
८ पाश शफण0ी शी???) 0 ?)0)0 ही काणी 00 एणणीाणी?णीटीण0ण?णी 0 पेणला णी पीप?टीकीश ण णणीशीप पपी 0ी तीतील पेटळणीशण ण?” पी?)?५१ीलया 0”... ट्या अल्ाणाणापा पा? प)?१ी0ण २१ी?0ी२ीपशकटशा0 णा? णापीपीटीी हणापापरीण?ण लक
ब्राहणांचा शाप दष
संताप आलाच होता. त्यांत रखमाच्या बोलण्याने आगींत तेल ओतल्या- मारख झालें. तो उसळून म्हणाला,
“तोंड आवर रखमे ! तुझीच फूस रंगीला आन् सावळ्याला ! तंच धर्म बुडविलास ! मोरे घराण्याचं वाटोळं केलंस --”
आतां मात्र रखमाचा राग अनावर झाला ! तिचा तोल सुटला. ती गडभटापुढं आपला खरकटा हात नाचवीत बोलली--
“भटा, मला धमं कळतोय सगळा तुझा ! तुझी मिळकत बुडाली म्हणून धर्म बुडाला म्हणतोस ? खोट्या साक्षी देतोस, तेव्हां धमं बुडत नाहीं वाटतं तुझा ? नवरा असलेल्या पोरींची लग्नं लावल्यानं तुला दंड झाला तेव्हां नाही तुझा धर्म बुडाला ? पाटाच्या लग्नाचं आडवून पैसं "घेतोस, तेव्हां तुझा धम कुठं जातो ? खोकला येतो म्हणून मन्याबरोबर दारू पितोस तेव्हां धम बुडत नाहीं ना ? खेटरं मारावीं असल्या भटाला--"'
रागाच्या भरांत रखमा गंडभटारचे श्रीमुख रंगवील कीं काय, असें "होकांना वाटलें.
भटजी सदोबाकडे करुणमृद्रेने पाहु लागले. त्यांना रखमारचे वागण पसंत पडत नव्हतें, पण ती बोलत होती तें सवं कांहीं खरें असल्यामुळ सदोबाही तोंडांतून शब्द काढीनात.
गंडभटानें पुटपुटत आतां शाप देण्यास सुरुवात केली ! रखमाचेही ओंठ रागाने थरथरू लागले. ती कांहीं तरी विलक्षण करील, असें वाटल्यामुळे -सदोबा ग्डभट आणि रखमा ह्यांच्यामध्ये उभ राहिले.
इतक्यांत रंगीच तेथ धांवत आली.
“ घरीं चल ! पुरण करपलंय ! कोणसं आलंय --”
रंगी घाईने हें बोलली आणि रखमाच्या हाताला धरून तिनें तिला ओढीतच घरीं नेलें!
द्र ह... श्र
रखमा घरीं आली, ती अगोदर पुरण करपलें कीं काय, हें पाहाण्यास मेली!
त्या वेळीं रखमाच्या घरीं सावळ्या आणि त्याचे मित्र आले होते. “त्यांना रखमाला कांहीं बातमी सांगावयाची होती !
६६ साखर गोटी त्यांना इतक्या घाईने यण्यास तसें अकल्पित आणि काळजी उत्पन्न करणारें कारण घडन आले होतें.
समारंभ आटोपल्यानंतर ते सवे सावळ्याच्या झोंपडींत गेले. तेव्हां ते सगळ आनंदांत होते.
झोंपडींत साखरगोटीच्या आंब्यांची अढी होती, तीतील पिकलेले आंबे खाता खातां बजा म्हणाला होता,
“ खाशा, असे आंबे आपण जन्मांत खाल्ले नाहीत! खरंच फार गोड गोटी ही ! --''
“ बजा, साखरगोटी आंब्याची प्रसिद्धि पांच पन्नास गांवांत आहे. साखरगोटीला तोड नाही इकडे |! --''
खाश्या आंबा चोखीत चोखीत म्हणाला.
“ सावळ्यानं मिळविलेली साखरगोटी पण तशीच गोड आहे. आतां साखरगोटी आंबा पण बिनधोक सावळ्याचा ! आबांचा मात्र भारी जळफळाट होईल! ”
बजाही आंबे चोखतच बोलला.
“ काय करतोय' तो! आपल्या मन्याचा बेत वेगळाच आहे, खासेराव ! --'
त्या झोंपडीत ह्या मंडळीचे हंसत खळत असे गोड बत चालले होते.
पण बाहेरील झाडींत रातकिड्यांची भसूर गुणगुण होत होती. त्या भसूरपणांत गडद काळोखानें भर घातली होती. त्यामुळें स्व वातावरणच भीतिदायक होऊन गलेले होतें
इतक्यांत झोंपडोच्या बाहेरून एक खणची शीळ आली. ती ऐकतांच ग्वाञा सावधपण बाहेर गला. परवलीचा शब्द त्याला पटला. शीळ घाल- णाऱ्या व्यक्तीनें फक्त एक सुरा खाशाच्या स्वाधीन केला.
एका तासाच्या आंत गाव सोडून निघून जाण्याची ती सूचना होती. मन्याकडून ती आली होती !
त्यामुळंच सावळ्या, खाशा आणि बजा रखमाचा निरोप घण्याकरितां. आले होते.
रखमाला बोलवेना. तिचे डोळे भरून आले. रंगी स्वयंपाकघरांत
>>>: ---->>>-ा-:->५---८॥-पााापप-4------ाापपाप->पा-नापाा-->
ब्राह्मणाचा शाप ७
होती. तिला एकवार पाहावे, अशी सावळ्याची इच्छा होती. पण खाशा आणि बजा ह्यांच्यापुढ त्याला आपल्या मनांतील हेतु स्पष्ट करितां येईना. ते सव तांतडीनें निघुन गेले. रखमा भ्रमिष्टासारखी तेथेंच उभी राहिली.
इतक्यांत रंगी तेथे आली. तिच्या दृष्टीस सावळ्याची पाठमोरी आकृति पडली.
तिनें शीळ घातली, पण सावळ्या परत येण्याचें चिन्ह दिसेना. ती. एकदम निराश झाली !
ती घरांत आळी आणि रखमाच्या कुशींत डोके खपसून स्फुंदून स्फुदून रडूं लागली.
स्वयंपाक तसाच पडून राहिला, अन्नाचा घांस कोणाच्याच पोटांत गेला नाहीं.
त्या काळोख्या रात्री त्या दोघीही रडत पडल्या होत्या. दिवसभर केलेल्या श्रमामुळे मध्यान्हीनंतर रखमाचा डोळा लागला. रंगी बंधडकपण तिच्या जवळून उठली. अंधारात वाट फुटल तिकडे तिचे पाय जाऊं लागले.
ती पृष्कळ भटकली पण तिला सावळ्याचा पत्ता लागला नाहीं!
श्र ज्र 1...
भल्या पाहाटेस आबंगांवी भयंकर गडबड उडन गेली. आबांचा वाडा पोलिसांच्या तुकडीनें वेढला. सदोबांच्याही घराला वेढा पडला. खाशा, बजा वगेरे संशयी लोकांचीं घरेही पोलिसांनी वेढून टाकली !
जिकडे तिकडे कसून झडती सुरू झाली !
खाशा, बजा, सावळ्या वगरे सर्व फरारी झाले होते. फक्त साव- ळ्याच्या झोंपडींत पोलिसांना रंगी सांपडली, तिला पोलिसांनीं केद केलें !
रखमा आणि सदोबा यांचीही तीच गत झाली. त्यांनाही पण अटक झाली. सारा आंबेगांव हादरून गला !
रात्रभर कोठेतरी भटकत असलेला ग्डभट घरीं पाय ठेविल्याबरोबर आपल्या पत्नीजवळ उद्गारला,
“ब्राह्मणाचा शाप देवादिकांनाही बाधतो, मग इतरांची कथा काय ! --
- कचेरीवर हल्ला ! (टॅ
कळ नना --:-:--*--५०_ ५-८ >>>
च एकदां पाठीस लागलें की, एकामागून एक संकटे चालून येतात.
बिचार्या रंगीची तीच स्थिति झाली. ती रात्रीं रखमाच्या घरांतून
भटकत बाहेर पडली. तिच्या भ्रमिष्ट स्थितींत वाटेतील खांचखळग्यांत
तिचा पाय अनेकदां मुरगळला. पायांत कांटेकुटे बोंचळे. तिला ठेचा
पण लागल्या. वणवण करीत रानावनांतून, काळोखांतून हिडतांना तिला शुद्धच नव्हती म्हणाना !
' बर्याच वेळानें जरा थंडगार वारा सुटला. त्यामुळे तिचें डोके कांहीसे ठिकाणावर आलें आणि तिनें थेट सावळ्याच्या मळयाची वाट धरली. तिनें त्याची झोंपडी गांठली. झोंपडी उघडी पाहून तिच्या मनांत आशेचा अंकुर उद्भवला !
सावळ्या कुलूप लावून नेहमीं बाहेर जात असतो, झोंपडीस तर कुळूप नाही. तेव्हां तो कुलूप लावण्यास तरी येईल, ह्या आहोनें झोंप- डीरचें दार सताड उघडं ठेवून ती आंत जाऊन बसली !
पाहाटंच्या वेळीं झोंपडीच्या बाहेरची हालचाल जेव्हां तिला ऐक. येऊं लागली, तेव्हां सावळ्या आला, असें वाटून तिला आनंद झाला. सावळ्या कुलूप लावू लागला का, त्याला आपण चकित करून सोडावयारचे, असा तिनें बत योजला ! ह्या गोड कल्पनेनें ती रात्रीचे सारें दु:ख विसरू लागली !
पण मन चितितें एक आणि घडन यंतें भलतेंच, अशी तिची स्थिति झाली ।.
ती सावळ्याची वाट पाहात होती. सावळ्या आतां येईल, मग
कळ टीना. टला कपल पणाला नापाक -- नमळ
कचेरीवर हल्ला ! $९'
येईल, असें तिला वाटतां वाटतां किती तरी वेळ निघून गेला. त्यामुळें पुढे ती अत्यंत अधीर झाली !
आणि तिनें सावळ्यास हाका मारण्यास सुरुवात केली.
सावळ्यानें ' ओ ' देण्याऐवजीं बाहेरचा भेसूर हास्यध्वनि तिच्या कानीं पडला !
ती घाबरली. तक्षा स्थितींत ती बिचारी काय करणार?
उजाडतांच तिच्या झोंपडीची झडती झाली. त्या झडतींत पोलिसांना एक नवें कोरें पिस्तुल सांपडलें !
तिला पोलिसांनी गिरफदार करून चावडींत नले. अस तिचे अत्रूचे धिडवड निघाले !
रखमा आणि सदोबा यांनाही पोलिसांनी पकडले. त्यांच्या घरींही आणखी एक पिस्तुल पोलिसांच्या हातीं लागलें. त्याचा पंचनामा चालला असतां रखमा चरफडून बोलली,
“* असलं लोखंड आमच्या घरीं नव्हतंच मुळीं ! शिपुड्यांना कसं सापडलं कुणास ठाऊक !
सदोबा तिला दाबू लागले. त्यांनीं विठोबाचें भजन सुरू केलें.
रखमा त्यांच्यावर चवताळून म्हणाली,
* कुठं हाय तुमचा विठोबा ! इथं सोडवायला येतोय का? ”
ताबडतोब ह्या तिघांना पोलिसांनीं तालक््याच्या ठिकाणीं तर््हेगांवीं नेलें आणि त्यांना तेथे अटकेंत ठेवलें.
सारा आंबंगांव झाल्या प्रकाराने हळहळला.
ताटांत वाढलेल्या गोड अन्नांत विष कालवणारा कोण असावा, ह्याचा अंदाज रखमाला करतां येईना. त्यांतले त्यांत पोलिसांच्या तावडींत सावळ्या सांपडला नाहीं, हे एकपरी बरें झालें, असें त्या दोघींना वाटलें.
गौराबाइंना अत्यंत दु:ख झालें. त्या यजमानांची वाट पाहात होत्या. ते आल्यावर सर्वांना सोडविल्याशिवाय राहाणार नाहींत, असें त्या भोळया बिचारीला वाटत होतें.
त्या मनांत म्हणत होत्या--
“ आपल्या यजमानांनी खऱयाचें खोटे आणि खोट्याचें खरें किती तरी
कन ज्य र ना ज्र जनन ---पऱासळळ- “_- - पण त गतकाळात वजा तीर ती 7... -----:------:--- -*-*--:<“_प-----4<--५--*०७-८--टणण 0000
७० साखर गोटी
“६४५५४५ ८४/५५/४१७७ ४७ ७७ ७४४४-४१-१९. ४४७ ४ नश 4 जे ल्न्चे "१ २४४५४ ५४/५५/४५६५ १४५४-४६/ / ४४५/१५५/१४/९४/४/४-/५-५४५/५/४/४./४/१ ४.७७
वेळां घडवून आणलें आहे. तर मग खर्याचे खरें त्यांना सहज करितां येईल. पोलिसांनी पकडण्यासारखा अपराध रंगी, रखमा आणि कट्टे वारकरी सदोबा हे कधींच करणार नाहींत ! --"'
त्या दिवशी सायंकाळपर्यंत गौराबाई यजमानांची वाट पाहात होत्या. पण ते आले नाहीत. दोन तीन दिवसांनी मन्या, हा आबा आणि भुजंगराव यांना मोटारीतून घेऊन आंबेंगांवी आळा. ल्गच त्यांना गुंडभटांनी सगळी हकीकत सांगितळी
दोघांना झालेल्या प्रकाराचे अत्यंत आइचयं वाटले !
आरोपोंना जामीनावर सोडविण्याची त्यांनी ताबडतोब खटपट सुरू केळी.
जामीनदाराची जुळवाजुळव झाली. गंडभट सदोबाला जामीन राहाण्यास तयार झाला. पण रखमाला जामीन राहाण्यास तो कबल नव्हता !
ती कायमची केदेत जावी व आपला ञाप खरा व्हावा, असे त्याला वाटत होतें की काय, न कळे !
र ...| ....
तर्हेगांव तालुक्याचा गांव होता. तेथ तुरुंग तो केवढा असणार ? कच्च्या केदेतील आरोपींना ठेवण्याकरितां दोन तीन कोठड्या असतील तेवढ्याच !
त्यांतील एका कोठडींत रंगी आणि रखमा ह्या दोघीना ठवलें होतें आणि सदोबांना दुसऱ्या कोठडींत ठवलें होतें.
सावळ्याची बातमी रंगी आणि रखमा यांच्याकडून कळेल, असे पोलिसांना सहाजिकच वाटत होतें. म्हणून पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले, त्यांच्या सुटकेचे आमिष दाखविलें आणि कांहींसा रुद्रावतारही दाखवन पाहिला !
पण त्या स्त्रियांकडून त्यांना पाहिजे असलेली माहिती मिळाली नाहीं. खरोखर त्यांना कांही माहिती नव्हतीच, तर त्या तरी काय सांगणार ?
झाल्या प्रकारानें रंगीचे अंत:करण अत्यंत व्यथित झालें होतें. अमृताचा म्हणून पेला हातीं यावा; आणि त्यांत विष भरलेले असावें अशी तिची स्थिति झाली !
आणि खरोखर एकादी विषारी वल्ली हातीं लागून प्राणावंण करतां
कचेरीवर हल्ला ! ०९
“४./४.४./४/१./४” % '५/४% ४/9 १५५४ ४”/% 7५ 4२-7५ ४२८४८४५ ४४४४-४४-४४” ४८४ ४४४” “ “४/४/४ ४४शोशी- ४ 0० १, "०
आलें, तर तें ह्या यातनेपेक्षां सुसह होईल, असेही तिला वाटल्याशिवाय राहिलें नाही !
तिनें दोन तीन दिवस अन्नाला स्पश्ेही केला नाही. तिला जुलमानें अन्न घालण्याचे धारिष्ट पोलिसांना होत नव्हतें.
त्यांना फक्त कच्च्या केदेत ठेवलें होते. त्यांच्यावर नेमके आरोप कोणते ठवळे होते, हयाची त्यांना माहिती दिलेली नव्हती. कारण खरे आरोपी त्यांपकीं कोणीच नव्हते. संशयावरून त्यांना पकडून आणलें होते. त्यांचे आरोपी सावळ्या, खाशा व बजा हे होत
पानगांवच्या खिडीत त्यांनी भजंगरावांवर हल्ला करून त्यांना लटलें त्यांनी सन्यमरतीस अडथळा केला; अनक ठिकाणची लुटाल्ट केली; असे किती तरी आरोप त्या तिघांवर होते !
हे आरोप आबा आणि भुजंगराव ह्यांनीच केलं होते. त्यांच्याजवळ भरपूर पुरावाही असल्याचे पोलिसदप्तरी दाखल होतें. पण ते दोघे अद्यापि
हेगांवास आलेच नव्हते !
वास्तविक हा सारा व्यूह भुजंगरावांनी रचिला होता. सावळ्या, खाज्या आणि बजा ह्यांच्यावर असले काही भयंकर आरोप ठवळे, म्हणजे ते नरम येतील. केदतील हाल सोसण्यापेक्षा सन्यभरतीत जाणे फार श्रेयस्कर आहे, हें त्यांना पटवन देतां येईल आणि त्या योगानें आपलाही मागग निष्कंटक होईल, अशी त्यांची मळची कल्पना होती !
शिवाय चांगल्या सुदढ आणि चलाख मराठ्यानी संन्यांत शिरावे; पराक्रम गाजवावा; अधिकाराचे स्थान मिळवावे आणि शीख व गुरखे ह्यांना ज्या प्रकारचें महत्त्व सन्यांत प्राप्त झालें आहे, तशाच प्रकारचें महत्त्व मराठ्यांना प्राप्त व्हावे, असें त्यांना मनापासून वाटत होतें
पण लट्पुटीच्या विवाहाची आणि स्त्रियांना पकडून नेल्याची हकीकत कळल्याबरोबर आपण करावयास गंलों एक आणि झालें भलतेंच, हें त्यांच्या ध्यानीं आलें ! |
मात्र भुजंगराव प्रयत्नवादी गृहस्थ होते. आलेल्या अडचणींना पाया- खालीं तुडवून पुढे मार्ग काढण्याचा त्यांचा स्वभाव होता. ह्या त्यांच्या
"न्न ण णच शाल णशा >>>“
०२ साखर योटी
गुणांचा उपयोग क्षृद्र स्वाथ साधण्याच्या कामीं होत होता, एवढेच काय तें वाईट होतें !
सावळ्या फरारी झाला. त्याच्यावर भयंकर आरोप आहेतच. तो कांहीं राजरोसपणे आंबंगांवीं येत नाहीं, अशी खात्री झाल्यामुळें कच्च्या कैदेतून रंगी, रखमा आणि सदोबा ह्यांना सोडविलें पाहिजे, असें भुजंगरावांनी आपल्या मनाशीं पक्के ठरविलें.
तर््हेगांवच्या तुरुंगांतील पाहाऱ्यावर अधिकाऱ्यांनीं वयस्क शिपायांना ठेवलें होतें. ते सदोबा, रखमा वगरे आरोपौशीं फार कनवाळूपणें बोलत. रखमाच्या व ह्या शिपायांच्या प्रमळ आग्रहाने तीन चार दिवसांनंतर रंगी दूध घेऊं लागली !
मायेने माया वाढते. पोलिसांना त्या स्त्रिया निरपराधी वाटत होत्या. त्यामुळें प्रमळपणें त्या स्त्रियांशी ते गोड बोलत ! उपदेशही करीत ! त्यामुळे ते पोलिस त्या स्त्रियांना सज्जन दिसले ! ते आपल्यास सोडून देतील असेंही त्यांना वाटूं लागलें! पण त्यांना सोडन देण्याचें त्या पोलिसांच्या हातीं काय होतें ?
एकादा पोलिस त्यांना असेंही सांगे को, “ गुन्हा कबल करावा. पहिलाच अपराध असल्यामुळे मॅजिस्ट्रे॑रे सोडूनही देतील ! ”
तिन्ही बाजूंनीं भक्कम दगडी भित आणि फक्त एका बाजूनें लोखंडी गज असलेले पक्कें दार अशा त्या कोठडींत त्या अबला कंटाळून गेल्या; वतागूनही गल्या !
एके दिवशीं रात्रीं दहाच्या सुमारास रंगी कोठडीच्या बाहेरच्या बाजूस पाहात निजली होती. तेथून आकाशाचा कांहीं भाग दिसत होता. त्यांतील एका तेजस्वी चांदणीकडे बोट दाखवून रंगी रखमाला म्हणाली,
“ती बघ चांदणी कशी चमकत आहे. ती स्वर्गात आहे, म्हणूनच
?)
रंगीच्या बोलण्यांतील मतलब जाणून रखमा म्हणाली “* रंग, स्वगं बिग कांहीं काढू नकोस बाई ! कोणी तरी सोडवील आपल्याला ! आपलं कर्म वाईट म्हणून पडलों आपण केदेंत --”
दोघी कांहीं वेळ स्वस्थ होत्या. थोड्या वेळानें रंगी म्हणाली,
हयाम डा डा हह डह6अेडुड्ुिु््डसयाआयआगगधगसाखायआिथयायधथााााधधाधााा॒ब बुब॒॒जब॒ज॒यजजज॒जजजबजबजजजजजजझगडक ळी
कचेरीवर हल्ला ! ०३
“ भुजंगरावांनीं सूड उगविला खरा, नाहीं का मामी £--''
रात्रीचे अकरा वाजण्याची ती वेळ होती. तश्या वेळीं आरोपींना भेटण्यास कोणी येत नाहीं. पण आरोपींना भटण्याची स्पेशल परवानगी काढून आवा आणि भुजंगराव तेथ आले.
रखमा आणि रंगी ह्यांना तशा स्थितीत पाहिल्याबरोबर खरोखरच आबांना वाईट वाटलें. त्यांना गहिवरून आलें.
इतक्यांत तेथ बाहेर पोलिसांनी सदोबांनाही आणलें. त्यांचा तोंडांतल्या तोंडांत हरिनामाचा जप चालला होता.
भ्जंगराव प्रथम सदोबांना म्हणाले,
“ आतां झालें तें झालें, सदोबा ! गन्हयाबद्दल माफी मागून आपली सुटका करून घ्या-- '
“मी कसलाही गुन्हा केला नाहीं. विठोबा साक्ष आहे त्याला ! ”
“ रखमे, सदोबाला कांहीं कळत नाही ! ” आबा म्हणाले “ सावळ्या, बजा, खाशा यांनीं पिस्तुलं घरांत आणिली होतीं, भुजंगरावांचा खन करायला ! असं सांगा म्हणज सुटका होईल तुमची !... ... ही
रखमा आबाकडं डोळे फाडून पाहात बोलं लागली,
“मी खोटं बोलं ? जन्मांत एकदांच खोटं बोललें आबा ! ते तुझ्याच करितां ! त् केदेंत पडं नयेस म्हणून ! पुन्हा मी नाहीं खोटें बोलायची ! --'
बारा वर्षांप्वींची हकीकत रखमा येथ आतां बरळेल, असें आबांना वाटून त्यांनीं रखमाशीं बोलं नये, असें ठरविलें आणि ते रंगीला म्हणाले,
“रंग, तूं तरी मी सांगतों तसं ऐक बाळ ! घरीं तिनं अन्न सोडलं आहे. माझी अब्रू चव्हाट्यावर आली आहे ! एंक माझं ! --”
रंगी कांहीं बोलेना. ती मुळी वरच पाहीना. खालीं मान घालून बसली होती ती ! ...
“मी जबाब लिहून आणला आहे साऱ्यांचा ! फक्त ह्यांनी ह म्हणावं ! रावसाहेब आतांच सोडतील सर्वांना--* भुजंगराव म्हणाले.
“ खोटा जबाब मी प्राण गला तरी देणार नाहीं--'
रंगीनें भजंगरावाकडे पाहात म्हटलें, तिचे डोळे आग ओकत होते.
०४ साखर गोटी
इतक्यांत दूर अंतरावर कृत्रीं जोरानें भकत असल्याचा आवाज एंक येऊं लागला !
गांवापासून बऱ्याच अंतरावरील माळावर ही तर््हेगांवची कचेरी होती. पाहार््यावरील पोलिसांशिवाय रात्रीं तिच्या जवळपासही कोणी फिरकत नसत.
भुजंगराव मोटार घेऊन आले होते. झटपट काम उरकून मोटारीतून साऱ्यांना घेऊन जावें, असा त्यांचा विचार होता.
पण काम होईल, असें चिन्ह दिसेना. कब॒लीजबाबास कोणीच तयार होईना !
मन्या मोटारीचे हॉर्न वाजवून भुजंगरावांना बोलावीत होता !
कांहीं तरी तोड काढल्याशिवाय भुजंगरावांना तेथून उठतां येईना !
इतक्यांत दूर अंतरावर रंगीच्या माहितीची शीळ झाल्याचा तिला भास झाला ! तिचें मन तिला धीर देऊं लागलें !
कसला तरी निश्चय ठरवून रागाचा आविर्भाव आणून भुजंगराव म्हणाले,
“ रंगीला अशीच अद्दल घडली पाहिज. कसली अब्रू जाते तुमची आबा ? तिचा दिमाख उतरला पाहिजे आणि सावळ्याचा कांटा निघाला पाहिजे |! --
“कुणाचा कांटा काढणार म्हणतां ? त्या दिवशीं पाहिली तुमची ऐट!
रंगी बेधडकपणें बोलली !
यावर भुजंगराव चिडून उद्गारले--
“ पोलिसदादा, काय पोरटी बोलते, एकून घ्या! हिला सोड- वायला आलों आम्ही ! कार्टी काय गुणाची आहे पाहा तरी --”
“ कुणाला कार्टी म्हणतोस भुजंग्या--”
रखमा पिसाळून बोलली.
ती जोरजोरानें दाराचे गज हालव्ं लागली ! ती वाघीण दाराबाहर येऊं पाहात होती ! तिचा संताप तिला आवरेना !
ती थयथय नाचू लागली आणि ककश आवाजांत बोलली,
६ € 10 0 ल्य त | कचेरीवर हल्ला ! ०५
५४४५-४१-४४ ४५१४४४१ ७ "४४ "* ४ ४४४” २ शध 7 टी “२ ५ “४१ * *२ ४४%
“कर तोंड काळं ! इथं आम्ही मरू पण खोटं साफ बोलणारनाही ! त्या वेळी मध्यरात्र झाली होती. मन्याचें हॉन वाजविणे चाल होतें. इतक्यांत एक मोठी टोळी कचेरीत घुसली ! तींतील लोकांचा वेष अगदी पोलिसांच्या वेषासारखाच होता ! त्या टोळोंतील लोकांनीं एकदम कचेरीतील पाहारेकऱ्यांवर हल्ला केला ! त्यांच्या तोंडांत बोळे घातळे ! त्यांना करकचून बांधून टाकलें ! भूजगराव व आबा यांचीही अगदीं तीच गत झाली ! इतकें होईपर्यंत कांहीनी स्त्रियांच्या कोठडीचें कुलूप तोडलें. रखमा आणि रगी ह्यांना त्यांनीं मोकळे केलें ; आणि त्यांना ते बरोबर घेऊन गले. पाहाऱ्यावरील पोलिसांच्या बदुकाही धेऊन सारे लोक अगदीं जलदीनें पसार झाले. एकटे सदोबा मात्र तेथे मोकळे होते, हा सारा प्रकार ते आदवर्यानें पाहात होते व म्हणत होते “ विठोबाची करणी अगाध आहे. ती टोळी तेथून निघून गेल्यावरही ते जागचे हलले नाहींत ! फक्त ते खालील अभंग डोळे मिटून म्हणत होते-- तुज म्हणतात कृपेचा सागर । तरी कां केला पीर पांडुरंगा ॥ अजुनि का नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसी ॥
हे अभंगाचे दोन चरण घोळघोळून म्हणण्यांत ते अगदीं तल्लीन होऊन' गेले होते |
गोडाला कीड ग
(लः हेगांवच्या कचेरीवर हल्ला करणारी ती टोळी लगोलग जिकड तिकड पांगापांग करून निघून गली ! फक्त मन्याची मोटार त्याच्यासुद्धां चार माणसांना घेऊन ती पानगांवच्या खिडीच्या मार्गास लागली ! त्या टोळींतील लोक पोलिसांच्या वेषांत होते. तेव्हां हे नवे पोलिस, कचेरींतील पोलिसांवर कां तुटून पडत आहेत, हें रखमाच्या लक्षांत आलें नाहीं. त्यांच्या कोठडीचें कुलूप तोडतेवेळीं त्या दोघी फार घाबरून गेल्या. आपल्यावर आतां आणखी कोणता भयंकर प्रसंग गुदरणार, ह्याची त्यांना कल्पना येईना ” रखमाची तर बोबडीच वळली आणि बाहेरचा दंगलीचा तो भयंकर देखावा पाहून रंगी बंशुद्ध झाली ! त्या दोघी स्त्रियांना तुरुंगाच्या कोठडीतून बाहेर काढून त्या टोळींतील लोकांनीं त्यांना अलगत उचलून मोटारींत नेऊन ठेवलें. आणि क्षणाचाही विलंब होऊं न देतां ती मोटार चाल झाली. कोणीच हुं कां चूं करीत नव्हतें. सव अगदीं गुपचूप होते. तुरुंगावर हल्ला करणार्या लोकांच्या तोंडावर काळ्या कापडाचें आवरण होतें. ते सारे लोक सशस्त्र होते. कोणी गडबड केल्यास त्यांना तडाखे देण्याचीही त्यांची तयारी होती. ठरलेल्या शिस्तींत त्यांची काम अगदीं काळजीपूर्वक चाल होतीं. पोलिस आणि भुजंगराव यांच्या तोंड|त बोळे कोंबतांना थोडी झटापट झाली, पण झटकन त्यांचें श्रीमुख रंगतांच सव कारभार सुरळीत चाल झाला.
> रि गाडाला काड 0७०७
"२५४४-४४ ४१५ ४५१./९५७४९-४४-४९४./४४५४५/७४/४०
हा सारा प्रकार रखमाच्या दृष्टीसमोरून गेला होता. कोणा एका हरदासानें आंबंगांवच्या विठोबाच्या देवळांत तानाजी मालुसऱर्याचें आख्यान लावले होतें, त्या वेळीं तो सिहगडावरील झटापटीचें वर्णन करीत होता. त्याची आठवण रखमाला या वेळीं झाली ! तिच्या आइचर्यास पारावार राहिला नाहीं !
अश्या आइचयंचकित स्थितीतच तिला उचलून नेऊन मोटारींत ठवलें होतें. ती सावध होती, रंगीसारखी बेश्द्धीत नव्हती.
रात्रीच्या वेळी देखील ती मोटार भर वेगानें निघाली होती ! सडकेच्या दोन्ही बाजूंची अंधाराचा काळा बुरखा पांघरलेलीं झाडझुडप भीति वाटल्या- मुळेच कों काय, मागे मागे झपाट्याने पळत चाललळेलीं रखमाला दिसत होतीं !
ती मोटार सुमारें पंचवीस मेलांवर असलेल्या पानगांवच्या खिडोंतील एका उंच जागीं थांबली. तेथ रंगीला उचलून एका तरुणानें खांद्यावर घेतलें. रखमाला त्या तरुणाच्या मागून जावें लागलें. तो तरुण त्या दोन्ही स्त्रियांना घेऊन एका आडवळणाच्या जागीं गला !
रखमाला तो तरुण कोण आहे, हें चालतां चालतां कळलें. त्यामुळे ती नि:शंकपणें पाय उचलीत होती. ठरलेल्या जागीं येतांच तो तरुण रंगीचें मस्तक मांडीवर घेऊन शून्य चित्ताने आकाल्ञाकडे पाहूं लागला !
त्या वेळीं आकाशांत चांदण्यांची गर्दीच गर्दी झाली होती. जणूं काय, त्या तरुणाच्या मांडीवरील आपल्या मंत्रिणीला डोळे भरून पाहतां यावें, म्हणून त्या जमल्या होत्या !
रखमाची नजर सभोंवार गली. तिला दूरदूर हातपाय पसरलेल्या काळ्याकुट्ट टेकड्यांच्या रांगा दिसत होत्या ! मधून मधून झाडींतून चाललेली वन्य श्वापदांची हालचाल तिच्या कानांवर यंत होती आणि खालच्या दर्या- खोऱ्यांच्या पलीकडे सपाट मंदानांतील मंढपाळांच्या कुत्र्यांचे भूकणेही तिच्या कानीं यत होतें.
आतां गार वाऱ्याची झुळूक सुटली. त्यामुळे रंगी हळुहळू सावध होऊं लागली.
जवळच असलेल्या झऱर््यांतील थंडगार पाणी रखमानें ओंझळीनें आणलें.
*.--“
ण्ट साखर गोटी
»* ५ ५५८४५४५ ” ॥ “4 शु > 3५ जा > » ८ २.-९/०/- /५ ५ ११ ५ /५/२०४ ८५ /* ४५/*/*/१* ४५४५
रंगीच्या तोंडांत त्या पाण्याचे थोडे थेब जातांच अमृताचे बिढ मुखांत पडल्या- प्रमाण रंगी सावध झाली !
आपलें मस्तक एका तरुणाच्या मांडीवर आहे; हळ्वार हातानें तो आपलें कानशील थोपटीत आहे; आपल्या केंसांवरूनही त्याचा प्रमळ हात मधून मधून फिरत आहे; आणि तोंडाने तो आपल्या माहितीची गोड शीळ घालीत आहे; एवढी जाणीव झाल्याबरोबर तिला आपण तसेंच पडून राहावें, असें वाटूं लागलें.
किलकल्या नत्रांनी तिची दष्टि आकाशाकडे गली ! सदर चांदण्या तिला दिसल्या, पण रंगीला वाटलें, त्यांच्या स्वगसुखाला लाजविणारें पवित्र आणि सोज्ज्वल सुख आपण आतां ह्या पृथ्वीवरच उपभोगीत आहोंत !
त्या तरुणाला घाई होती. त्याला फार वेळ तेथे काढण शक्य नव्हतें. तो डोळे भरून रंगीकडे पाहुं लागला. ती डोळे मिटून सावळयाच्या मूर्तीचे ध्यान करीत होती.
त्या वेळी तो तरुण जरा अधीरतेने म्हणाला--
“रंग, सावध झालीस का ? आपल्या लग्नाला थोडेच दिवस झाले आहेत. पण त्या दिवसापासून मी वेड्यासारखा झालों आहें. आपल्या मन्यानेंच आपली ही भट घडवून आणली ! पुन्हा केव्हां आपली गां पडेल तेव्हां पडल ! आतां माझ्याशीं दोन दब्द बोल तरी ! --"
रंगीच्या डोळ्यांतून गंगायमुना वाहुं लागल्या. तिनें सावळय़ाच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. अश्च्ंच्या पुराने त्याची छाती ओलीचिंब झाली. त्याचें अंतःकरणही शांत होऊ लागले !
इतक्यांत मन्या दुरूनच म्हणाला,
“ सावळ्या, आटप लवकर ! फार वेळ लावूं नकोस ! नाहींतर साराच घोटाळा होईल ! --”
हे शब्द एंकतांच सावळ्यानें रंगीला छातीशीं धरलें आणि तो हळहळ बोलं लागला
रंग, तं काळजी करूं नकोस. मी कांही फांशी जात नाहीं. मी कूणाचा खून केला नाहीं. करणारही नाहीं पण ! भ्जंगरावानं आमच्यावर किटाळ आणलयं ! त्या दिवशीच साखरगोटीखालचं भांडण त्याला झोंबलं एवढं !
एणपशशणणध ताण 0ी 00 टी शी 00 णी पनल टना पापाने“.
गोडाला कीड ०७९
"४५०१०८.
१४५ -“४/४/४८४*- ४/५ “४ २८१ 2९-४५” “४५८ £श४शध्श र १२ - ऐशी एग धद २2 0२ १५४५०४० ९८ ५.» ५५४४. ९८९ -५६-५-/५/००><८
त्याचा खून करावयाचा म्हटला, तरी देखील मी करीन ! पण असलं पाप मला मुळीं करायचं नाही ! मन्यालाही करायचं नाही ! कुणालाच' पण करायचं नाहीं ! भुजंगरावासारख गरिबांना नागवितात, त्यांना अदल घडेल असं करायचं आहे आम्हांला ! त्यांत झालं तर गोरगरिबांचं कल्याणच होईल आणि भुजंगरावासारख्यांना धडा मिळेल ! --''
त्या वेळी सावळ्यानें आपल्या तोंडावरील काळा ब्रखा दूर केला होता. त्याच्या मुद्रेवरील गंभीरता रंगीच्या नजरेस येत होती. ती त्याच्याकडे पाहात म्हणाली,
“ सावळ्या, असलं कांहीं मला कळत नाहीं. आतां मला काय वाटतंय तेंही सांगतां येत नाही! मी काय करूं? कसं वागू ?...
“ रखमा मामी माझी आई आहे ! ती तुला सांभाळील ! तीच तुला कसं वागायचं तें सांगेल --
सावळ्याने हे शब्द भावनेच्या भरांत जरा मोठ्याने उच्चारले. पति- पत्नींना एकांत मिळावा, म्हणून रखमा जरा दूर जाऊन बसली होती. तिच्याही कानीं हे शब्द पडले.
रखमाला आतां राहावेना. तिला भडभडून आलें. ती स्फुदून स्कुदून रडूं लागली. तिचे हुदके ऐकन सावळ्या म्हणाला,
“मामी, तू इकडे ये बरं! ---
रखमा सावळ्याजवळ आली. ती मांडी घालून बसली. तिच्या एका म.डीवर सावळ्यानें डोकें ठवलें. दुसऱ्या मांडीवर रंगीनें आपलें मस्तक ठेवलें.
त्या प्रभातकाळीं परमेश्वराचे चितन करीत रखमानें आपले दोन्ही वरदहस्त त्या दोघांच्या मस्तकांवर ठवले होते.
इतक्यांत मन्याने सावळ्यास तयार राहाण्याचा गडबडीनें इश्यारा दिला. कोणी तरी माग काढून तिकडं येत असल्याचा त्याला संशय आला.
पण तो खाज्या होता. त्याला तर्हेगांवच्या हालचालीवर नजर ठव- ण्यास मन्यानें सांगितलें होते. तो सायकलवरून अत्यंत वेगानें आला होता.
त्यानें येतांच तर्हेगांवची हकीकत सांगितली.
“ आरडाओरड होऊन कचेरीकडे एकादा दुसरा माणूस येऊ लागला आहे. आपला पाठलाग होण्याचा संभव आहे. ”
टन:
८७ साखर गोटी
ही माहिती कळतांच मन्याने सावळ्या आणि खाज्या यांना आडरस्त्यानें ताबडतोब निघून जा, असें सांगितलें. रंगी आणि रखमा ह्यांना मोटारींत नेऊन बसविलें.
त्या दोघीजणी पुन्हा दिडमूढ होऊन गेल्या !
त्यानंतरचा मन्यानें चालविलेला आतताईपणा पाहून तर त्यांना चक््करच येऊं लागली !
मन्यानें आपल्या खिश्ांतून चाक काढला आणि आपल्याच अंगावर दोनचार ठिकाणीं जखमा करून घेतल्या !
त्यानें आपले कपडे फाडले; त्या दोघींनाही आपलीं लुगडीं फाडा- वयास लाविली !
एक मोठा धोंडा हातांत घेऊन त्या मोटारीस दोन चार ठिकाणी पोचे पण पाडून घतले !
त्यानें स्वत: हे वेडेचार केळेच आणि त्या दोघीनाही बेशुद्ध असल्याचें सोंग करून मोटारीत स्वस्थ पडन राहाण्यास सांगितले !
त्यांनीं मुकाट्याने मन्या सांगतो त्याप्रमाण केलें ! मन्या सांगेल तसें एंकावेंसेंच त्यांना वाटलें ! त्यांच्या मनावर मन्याच्या क्तत्वाची अश्लीच कांहीं विलक्षण मोहनी पडली होती !
पुन्हा मोटार भर वेगानें तर्हेगांवच्या रस्त्यास लागली.
लवकरच मन्याची मोटार तर्हेगांवच्या कचेरीसमोर येऊन उभी राहिली.
लोकांचा आणि पोलिसांचा घोळका त्या मोटारीभोंवतीं जमला. चक्क उजाडले असल्यामुळं मोटारींतील सारा प्रकार लोकांना उघड उघड दिसत होता.
मन्या अधिकाऱ्यांना सव हकोकत सविस्तर निवेदन करूं लागला,
आपण कचेरीवर हल्ला करणाऱ्या लोकांचा पाठलाग कसा केला; त्या टोळीच्या हातून ह्या स्त्रियांची सुटका कशी करून घतली; आपण किती जणांना जखमी केलें, आपल्याला कशा जखमा झाल्या; आपल्या मोटारीची नासव्स त्या चोरट्यांनी कशी केली; ह्या स्त्रियांची अन्र घेण्याचा प्रयत्न त्या गुंडांनी कसा केला; त्या झटापटींत आपलें आणि ह्या स्त्रियांचे कपडे कसे फाटले--
-गोडाला कीड ८९
इत्यादि सविस्तर हकीकत त्यानें निभंयपणे सांगितली !
सर्वांनी त्याच्या ह्या धाडसी पराक्रमाचे कौतुक चालविलें ! सरकारी अधिकाऱ्यांनीही त्याची वाहवा केली !
भुजंगरावांच्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारख झालें. आपल्या दिमतीस असलेल्या आपल्याच इसमाच्या शौर्यामुळें दोन्ही स्त्रियांची सुटका झाली, ह्याचें त्यांना भूषण वाटलें !
आतां आपण पोलिसांच्या मदतीनें आरोपी लवकरच पकड, अशीही बढाई मारण्यास भुजंगरावांनी कमी केलें नाहीं.
सावध असलेल्या पण बशुद्धीचें ढोंग केलेल्या ह्या दोघी स्त्रियांना मन्यानें सांगितलेल्या हकीकतीची विलक्षण गंमत वाटत होती ! पण त्यांना हं कीं चूं करतां येत नव्हतें !
कांहीं वेळाने त्या स्त्रिया शुद्धीवर आल्या. मन्याच्या जखमाही बांधण्यांत आल्या ! ी
मन्याच्या कर्तबगारीचें वणन पुण्यामुंबईच्या वर्तमानपत्रांत भरप्र आलें !
ई.. // ई.. . जॉ
भुजंगरावांनी रंगी, रखमा, आणि सदोबा यांची तुरुंगांतून सुटका करवून घतली ! सर्वे मंडळी आंबंगांवास आली.
रखमाच्या घरी असलेले साखरगोटीचे आंबे पिकून नासंही लागले होते. तें पाहन रखमा म्हणाली --
“रंगू, ही साखरगोटी गोड खरी पण फार नासकी आहे ही! सावळ्याच्या बापाचा हिनें बळी घेतला; तुझा भाऊही हिनं घालविला आणि आज सावळ्यावर तीच पाळी आली ! ---'
“ मामी-- रंगी म्हणाली, “ साखरगोटीनं काय केलं आहे बरं! ती कितीक पिढ्या तिथं आहे. तिचीं फळं गोड म्हणून हे हेवेदावे ! गोडा- मागं कीड असायचीच ग ! ---'
रंगीच्या ह्या वेदांताने रखमा चकितच झाली !
आणि सदोबा आपल्या एकतारीवर अभंग म्हणूं लागले,
बिल विडल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥।
“५ "४५८ “/ ५* €५ ४" ४५४४४”
नका करूं नाश आयुष्याचा 5.
सुत रगोटीप्रमाण भूजंगराव आरंभी कांही कांही बाबतींत गोड विचाराचे आणि आचाराचेही पण होते. त्यांना लहानपणापासूनच
तालमीचा नाद असे. कुस्त्यांच्या फडांत त्यांची पंच म्हणून निवड होई. एवढ्या लहान वयांत तो मान त्यांना मिळे, ह्याचें कारण त्यांचें मल्लयुद्धांतील नेपुण्य हें तर खरेंच, पण त्यांच्या नि:पक्षपातीपणाच्या गुणामुळेंही हा मान त्यांच्याकडे चालून येई!
भूजंगरावांना भेदरट तालीमबाजांचा फार तिटकारा असे. असे लोक आपल्या शक्तीच्या बळावर गांवांतील गोरगरिबांवर गुरकावतील; पण सरकारी अंमलदारापुढे तेव्हांच माना वांकवितील. सेन्यांतील धेर्याच्या आणि शोर्याच्या कामगिरीकडे ते ढ॒कनही पाहाणार नाहींत. अशा आड- मुठ्यांचा उपयोग राष्ट्राच्या दृष्टीनें कांहीं नाहीं, असें त्यांचें मत होतें.
राष्ट्रीय बाण्याचे किवा निदान उमद्या विचाराचे तरुण संन्यभरतींत अधिकाधिक यावेत, म्हणून ते अर्हानश खटपट करीत असत. मन्यासारख्या निधड्या छातीच्या तरुणाच्या साहाय्यपरामुळे त्यांचें कार्य बरेंच यशस्वीही होत असे.
आंबंगांवचे कांहीं तरुण आपल्या विचाराचे आहेत, असे त्यांना आरंभा- पासून वाटत असे. म्हणून त्याकरितां आंबंगांवीं ते वरचेवर येत. पण आतां मात्र त्यांचें मत आंबंगांवाविषयीं उलट होऊं लागलें !
तर्हेगांवच्या कचेरीवर झालेला हल्ला खाशा, बजा आणि सावळ्या ह्यांच्या पुढाकारामुळे झाला, असा सुगावा पोलिसांना लागलेला त्यांच्या
क कट. पो क्य र
नका करुं नाश जायष्याचा ८३
%- 2 १७७७१७० ७३. ७५ क 9 १. धे क क ४. ४- ४0२ ४.0४. ७.” “१८. “४-५ 71...» 0५.५७ १४ ८ "कचे, «४७.» 7७.५ ७. 4 क.७४/.५४ ३. ७ ७. ४१४७ ४, 4 जि.» ७.४ ७.७ १» ७_// ७७.४” "््€ * “४८-४0 009 »/% » ४७ “7७. // ७../०१७ /- क्क
कानीं आला ! मन्याचें देखील त्यांत अंग असावें, असेंही गुप्त पोलिस खात्यांतील एक अधिकारी भुजंगरावांजवळ अप्रत्यक्षपणे बोलले !
मन्यावरील पोलिसांचा असला संशय भुजंगरावांना पटला तर नाहीच, पण अशा प्रकारच्या संशयी वत्तीमुळे कर्तबगार लोकांत असंतोष माजतो, असें त्यांनी सरकारी अधिकार्यांना बजावले होतें.
वास्तविक सरकारी अधिकारी जें बोलत होते, तें त्यांना मिळालेल्या
माहितीवरूनच बोलत. अशा गुप्त नोंदी त्यांच्या कचेरीत करून ठेवलेत्या असत. मन्याविषयीच पाहा ना ! पोलिसांनी मिळविलेली माहिती त्यांच्या गुप्त दप्तरांत पुढीलप्रमाण होती.
“ मन्या रामोशी हा महा बिलंदर दंगेखोर आहे. हययाच्या बापजाद्यापासून ह्याचा मोठमोठ्या चोर्या करण्याचा धंदा आहे. ह्यानेही अनक चोऱ्या केत्या आहेत. त्या चोरीतील हजारों रुपयांचा सोन्याचांदीचा माल भुजंगराव देगमुखांच्या साहाय्यानें आटवून
भुजंगरावाच्या आश्रयाखालीं हा असल्यामुळे ह्याच्या विरुद्ध भरपूर पुरावा मिळू शकत नाहीं. म्हणून त्याच्यावर खटला करतां आला नाहीं --
ही मन्याच्या विषयीची जुनी हकीकत झाली. त्यांत नवीन भर पुढील-
प्रमाणे पडली आहे.
“ मन्या हा एका गुप्त टोळीचा पुढारी असावा, असा दाट संशय आहे. ही टोळी आपल्याला गरिबांचा वाली समजते. श्रीमंतांना लुटून ती संपत्ति गरिबांस वांटून देण्याचा तिनें धूमधडाका सुरू केला आहे ! --
"मुंबईतील मजुरांच्या चळवळींतले लोक ह्या टोळीत असावेत.---'
ह्या पोलिसांच्या माहितींत खरेखोटपणा कितपत आहे, हें कळण्यास
इतरांना मार्ग नाही.
पण मन्याची गुप्त टोळी होती, ह्यांत संशय नाहीं. त्यांत अलीकडे
आंबंगांवचे खाशा, बजा, सावळ्या हे तरुण सामील झाले होते.
"४४ टंणिणिणाणपणणाश ण शोण शीण? णक टीणी?ी?0 पणा पीथाश णा 00? टफ्सन----:-:---_ .--4---.----.<.
८४ साखर गोटी
४४४४४४५४५४ ५-४५५५९५/५/५५५५५-०/४-/५८४१५-/५-/४/५५१४५४५५//"५/१०४/४/४५-/४-/४/४-४/४-/५-
ही परिस्थिति उत्पन्न होण्यास भ्जंगरावांची बदललेली वत्तिही कारणीभूत होती हेंही तितकेंच खरें !
नाहींतर मन्यानें मिळवून दिलेल्या संपत्तीचा दुरुपयोग भुजंगराव करू लागले नसते.
आतां भूजंगराव आपल्या जमिनीजवळच्या गोरगरिबांच्या जमिनी संपत्तीच्या जोरावर बळकावू लागले होते ! धाकदपटशा दाखवून दलित वर्गाकडून ते मोफत कामं करून घत होते ! आपल्या संपत्तीचे एकाचे दोन भल्याबुऱ्या मार्गांनी कसे होतील, ह्याचा त्यांना हव्यास लागून राहिला होता !
थोडक्यांत म्हणावयाचे म्हणजे संपत्तीचा मद त्यांना चढला होता !
संपत्ति आणि स्त्री यांच्या लोभानें माणसाच्या अंगच्या सदगुणांचे भातेरें होतें !
रंगीच्या प्राप्तीच्या ळोभानें भुजंगराव सावळ्याचा द्वेष करूं लागले. त्याला नेस्तनाबूद करण्याचा त्यांनीं आतां विडाच उचलला.
साखरगोटीचे आंबे जादा उबमुळे जसे नासूं लागले, त्याप्रमाणे स्त्री आणि पंसा यांच्या जादा मोहामुळे भुजंगरावांच्या अंगचा मूळचा गोडपणा आतां नासण्याच्या मार्गास लागला. त्यांच्या मनांत आतां नासक््या विचारांचे प्राबल्य वाढ लागलें !
त्यांत पुन्हा स्वाथंलंपट आबांच्या लोभाची भर पडली.
रंगीची पोरकट वागणूक आतां आबांना जंथ तेथें नडूं लागली. भुजंग- रावही कांहींसे नाखूष झाले. त्यामुळे आबांना गृत्त्याचे मक्ते मिळण्याची शक्यता दुरावूं लागली !
रंगीसारखी गोड पोर आपल्यापासून दूर राहूं लागली, ह्याचें तर
-त्यांना फार वाईट वाटूं लागलें !
केदतून सुटून आल्याला आतां एक महिना झाला असेल, पण रंगी त्या वेळेपासून रखमाकडंच राहिली होती. ती आबांच्या घरीं येत जात नसे, असें नाही. पण रखमाचें घर तें आपलें घर असे तिला वाटं.
सावळ्याचे मधून मधून येणारे निरोप रखमाकडंच येत. अक्या प्रकारे कळणाऱ्या सावळ्याच्या खुशालीवरच समाधान मानून तिला आयुष्याचे दिवस कंठणं भाग होतें !
नदान. -------:- "*:५« “० 171 --.__.___.____________>__-क्््कलल्लाशशााी शशी ण कशकेणणाणीका एणफणणी
नका करूं नारा आयुष्याचा ८५-
*-१%-/"*”'%*. "/ २.५ २. २..” १_” %..” ४.” १...” २.५ >.” ५ ८ ७. ५४ >...” १-५ >” ९७.” %.// ५ १” २.४ वी ४४-५०.” ४
आतां सावळ्याला आंबंगांव बाजूस फिरकणही अशक्य होऊन बसलें होतें. पोलिसांची टेहळणी आतां त्या भागांत फार कडक होती. म्हणून त्याला जंगलांत किवा डोंगरांच्या दऱ्याखोर््यांत दडून राहाण्याशिवाय गत्यंतर नव्हतें !
अशा प्रकारे सावळ्या आंबंगांवास यंऊं शकत नव्हता, हें आबांच्या पथ्यावरच पडलें
सावळ्यास पकडण्यांत यावे आणि त्यास जबर शिक्षा व्हावी, असेंही त्यांना वाटूं लागलें होतें. कारण तसें झाल्यासच रंगीसंबंधी त्यांच्या मनांत घोळत असलेली योजना सुरळीत पार पडणार होती !
रंगी आतां घरीं राहात नाहीं; रखमाकडच राहाते, हें आबांना पसंत नव्हतं. बेताबतानें तिची समजत घालून तिला घरीं आणावें, असें त्यांना वाटत होतें.
मानसिक त्रासाचा परिणाम रंगीच्या प्रकृतीवर झाला होता. तिची प्रकृति बिघडं लागली होती. गोराबाईच्या हें लक्षांत आले होतें.
त्या रंगीला घरी बोलावून आणीत, कांहींतरी गोडधोड तिला खाण्यास ' देत. तिच्या प्रकृतीची विचारपूस करीत.
अज्लीच एकदां रंगी आबांच्या घरीं आलो होती. गोराबाईनीं दिलेला संठगूळ खाऊन त्यावर ती दूध पीत होती.
इतक्यांत तेथे आबा आले. त्यांनीं प्रमळपण तिच्या पाठीवरून हात फिरविला. प्रक्रतीबद्दल चोकशी केली. आणि ते अगदीं गोड इब्दांत तिला म्हणाले--
“ रंगू, आतां तू आपल्या घरीं राहा कशी ! मला तर तूं घरीं नसल्या- मुळें अगदीं चुकल्याचुकल्यासारखं होतं. आपला मळा सोडून सावळधाच्याच मळ्यांत राखणीस जातेस. आपल्या मळ्यांत जाण्याचे, घरांत येण्याचे टाळतेस, हें मला नाही बरं दिसत, बाळ ! --
आबांच्या मनांतला हेतु रंगीच्या लक्षांत तेव्हांच आला. त्यांना समजसें जरा स्पष्टपणे बोलावें, असें तिच्या मनानें बरेच दिवस घतले होतें ही संधि बरी आहे, असें वाटून ती हळुहळू मुदु शब्दांत म्हणाली,
अभिन्न तन,
टहु साखर गोटी
*%.//४५.// *.५४४१ /” ४ /४..” ५.» ,» ४४.” 0४.” “४२ / * .»/%_//%-/” ५ कक १७०० ७७ जॅ. २. १.५४ »/॥%_” . १. ७_” १. १./1 १. ४-४ २“ २.» ४५.” ४.” ४.” ४४-४४ २. ५.४१ २_.५११५-./” २.४.” ६_./.// '%.// १७ ८७.» ७.
माझं घर आणि तुमचं घर दोन्ही माझींच घरं ना? माझं आतां लग्न झालंय आबा, म्हणून मी सासरीं राहातें--
रंगीचा बोलण्याचा हेतु आबांनी जाणला. आपल्याही मनांतला हेतु तिच्या ध्यानांत आणून द्यावा म्हणून ते बोलं लागले,
“ रंग, तुझ कल्याण व्हावं, हीच माझी इच्छा! पण रखमीच्या नादानं कांहीं तरी बोलं नकोस ! लग्न म्हणजे कांहीं पोरखेळ नव्हे. खेळांत पोरापोरींचीं लग्नं होतात, तीं काय सारीं खरीं असतात ? आपण मराठं म्हणज क्षत्रिय आहोंत. त्यांचीं लग्नें देवाब्राह्मणांच्या साक्षीने, मराठ्यांच्या घरंदाज पद्धतीनं झालीं, तर तीं खरीं लग्नं...
“ पण आतां नुसत्या नवरानवरीच्या गळ्यांत माळा घालून मराठा भट लग्नं लावतो की---
गौराबाई रंगीवरील सहानुभूतीने मध्येच बोलल्या.
“ गप्प बस ! तुला काय कळतंय ! उचलली जीभ लावली टाळ्याला ! रंगीला तूच बिघडविलीस ! नाही तर किती गुणाची पोर होती ही ! --
आबा गोौराबाईवर उसळून बोलले.
हा चाललेला प्रकार रंगीला बोलावण्यास आलेली रखमा दाराआडून ऐकत होती. गौराबाईना आबा टोंचून बोलले, हेंही कांहीं तिला आवडले नाहीं.
---शिवाय तिलाही रंगीच्या लग्नाविषयीं आबांना खडसून बोला- वयाचें होतें. आबांचा रंगीवरील घुस्सा तिला चांगला माहीत होता. ती लगंच आंत येऊन म्हणाली,
“ रंगीनं असं काय वावगं केलंय ? ती कांहीं कुणाचा हात धरून गेली नाहीं ना ? तिचं अन् सावळ्याचं लग्न पुष्कळ दिवस ठरलंच होतं ! मीच ठरविलं होतं तें! --
“ पण तं कोण ठरविणार ? ” आबांनी म्हटलें.
आबांचा चेहरा लाल झाला होता. भांडणाऱर्या बोक््याप्रमाणे त्यांच्या डोळयांत संतप्तपगणा दिसत होता !
आबा रखमाला इतकें टाकन बोललेले आजच गोराबाईनीं पाहिलें त्यांना आश्चर्य वाटलें.
न८----------५५-८८-५-८ ५८८५-८० ४४ ण 0पीशशशी0ीशा ताला
न॑का करुं बाश जायुष्याचा ८०
हिशाबाखाजन य अना
"४-४ “टीप ८४ ४० -”४००४-४ ४-४ - ४-०” ४-०५-”/४-/४४/४-४० 00८” १४५//९- /0७” 0४.७ 0५८७0७० ४
आबांच्या रागाच्या बोलण्याला रखमानें पण खडकावून उत्तर दिलें. आपला हात पुढे करून ती फणकाऱयानें बोलली,
“मी तिची आणि सावळ्याची मामी ! मीच ठरविणार! मला कांहीं तिचा मळा अन् साख रगोटी घशाखालीं घालायची नाहीं! --”"
आबांच्या मर्मी हे शब्द लागले.
इतक्यांत “ आबासाहेब ! आबासाहेब ! ” अन्ना हांका मारीत गुंडभट वाड्यांत आले.
गुंडभटांची व आबांची भेट बर्याच दिवसांत झाली नव्हती. गुंडभट आबांच्या घरीं नेहमीं येई, पण आबा कोठें तरी परगांवीं गेलेले असत. तऱ्हे- गांवीं तर त्यांच्या सारख्या फेऱ्या चाललेल्या होत्या. सावळ्या, बजा, खाशा यांच्या हालचाली समजाव्या, म्हणून आबांची हरएक प्रकारची मदत पोलिस घेत होते.
ही गुंडांची टोळी आतां पुष्कळ धीट झाली होती. श्रीमंतांची धान्याची कोठारे लुटून त्यांनीं तीं कित्येक ठिकाणीं गरिबांना वांटलीं !
कवडीन् कवडीचा खोटानाटा हिशेब करून अडचणींत सांपडलेल्या गरिबांकडन पेसे काढून, गडगंज संपत्ति मिळविलेल्या लोकांचीं घरें ह्या टोळीनें लु टलीं; आणि लुटींतील एंवज गोरगरिबांना बहाल करून टाकला !
सारांश, अशा प्रकारें कायद्याच्या अंमलास त्यांनीं अडथळा आणिला म्हणून गांवोगांवीं ह्यांचा पत्ता लावण्याकरितां पोलिस अटोकाट प्रयत्न करूं लागले.
त्यांनीं हया लोकांची सूक्ष्म माहिती काढण्याकरितां गांवोगांव आपले ग्प्त दुत ठवले होते. हीं काम गांवांतील लोकांकडूनच बहुधा ते करवून घेत
आंबंगांवचे आबा मोरे हे तर सरकारला उघड उघड मदत करणारे अशी त्यांची जुनी प्रसिद्धि होती.
पण मगनशेठची तश्ी स्थिति नव्हती. ते काँग्रेसचे कट्टर अभिमानी
होते.
भुजंगराव, आबा यांच्याप्रमाणे काँग्रेसच्या चढत्या काळांत ते कोग्रेसमन' झाले नव्हते. महात्मा गांधी काँग्रेसमध्ये शिरल्यापासून मगनशठ कांग्रेसचे सभासद होते. विलायती जिनसांचा व्यापार ते काँग्रेसची स्वच्छ खादी
न न-ाा--------*----->>-:--२->-२->>----2----०----ााा----०--५-:॥-----२>*-२-----भाा-2 च >->>>
८८ साखर गोटी
न ५९-०८ * “४५/४०/४४४६ ४ १--” ४५-८४ “0. “"%.”/४७./१७ “४ “४७” ८ * “४ ४*/ ४-८ “४५४” ५ ४-४-- ४” “४८८४ “ ४५ ४-४ € ४ ४ ८ ५-५- 0५०१%४..”/७,/”/ ७४७
वापरून करीत ! पण आतां दरवडखोरांच्या बंदोबस्ताकरितां तेही गुप्त दूताचे काम करूं लागले !
गृंडभटाचें काय ? पेसा दक्षिणसाठीं देखील वाटेल तीं कामे ते करीत ! मग सरकारी मदतीचा लभ्यांश पदरांत पडं लागल्यानंतर सावळयाच्या हालचालींच्या गुप्त बातम्या पुरविण्याचे काम त्यांनीं पतकरळलें ह्यांत नवल वाटण्यासारखे कांहीं नाहीं.
म्हणूनच ग् डभट नेहमीं आबांच्या घरीं येत ! गोराबाईशीं बोलत ! रखमा, रंगी यांची विचारपूस त्यांच्याजवळ करीत. रखमानें न कळत सावळ्याकडून आलेला निरोप गोराबाईंच्या कानावर घातला असल्यास तो युक्तीनें भटजी त्यांच्याकडून काढून घंत !
मात्र आज ग्डभट आले होते, ते अगदो वेगळ्या कामाकरितां आले होते. लग्नसराई चालली, पण त्यांना तशी कांहों अपेक्षेप्रमाणे मिळकत होत नव्हती. आबांना कांहीं तरी सांगून एकाद घबाड हातीं लागले, तर पाहावें असा त्यांचा हेतु होता. मोठ्या धम मातंडाचा आव त्यांनी आज आणला होता. अंगभर भस्माचे पट्ट॒ त्यांनी फासले होते ! कपाळास आडवें पांढरे गंध लावन त्यांनीं डोकीस आपली जूनी पुराणी पगडी घातली होती ; आबांच्या खोलींतील बेठकीवर जठा मारून त्यांनीं तंबाख् तोंडांत टाकली होती. तिची पिचकारी तेथून त्यांनीं खिडकीच्या बाजूस मारली पण तो सडा बेठकीवरच उडला होता !
आबा त्या खोलींत येऊन जरा सचित स्थितींत बसले होते. पण भटजींनीं एकदम कांहीं तरी बोलावयाचे ठरवून आपली मान झाडली व ते म्हणाले,
“ आबा, मी बोलतों त्याचा राग येऊं देऊं नका. मी स्पष्टच आज बोलणार आहे, म्हटलंच आहे को, “ नि:स्पृहस्य तृणं जगत्---
गुंडभटाकड आईडचर्यानें पाहात आबा म्हणाले--
“बोला गरुजी ! बोल नका म्हटलं तर माझें तुम्ही थोडंच ऐकणार आहांत !| मग बोलाच कीं---''
“ आबासाहेब मी खरं तेंच बोलतों '' गुंडभटजी आबाकडे नजर टाकीत बोलूं लागले. ' तुमच्या घरांत कोणीं जन्मलं, मेलं किवा कुणाचं लग्न झालं,
रिभ निभ नमन . पस ल ज्य - ---- २-२ -__--->८-->>--. स्ट टया
टनी ०-८ साधण "ण ली न
नका करूं नाश फायुष्याचा .८ ९
>* ५०-१४ १/७
७५७५..९.१.”९-/९.०५-” “९ ४-५ ८४-५५” /४-७४५५४५./७ १.५ “० 7 /१/५ ५०५ १ शी २५९१९ष्टी 9 * १९१ ४४५१ ४४१८४१/१/४/४/४/४/४१-
तर भटपणा माझाच. तुमचा आमचा स्नहही तसाच ! मी तुमच्याकरितां वाटेल तें केलं ! खुनाच्या खटल्यांत मी तुमच्याचकरितां खोटी साक्ष दिली ! एका पोटगीच्या दाव्यांत तुमच्या सांगण्यामुळं मी खोटं गंगापूजन केल्याचं सांगितलं ! काय सांगावं, तुमच्या लोभामुळें मी किती तरी वेळां खोटं बोललों ! आणि रंगोचं लग्न भटाशिवाय झालेलं तुम्हांला चालतंय ? अहो तें लग्न नव्हे ! हा काय अनर्थ तुमच्या घरांत ! उगीच नाहीं म्हणत मी धर्मं बुडाला म्हणून ! पाखंड माजलं ! कली मातला ! हरे राम ! हरे राम! हरे राम ! --
“ मग काय करावं म्हणतां गुरुजी ! --
आबा सचितपणे बोलले,
“ करायचं काय ! ” ग्डभट उत्साहानें बोलं लागले, “ पोरीचं लग्न' आपल्या पूर्वापार चालौरीतीप्रमाणे करा. चांगलं खंबीर स्थळ आणा, मी लावतों लग्न !
“ पोर्टी पण काय' करील ह्याचा नम नाहीं, गुरुजी ! --”
आबा काळजीच्या मुद्रेने बोलल.
“* वाटेल तें करणारे आबासाहेब तुम्ही, पोरीची सबब सांगतां? तुम्हांलाच धर्म बुडवावयाचा आहे, झालें! ”
गुंडभट हातवारे करीत बोलले.
दोघेही कांहीं वेळ स्तब्ध बसले. ते कांहीं तरी विचार करीत होते. आतां आबा बोलणार, तों भुजंगराव आल्याची वर्दी आली.
त्यांच्या बरोबर दहाबारा सशस्त्र पोलिसांची तुकडी होती.
आणखी हा नवीन कसला घोटाळा आहे, अशी शंका आबांना आली.
सारे पोलिस आबांच्या ओटीवर बसले. आबांच्या खोलींत भुजंगराव शिरले.
गुंडभटजींना भुजंगरावांनीं रामराम केला.
“हरे राम! हरे राम! ' हा गुंडभटाचा मंत्र चालूच होता.
इतक्यांत वाड्यांत सदोबा आले. ते तडक स्वयंपाकघरांत गेले. त्यांनीं अंगावर धोतर घेतलें होतें. त्यांच्या तोंडावर गंधाच्या मुद्रा होत्या. 'ते म्हणाले,
षु
९० साखर गोटी “अग ए, घरी चलकी ! -- रखमा गौराबाईशी कुजबुजत बसली होती. रंगी केव्हांच घरीं गेलो
होती. मळ्यांत जाण्यास उशीर होत आहे, तें सांगण्याकरितां तिचा निरोप
घऊन सदोबा आले होते.
जातां जातां त्यांच्या नजरेस पोलिस पडले. त्यांनी आडचर्यानें त्यांच्याकडे पाहिलें.
ते पोलिस सदोबाकडे पाहून हंस लागले. तर्हेगांवच्या तुरुंगांत ही व्यक्ति होती. तेव्हांच्या गंमती पोलिसांना आठवल्या. पण सदोबा त्यांच्याकडे पाहात पुढील अभंग गुणगुणत चालले होते !
आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करुं नाश भायुष्याचा ॥।
कसायाच्या घरा 4.4
छकाांच्या वाड्यांत पोलिसांना येऊन फार वेळ झाला नाहीं, तोंच चावडींत उतरलेल्या त्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना तांतडीचे बोलावण आलें ! पोलिसांना ताबडतोब तिकडे जाण भाग पडलें. त्या पोलिसाच्या दुपारच्या जेवणाची छान व्यवस्था करण्याविषयी भुजंगरावांनीं वाड्यांत आल्याबरोबर आबांना सुचविले होतें. त्याप्रमाणे आबाही ह्या मडळोना एक बोकड पुरेसा होईल किवा नाहीं, ह्याचा विचार करीत होते. पण तें सुग्रास भोजन पोलिसांच्या मुखांत पडण्याचा योग नव्हता ! विचाऱर््यांना उन्हातान्हाची पायपिटी करीत जवळच्या एका खड्यांत सावधगिरीने जलद जाण्याचा हुकूम मिळाला होता ! असा कांहीं प्रकार घडून यईल, ह्याची भुजंगरावांना कल्पना नव्हती. पण चावडींत नुकत्याच आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना एक महत्त्वाची बातमी मगनशठनीं पुरविली होती. जवळच्या एका खेड्यांत दगखोर लपून बसले आहेत, अशी ती बातमी होती ! पण सारेच पोलिस कांहीं तिकडे गळे नाहींत. त्यांपैकी कांही साव- ळ्याच्या घरावर पाहारा करण्याकरितां राहिले. कांही त्याच्या मळ्यातही “टेहळणी करण्याकरितां गले. हा प्रकार पाहून आबा भुजंगरावांना म्हणाले-- “ इथं आज दंगाबिगा होण्याचा संभव आहे कीं काय भुजंगराव?" “तशी कांही आतां काळजी करू नका आबा तुम्ही ! सावळ्या
९२ साखर गोटी
“४५८ €१४१/४*४१.७१./४-/१/४-/५* ५५५१ ५८% “५/”६/४१-४% “१.१ /४ /0४/ ४४१५0१ 0 09 /१*/४/*/१>/१” £१ ५ 7१/९ ५९ /५/४ * ४ /१५/*/ ॥ ४ /%५% ४४-४४ ४०१ “५ /७ ९ ४ ७ £ “१.७७
आज इकडे फिरकण्याचा संभव आहे म्हणून पोलिसांचा पाहारा आहे त्याच्या घरावर ! पोलिस माझ्याबरोबर नंहमींच असतात. मन्या नसतो. पान- गांवचा वाडा सांभाळण्याकरितां आतां त्याला मीं घरीं ठवला आहे. फार प्रामाणिक आहे तो ! माझ्या रक्षणाकरितां पोलिस असल्यामुळे आमच्या सेन्यभरतीच्या सभा आतां बिनधोक पार पड् लागल्या आहेत. नाहीं तर काय' हो ! अशाही सभांवर गुडांनों हल्ले चालविले होते ! बरोबर मन्या असे, म्हणून मला काळजी नसे !
भुजंगराव आबांना धीर देत म्हणाले.
तरीही आबा कांपर्या स्वरांत म्हणाले,
“ मग आज हे इतके यमदूत येथं कशाला ? कांहीं म्हणा, मला देखील पोलिसांची भीति वाटं लागली आहे, भजंगराव ! --”
आबासाहेब, तुम्हांला भीति कसली ? तुम्ही कांहीं गुन्हा केला
नाहीं ना?"
“मी कशाला ग्न्हा करितों. पण ती रखमा आहे ना? कचेरींत कांही तरी बडबडत होती, तशी बडबडेल देखील एकादे वेळ पोलिसांशीं ! ...'”
आबा स्चितपण म्हणाले.
“ असल्या भुरट्या स्त्रीची तुम्हांला भीति वाटते आबासाहेब ? --
भुजंगराव आंगठ्या जवळचें बोट हलवीत बोलले. त्यामुळे आबा लाजल्यासारख झाले !
.. ऱ््ॉ श्र
सायंकाळच्या सुमारास चावडींत पुष्कळ गांवचे लोक जमले होते तेथ स न्यभरतीची सभा होती. त्या सभंत सन्यभरतीच्या स्पेशल अधिकाऱ्याने, इंग्रजींत भाषण केलें. भुजंगरावानीं त्याचा चांगला लोकांना समजसा मराठींत अनुवाद केला. त्यामुळें तो इंग्रज अधिकारी खूष झाला ! आणि भुजंगरावास म्हणाला,
“ तुम्ही फार चांगलं काम करितां ! तुम्ही संन्यांत या भुजंगराव ! तुम्हांला बादशाही कमिशन मिळेल कीं --”
भुजंगरावांनीं होय' म्हणून उत्तर दिले खरें, पण त्यांचें मन तसें करण्यास
न्ा०---->>:>>>><<>>-<“:::-*-----॥प-:-भ-ा-५ापाप--:------>--:----------५--->:>>->---०2-५५४॥- 22८ लाशशसकिकिशि0ी 0)! 1 0 टोच. लट पण एटनिशिककिॅक१0?0१000101000000तनीनतानाचळयानामजक-काणडाळी “आम्मा
८१,» “कसायाच्या घरा ९३
९ //"५../ ४५७४४४७ ४” ४०४७ ./ ४७.५ 70%.” "२४४४ ४ %_/ %_ 7* ४१ % *,४ “०४ “७ */% /”% / १६... २ » १६ २ "२ क्य २_. ४.४ “९ /"५_)/४./९ /”*./५ २.”
ताबडतोब धजना. बोलण्याचें धर्य वेगळे आणि कृति करण्याकरितां लागणारे ध्य वेगळे, असें तर नसेल ना?
ह्याचा उपयोग भुजंगरावांनीं एवढाच करून घेतला कीं, साहेब देखील आपल्यावर खूष आहेत, असें ज्यांना त्यांना ते सांग लागले !
मगनशठच्या दुकानीं संध्याकाळीं भुजंगराव बसले असतां, त्यांच्या तोंडीं तोच विषय होता. तेथ त्यांना पोलिसांनीं दंगखोर लपून बसलेल्या खड्यावर घातलेला छापा फुकट गल्याचें कळलें. मगनशठनें बातमी दिल्या- प्रभाणे तेथ दंगेखोर लोक होते, हें खरें. पण पोलिस येण्यापूर्वी तास दोन तास अगोदर ते तेथन पसार झाले होते !
मगनशेठ त्यामुळे फार हळहळला. नाही तर भुजंगरावांप्रमाणें घरी बसल्या बसल्या अधिकार्यांची आपण पुष्कळ मर्जी संपादन केली असती, असें त्याला वाटत होतें ! त्याला तशी मर्जी संपादण्याची जरूरी पण अलीकडे वाटूं लागली होती !
युद्धाच्या सुरुवातीपासून त्याने चांदीचीं नाणी सांठविण्यास सुरुवात केली होती. त्याच्याजवळ तसे शेंकडों रुपय जमा झाले होते ! चांदी महाग होऊं लागली, तसा तो रुपये आटवन त्यांतील चांदी मुंबईस जाऊन विकतो, असा त्याच्यावर पोलिसांचा संशय होता.
पोलिस संरक्षणाकरितां येवोत किवा कह्याकरितां येवोत, त्यांची भीति कांहीं ना कांहीं कारणानें लोकांना वाटते खरी !
पोलिस व संन्यभरतीचे अधिकारी मोटारीने निघून गले होते. त्यामुळे राहिलेल्या पोलिसांना हायसें वाटलें! रात्रीं त्यांचा मुक्काम आबाच्या वाड्यांत होता. भुजंगरावांच्या संरक्षणाथंच ते तेथ राहिले होते ! दिवसभर झालेल्या श्रमामुळें त्यांना भूकही चांगली लागली होती. आणि आबांच्या घरीं त्यांना चांगला चमचमीत मांसाहारही मिळाला !
रात्रीं सर्वांना शांतपणे गाढ झोंप लागली.
गांवांत पोलिस पार्टी असल्यामुळें लोकांनाही निभंयता वाटत होती. वैशाख महिना संपत आला होता. त्या दिवशींच्या त्या काळोख्या रात्रीं मध्यान्हीनंतर एकदम सशस्त्र गुंडांनी -मगनशठच्या घरास वेढा दिला! आबांचा वाडा रोखून धरला ! नाक््यांच्या जागीं त्यांचाच पाहारा बसला !
९४ साखर गोटी
मगनशेठच्या घरांतील माणसांची तोंड बांधून त्यांना हुं कां चूं करू दिल नाही!
शेंकडों रोकड रुपये गुंडांनीं लांबविले. जीं नाणी त्यांना नंतां आलीं नाहीत, त्यांचा घरभर सडा झाला!
ग्ड ताबडतोब बिनधोक पसार झाले !
सकाळी पोलिसांच्या कानीं ही बातमी पडल्याबरोबर, इतके रोकड रुपये मगनशेठजवळ कसे आले, येथपासून चौकशीस सुरुवात झाली. पे्यापरी पेसा गला आणि भीक नको पण कुत्रा आवर, अशी स्थिति मगनशेठची झाली !
त्या टोळीत सावळ्या होता. दुपारी तो मळ्यांत कोठेतरी दडून होता. रात्रीं तो रखमा व आणि रंगी ह्यांना भेटला. अगा भुमका गांवभर' पसरल्या !
त्यामुळ रखमाच्या घरावर पोलिसांचा जास्त कडक पाहारा बसला.
रखमा आणि रंगी यांची स्थिति कंदेत असल्यासारखी झाली !
तीनचार दिवस भूुजंगरावांनीं आंबंगांव सोडलें नाहीं. त्यांना मगन- शेंठना रोकड सांठवून ठेवण्याच्या आरोपांतून सोडवावयाचें होतें !
पोलिसांचा घरादारांवर कडक पाहारा आणि सावळ्या संबंधीच्या. वेड्यावांकड्या अफवा, ह्या परिस्थितीचा रंगीच्या प्रकृतीवर अतिशय वाईट परिणाम झाला. तिला आपल्या घराचाच काय, पण आंबगांवाचार्ह कंटाळा आला ! तिटकारा पण वाटं लागला !
दोन तीन दिवसानंतर आजारी स्थितीत असलेल्या रंगीला गोरा- बाईनीं घरीं आणलें.
तिनें तोंडांत अन्नाचा घांस घातला कौ, तो मळमळून बाहेर पड. ओकून ओकून ती घाबरी होई.
तिला'गोराबाईंनीं स्वयंपाकघराला लागून असलेल्या खोलींत निजविलें
होतें.
रंगीचे खोल गेलेले डोळे आणि बसलेले गाल पाहून त्यांच्या पोटांत धस्स होई !
रंगीला औषध देऊन दुपारच्या जेवणाची तयारी गोराबाईनीं चाल- विली होती. त्या मनांत म्हणं लागंल्या,
कापा
क्ट > ऱ्ह पसा टटणीश पणा | णणटणणी
कसायाच्या घरीं ९५
“ काय ह्या पोरीची स्थिति झाली ! साखरगोटीसारखी गुटगुटीत पोर ही ! पण आज ती किती वाळून गेली ! कारभाऱर्यांना काय म्हणावं ! ज्याला ज आवडतं तें करूं द्यावं! सावळ्या हिला आवडला होता ; त्यांत काय' वाईट होतं ! --”
इतक्यांत रगीला पुन्हा ओकारी आली. मोठी ओकारी होती ती ! तीमुळे रंगी घामाघूम होऊन गेली. गौराबाईनीं तिचे डोकें गच्च दाबून धरलें होतें.
आज स्वयपाकांत त्याचें लक्ष लागना. कसा तरी स्वयंपाक घाई- घाईने त्यांनी उरकला होता !
भुजगराव आणि आबा जेवावयास बसले.
भात कच्चा राहिल्याची कुरकर आबा करीत होते. इतक्यांत त्यांनी आमटीचा भुरका मारला. आबांचें तोड खारटढोण झाले ! त्यांनी गोरा- बाईवर डोळे वटारले ! आणि दरडावून म्हटलें,
“ आज डोकं ठिकाणावर नाही काय तुमचं ! भुजंगराव काय म्हणतील असल्या स्वयंपाकाला ! ”
“ चालायचंच असं ! तसा कोणताही पदाथं कांहीं वाईट झाला नाही, म्हणा --
सहानुभ्तीच्या स्वरांत भुजंगराव म्हणाठे.
ह्यामुळे गौराबाईंना थोडा धीर आला आणि त्या भाजी वाढतांना पतीकडे नजर टाकून म्हणाल्या,
“ र॒गी ओकतेय भडाभडा ! तिला तापही भरलाय ! मला सुचेना कांहीं! ”
“ कार्टी गुणाचीच तशी ! तिनंच आमच्या अब्रूची धूळधाण उडविळी ! आबा तोंड वांकड करून म्हणाले.
“ अब्रूचा यांत काय सबध आबासाहेब ? '' भुजंगराव शांतपणे बोलं लागले. “ झाला खरा सारा पोरखळ ! हयाच्यासाठीं इतकं कांहीं वाईट वाटून घ्यायला नको आपण--'
इतक्यांत रंगी 'आईग, आईग,' असें विवळली. तिला चक्कर आल्या- सारखे झालें. “ काक! काक! *“ अशा ती हांका मारू लागली.
गोराबाईनीं हात धुतले आणि त्या रंगीकडे धांवत गेल्या.
कन्ानटटटापपपपाण पशा पना सप्त - >. ८० णन नाच क ज्याम
$$ साखर गोटी
इकडे दोघांनीं आपलें जेवण आटोपतें घेतलें. त्यांनीं हात धुतले आणि रंगीच्या खोलींत ते दोघे डोकावन पाहूं लागले.
रंगी भडभड ओकली. नंतर स्वस्थपणे खाटेवर पडली. थोड्या वेळानें तिचे डोकें किचितरसे उतरले. तेव्हां गौराबाई वाकन तिच्याकडे नजर टाकीत तिला थोपटीत होत्या.
रगीरने डोळे उघडले आणि ती हळुहळू बोलू लागली.
“काकू, आतां ह्या गांवांत राहाणं नको मला ! कुठं तरी जाऊं या ग! --
त्या वेळीं आबा खोलींत आळे आणि म्हणाले,
“* पाठवीन कुठं तरी चांगल्या हवेच्या ठिकाणी तुम्हांला ! रंग, डोळे मिटून पड ! तुला बरं वाट् लागेल ! --" |
आबांच्या सहानुभूतीच्या बोलण्याने गोराबाइंच्या डोक्यांत एक कल्पना आली. तिचें माहेर पानगांवीं होते. बर्याच दिवसांत त्याही माहेरीं गेल्या नव्हत्या. पानगांवची उन्हाळ्यांतील हवा थंड म्हणून प्रसिद्ध होती. तिकडे रंगीला घेऊन गेल्यास माहेर व हवापालट ह्या दोन्हीही गोष्टी साधतोल, असें त्यांना वाटलें.
पुढे दोन तीन दिवस रंगी आबांच्याच घरीं होती. तेथ पोलिसांचा त्रास नव्हता. भुजंगराव पानगांवीं जाऊन मनासारखी कांहीं व्यवस्था करून आले होते.
"या मुदतीत आबांनी पण एक निश्चय पक्का ठरविला होता. ते भजंगरावांची वाटच पाहात होते ! भुजंगरावांनीं आल्याबरोबर रंगीच्या प्रकतीची चोकशी केली. तिची प्रकृति सुधारत असल्याचें ऐकन त्यांचा चेहरा जरा खुलला !
रात्रीची जेवण आटोपल्यावर भूजंगराव व आबा खोलींत एका महत्त्वाच्या गोष्टीचा खल करीत बसले होते.
त्या वेळीं भुजंगराव म्हणाले--
“ सावळ्याला पकडण्यात आले, म्हणज आपला मार्ग सुलभ होईल आबासाहेब ! मग मी लोकापवादाला भीत नाहीं. रंगी शुद्ध आहे, हें मी जाणतो -- '
कर्य्णाप:?पी”0श पका कथणणण ण 0ी0ी?0?0?२?0ीेलीली शणाणाणा *णणशीणीपीी0ी?णी?0ी”णी?0ी 00 ० णश वणणाणीप पीपीपी ब्टणपिणणी शॉरंििणीणपीणी शी ैऐ?0?१0?0ार्थिपिणिप२?णशीशी "५. 0 णक पण पण?ण?णीणीटटटकक्णणाणपणणणण?ण८0?0ण टपाल
कसायाच्या घरी | ९७
“ आतां वशाखाचा महिना संपून ज्येष्ठ सुरू झाला, घाई केली पाहिजे आपल्याला ! --
आबा भुजंगरावाकडे उत्सुकतेनें पाहात म्हणाले.
“ पण आबासाहेब, अशी घाई कश्यी चालेल ? कोणी कोटंदरबार केला तर ?--
भुजंगराव गंभीरपणं बोलले.
“ पुरावा भक्कम कीं निकाल आपला ! जन्मभर मी हेंच करीत आलों कीं ! पेसा ओतला कीं, पुरावा तयार! --"
“ पुरावाही तसाच खंबीर पाहिज --”' भुजंगराव म्हणाले.
__ “ त्याची नको तुम्हांला काळजी ! आपला गुंडभट इकडची पृथ्वी तिकडे करील !
गंडभटाला त्या रात्री गड्याने बोलावून आणल. तो भीतभोतच आला होता !
त्याने आल्यावर आपले दोन्ही हात जोडले आणि म्हणाला--
“ कां बोलावलं यजमानांनी ? भूजंगरावही आहेत ! कांहीं हव्यकव्य आहे वाटतं ?--
गुंडभटाला त्यांनीं आपला हेतु हळुहळू सांगितला. त्यानें भीति वाटत असल्याचें थोड ढोंग केले. आबांनी त्याच्या हाताचा आंगठा दाबल्याबरोबर गडभट खुश्टींत येऊन म्हणाला--
“* करूनका काळजी कशाची आबासाहेब ! तुमच्याकरितां मी पाहिजे तें करीन. मी विश्वामित्र गोत्राचा ब्राह्माण आहे! आम्ही मूळचे
' पराक्रमी आहोंत ! कितीदां तरी क्षत्रियांचा नि:पात केला विश््वार्मित्रांनीं ! त्याला कशाची भीति?
“गुरुजी ”' भुजंगराव म्हणाले “ येथ तोडायचं नाहीं, जोडायचं आहे ! तोडण्याची भाषा बोलं नका भटजी ! दक्षणा काय ! आबा देतील त्याच्या दुप्पट आमची ! --'
गुंडभटाला अतिदय आनंद झाला. पण भुजंगरावाचा गरसमज झाला असेल, तो दुर व्हावा म्हणून त्यांनीं तोंड वाईट केले आणि दोन्ही तोंडांत मारून घेऊन ते म्हणाले--
९ साखर गोटी
“ अब्रह्मण्यम् ! अब्रह्मण्यम् ! चुकलों थोडासा ! कुळाचा अभिमान उसळला आमचा ! क्षमा करा ! पण तुमचं काम फत्ते करून देण्याची हमी माझी--”
आबांचा आंगठा शंभराचा आणि त्याच्या दुप्पट भुजंगरावाचे त्यांना मिळणार होते. मग त्यांना आनंद कां होणार नाहीं !
भटजी आनंदांत निघून गळे. भटजी गेल्यावर आबा आणि भुजंगराव खो खो हंस् लागले.
ज्र .... 9
सकाळी चहाच्या वेळीं ते दोघे स्वयंपाक घरांतच आले. आबांनी रंगीला उठवून आपल्याजवळ बसवून घेतलें. तिच्या पाठीवरून हात फिरवून “ किती वाळली ही ! ” असें म्हटले.
यजमान खुषोंत आहेत असे पाहून गौराबाई हळूच म्हणाल्या --
“ रंगीला हवापालट करण्याकरितां माहेरी नेऊं कां मी ? तिथं तिला चांगलं बरं वाटेल ! --
“बा! छान! किती तरी दिवस तुम्हीही माहेरीं गेला नाही. रंगीला घेऊन जा कौं ! --'
“ आमच्या नदीकांठच्या बंगल्यांतच राहा ना, कांहीं दिवस तुम्ही ! मोठे मोठे साहेब तेथे येतात हवा पालटायला ! तिथं आठ पंधरा दिवसांत कोणीही बरं होतं ! --'
रगीला भुजगरावाचा तो उदारपणा वाटला. तिनें त्यांच्याकड पाहिलें. तिला त्याचें ठिकाणी बंधुत्व दिस लागलें !
भुजगरावांना पण समाधान वाटलें.
रखमाला घरचो सारो माहिती देऊन त्याच दिवशीं दुपारी गौराबाई रगीला घेऊन मोटारीतून पानगांवला निघाल्या.
रखमाला मात्र सारखी हुरहुर वाटूं लागली. तिचे डोळे भरून आले मोटार दिसेनासी होईपर्यंत ती तिकडे पाहात होती !
तिच्या मनांत एक दृष्ट विचार आला--
“ कसायाच्या घरीं तर गाय जातनाहींना?''
काळजीच नक श्र
क्र
पुलगाव आणि आंबंगांव हीं दोन्ही गांवें तऱ्हेगाव तालक्यांतीलच होत. आंबेगांवापासून पानगांव सुमारें सोळा सतरा मेल अंतरावर आहे आणि ह्या दोन्ही गांवांपासून तर््हेगांव चांगलें वीस पंचवीस मेल लांब आहे. | तर््हेगांव हा उत्तरेच्या बाजूचा त्रिकोणाचा शिरोबिदु म्हटला, तर् पानगांव आणि आंबिगांव हीं त्या त्रिकोणाच्या पायाचीं टोके होत. अशी त्या गांवांची रचना आहे खरी ! पानगांव आणि आंबेगांव हीं गांवें सहयाद्रीच्या एका ओळीनें जोडलेली असून तर्हेगांवाहन पानगांवास जातांना सोळा सतरा मेलांवर एक खिड आहे. त्या खिडींत नेहमीं चोरट्यांची भीति असते. आंबंगांवाहून पानगांवास मोटारीनें जावयाचें झाल्यासही ह्या खिडी- तीलच सडकेनें जावें लागतें. त्याशिवाय दुसरा सडकेचा मार्ग नाही. पायवाटा वाटल तितक्या आहेत. त्या खिडींतून गौराबाई, रंगी वगेरे मंडळींची मोटार चालली असतां खिडींतील झरीचें पाणी घेण्याकरितां तेथे काही वेळ ती थांबली. भुजंगराव बरोबर होतेच. ते गौराबाईना तेथन दिसणारा सुदर देखावा दाखवीत होते. रंगीलाही तो भाग पाहून एकदम कसली तरी गोड आठवण झाली. तर्हेगांवाहन मन्या आपल्याला ह्याच खिडींत घेऊन आलेला होता. साव- ळ्याची भेट येथंच झाली होती. तो आनंदाचा क्षण आठवून तिच्या मुखावर किचितशी लाली चढली !
१०० साखर गोटी
*.८ ४०४". ४.५ ४. ४.५ १.५४ ५.४५” ४-€ ५.५४ ४.५४... ३.५५” ४.” ४ /१४%./ ७. १_.५ ९” ९ ४९./४ ५.९. ७.५९ ५.५ २५४१४५» “१ ४२.५१ /१%/२./ ७-५ ५.५४. % .५ %.. ४.२ ५ .४9५.//%.” ७ /१७ ४ /७ /0 »%.
त्याच वेळीं भुजंगरावांची नजर तिच्याकड गली. तिच्या चेहऱ्यावरील टवटवी निरखून ते म्हणाले--
“ हया खिडींतल्या हवेनं कोणालाही आनंद वाटतो. आमच्या पान- गांवच्या बंगल्यांत तर हयापेक्षां मजा आहे ! --
त्यांनीं दूर अंतरावर दिसणारें पानगांव बोटानें दाखविलें.
त्या खिडींतून दिसणारा पानगांवचा देखावा मोठा रमणीय होता. ह्या गांवाच्या दक्षिण आणि पश्चिम बाजूस वक्षाच्छादित डोंगर असून पूवस आणि उत्तरेस उतरतें मंदान पसरले होतें.
ह्या डोंगराच्या उतरणीवर पानगांव होतें. आणि त्या गांवापासून सुमारे एक मेल अंतरावर नागमोडी नदीच्या कांठी भजंगरावांची गढी व बंगला होता.
मोटार गढीकडे जाऊं लागली, तसे दोन्ही बाजूचे नवे नवे पानमळं दिस्ं लागले. छोट्या नागमोडी नदीला ठिकठिकाणीं अडवून त्या धरणाच्या पाण्यावर हे मळे, केळीच्या बागा आणि फुलबागा ह्यांनी ही भमि तारुण्यांत नुकतेंच पाऊल टाकलेल्या मुग्ध बालिकेप्रमाणे मोठी मोहक दिसत होती !
मोटार गढीजवळ आली, तेव्हांपासून दिसणाऱ्या शोभत अधिकच भर पडली. भुजंगरावांच्या वडिलांनी पुण्याहून रोपं आणवून मुद्दाम लाविलेल्या ' परू, संत्री, मुसंबीं ह्यांच्या बागा आतां भर तारुण्यांत आल्या होत्या. मुसंब्यांचीं झाडे त्यांच्यावरील फलांच्या भारांनीं वांकन गेलीं होतीं.
गढीच्या जवळून वाहाणारी नागमोडी नदी मात्र खंगून गल्याप्रमाण अगदीच मंदमंद वाहात होती ! रंगीप्रमाणे तिच्याही अंतःकरणांत कडक उन्हाळयाची काळजी गिरल्यामुळे तिची अज्ञी स्थिति तर झाली नसेल ना?
गढीच्या सभोंवतीं जुनी तटबंदी होती. आंत एक जुना वाडा होताच. पण भुजंगरावांनीं तेथे नवीन तऱ्हेची एक बंगळी पण मोकळ्या जागेत बांधली होती.
त्या बंगलींत शिकारीकरितां आलेल्या युरोपियन पाहुण्यांचे मुक्काम पडत. कोंग्रेस मंत्रिमंडळाच्या कारकीर्दीत याच गढीत त्यांच्या एकदोन
अ न्य नन क“. - क पपभानाकापी कक हपलाणणणणी पीटी क क विशिशब
काळजीच नको ९०९
बेठकी झाल्या होत्या. त्या वेळीं मंत्र्यांनी तेथ भुजंगरावांचा पाहुणचारही यथेच्छ घेतलेला होता.
सत्ताधाऱयांचा सन्मान करून राजमान्यता संपादन करण्याचा जो सांप्रदाय आपल्याकडे आहे, त्यांतीलच भुजंगराव हे एक होते ! कोणत्याही राजवटींत असे लोक सत्ताधाऱ्यांच्या आवडीचे होतातच !
तेथें सुंदरशी फुलबागही होती. तीतील चोथर्यावर गौराबाई आणि रंगी विश्रांतीकरितां जाऊन बसल्या. गौराबाडंच्या माहेरची मंडळीही तेथे आलीं होती. गडी माणसांची तर तेथं रेलचेल होती. तोंडांतून शब्द काढ- ण्याचा अवकाश कीं, पाहिज तें पुढे हजर !
अश्या वैभवसंपन्न ठिकाणानें गौराबाई तर अगदी दिपून गल्या. पण रंगीला भजंगरावांच्या हया श्रीमंतीचे कोतुक वाटत नव्हतें! तिला तिची आंबराई ह्यापेक्षा किती तरी श्रेष्ठ वाटत होती !
गाईचें दूध, उत्कृष्ट फळे, सुदर हवा आणि लाभलेले कांहीसे मानसिक स्वास्थ्य ह्यामुळें रंगीची प्रकृति तेथे जलद सुधारू लागली ! आठ पधरा दिवसांत तिच्या मुखावर चांगलीच टवटवी दिसू लागली !
त्यामुळें गौराबाईनाही समाधान वाटले.
आबा पानगांवी येऊन गले. त्यांनाही रंगीला आनंदी पाहून बरें वाटलें.
रंगीला तेथ समाधान वाटण्याचे एक विशेष कारणही होतें. भुजंग- रावांच्या गांवच्या वाड्याच्या देखरेखीवर मन्या असे. तो केव्हां केव्हां गढींत येऊन रंगीला भेटे. त्यामुळे सावळ्याच्या खुशालीची हकीकत तिला वरचेवर कळे.
एक दिवस नागमोडी नदीच्या कांठीं सायंकाळच्या वेळीं सावळ्याची आणि रंगीची भेटही पण मन्यानें करून दिली होती !
त्या दिवशीच पानगांवच्या खिंडींत या' टोळीची गुप्त बेठक होती. म्हणून मन्या आणि सावळ्या यांना तांतडीनें तिकड जावें लागलें होतें.
त्या बेठकींत मन्यानें सुचविले,
“ गढीवर हल्ला करून रंगीला तेथन पळवून न्यावें --”
-१०२ साखर गोटी
*४-५५५-४/४४५५/४/४/४”
“१५४५-५८-४४ ४४१
“ पण असें केल्यानें आपणच घोटाळ्यांत पडू. स्त्रियांच्या पाशानेंच आतांपर्यंत आपल्यासारखे लोक सांपडले आहेत--
खाझानें आपलें मत दिले.
सावळ्यालाही तें पटले. त्याला तो व्यक्तिगत स्वार्थ वाटला. त्यानें मनाशीं विचार केला--" रंगी कांहीं कसल्याही मोहाला बळी पडणार नाही, ही आपली खात्री आहे. आजची घटका आज चाललीय खरी ! पुढं काय होईल तें होईल !
त्या टोळीतील लोकांपृढ निश्चित असा पुढचा मार्ग कोणताही नव्हता ! कांहीं तरी अघटित करावयाचें, अशा प्रवत्तीच हे तरुण कांही तरीच' करीत होते एवढ खरें !
त्या बेठकीत गढीवर हल्ला करण्याचे ठरलें तर नाहीच, पण भुजंग- रावांच्या गांवांतील वाड्यावर हल्ला करण्याच्या बाबतीतही मतभेद झाला ! टोळीचा नायक मन्याच म्हणूं लागला---
“मी त्याचं अन्न खातोय ! रामोशी लोक ज्याचं अन्न खाल्ल त्याच्या घरावरच धाड घालीत नाहीत--
शेवटी सर्वांच्या विचारानें एक तडजोड निघाली. मन्यानें त्या दिवशीं हल्ल्याच्या वेळी तेथे असू नथ. कोठे तरी संस्थानच्या हहींत जावे. नंतर तिकडच सगळ्यांनी जमावे ही ती तडजोड होय.
रात्री भुजंगरावांच्या पानगांवांतील वाड्यावरच गडांचा भयंकर हल्ला झाला ! त्या दिवशीं भुजंगरावांच्या परवानगीनेंच मन्या परगांवी गेला होता ! त्याच्या मदतीच्या अभावामुळे भुजंगराव निराश झाले ! गांवांतील लोक भीतीमुळे काम्हणाना, त्यांच्या मदतीस आले नाहींत !
वास्तविक त्या गांवांत भुजंगराव लोकप्रिय नव्हतेच मुळी. लोकांना पिळून आपली तुंबडी भरणारे असा त्यांचा तेथे लोकिक होता. मग अशा गृहस्थाच्या संकटकालीं लोक आपले जीव धोक्यांत घालतील कश्याला ?
भुजंगरावांजवळील नोटांचीं पुडकीं चोरांनीं लांबविलीं. रोकड पळ- विळी. लोकांनीं लिहून दिलेल्या प्रॉमिसरी नोटा जाळण्यांत आल्या.
भजंगरावांच्या तोंडाला गच्च काळे फडकें बांधून त्यांना बळकट डांबून .ठेविलें होतें. त्यामुळे त्यांना ते लोक ओळखतां येणे शक्य नव्हतें! पण
'काळजीच नको १०३
4४४१४”५५४- ४४४४-४० ४४४४४४४ ४74१ “४/४/१”४/४-
त्यांत सावळ्या, बजा आणि खाशा हे असले पाहिजत, हें त्यांच्या कानीं पडणार्या तुटक तुटक शब्दांच्या आवाजावरून त्यांनीं निश्चित ताडले !
मन्याला परगांवीं पाठविल्याचा पश्चात्ताप भजंगरावांना त्या वेळी फार झाला.
मात्र गढीवर लोकांनीं हल्ला केला नाही, ह्यामुळे त्यांना पुष्कळसें बरं वाटलें. सोन्याचांदीचा सांठा गुप्तपणे त्यांनीं गढीतच पुरून ठेविला होता. आणि बहुमोल रत्नांनाही लाजविणारें रंगीसारखे रत्न पण त्या गढीतच होतें !
भुजंगरावांच्या वाड्यावरील हल्ल्यांत सावळ्या असला पाहिज, हें . रंगीनेंही ताडलें होतें. आतां तर भुजंगरावही राजरोसपण तेंच म्हणं लागले. 'त्यांनीं पानगांवास पोलिसचा बंदोबस्त चांगलाच करून घेतला. सावळ्या गढीवर हल्ला करण्यास चुकणार नाही, अशी अधिकाऱ्यांची त्यांनी खात्री करून दिली. त्यामुळे गढीच्या रक्षणार्थ सशस्त्र पोलिस येऊन राहिले !
रंगीचे सुमारे पंधरावीस दिवस तेथ कांहीसे आनंदांत गले होते. तिची प्रकृतिही पुष्कळ सुधारली होती, पण पुन्हां पोलिसांचा त्रास व सावळ्याची काळजी ह्यामुळें तिला सुखाचा घासही गोड लागना !
मन्या अद्यापि आला नव्हता. पोलिसांचा त्याच्याविषयीचा संशय -दृढ झाला होता. भूजंगरावांना मात्र तर्से वाटत नव्हतें.
ह्या गुंडांनीं साऱ्या तालुक्यांत गळे दहाबारा दिवस फारच गोंधळ माजविला होता, त्यामुळें श्रीमंताची तर पांचावर धारण बसली होती ! म्हणून आतां पोलिसांचा बंदोबस्त प्रत्येक गांवी अगदी कडक चालू झाला !
मन्याला प्रथम पकडले, म्हणजे त्याच्या हाताखालच्या टोळीस पकडण सोपे जाईल, असा पोलिसांचा विचार ठरला; आणि त्याच्या पाळतीवर गुप्त पोलिस राहिले.
पोलिसांप्रमाणेंच का म्हणाना, मन्याच्या पाठीमाग एकसारख आणखी एक माणूस होतें. पण तें त्यास पकडण्याकरितां नव्हतें. त्यास सन्मार्गावर आणण्याकरितां होतें !
त्याची बायको सखी बहुतेक मन्याच्या मागे मागे असे. दारूच्या गृत्त्यांमध्यें ती नेहमीं त्याचा तपास करी !
भूजंगरावांच्या वाड्यावरील हल्ला मन्यानें करविला, त्याला आतां
१०४ साखर गोष्टी
पकडणार, अशी बोलवा तिच्या कानी पडल्याबरोबर ती त्याच्य़ा तपासास' आंबंगांव सोडून बाहेर पडली.
रंगीला सावळ्याकडून कांहीं निरोप कळण्याचा संभव आहे, असें वाटल्यामुळे ती एके दिवशीं रंगीकडे आली.
पण तशी कांहीं माहिती रंगीला नव्हती.
तेव्हां सवीनेंच मन्याच्या शोधाकरितां कशी खटपट केली, हें रंगीला बंगलीपुढील बागेत एका बाजूस बसून हळुहळ सांगितलें.
ती म्हणाली--
“मी पानगांवला दोन चार दिवसांपूर्वी आले होतें. मला मन्या संस्थानच्या हद्दीतील सोमगांवीं गेल्याचें कळलें. मी पण तुलाही न भेटतां तडक तिकडे गेलें. अगदीं सकाळीं मी तेथ पोहोंचलें. दारूच्या व्यसनामुळ त्याचा तपास गृत्त्यांत लागावयाचा, म्हणून मी तेथल्या ग॒त्त्यांत तपास करण्यास गेलें. पण तेथे संस्थानी पोलिस मन्याच्याच तपासास आले होते ! तेव्हां माझी कंबरच खचली मुळीं ! --'
“ मग मन्याचा पत्ता त्यांना लागला का? सावळ्य़ाही त्याच्या- बरोबरच असेल कीं ! --” |
रगी माहिती काढण्याच्या दृष्टीनें घाबरेपणानें बोलली.
“ सावळ्या त्यांच्याबरोबर असतो, हें खरं. पण तो कांहीं मन्या- सारखा दारू पीत नाहीं! म्हणून तो सांपडायचा नाहीं ! --”
सखीने निश्चयपूर्वक सांगितलें.
“मग, मन्या सांपडेल म्हणतेस ? लुच्चा आहे तो! तो कसचा सांपडतो ! कोणाच्याही हातावर तुरी देऊन तेव्हांच निघून जाईल ! रखमा मामींना ठाऊक आहेत त्याचे गुण--"
रंगोही निश्चितपणे म्हणाली.
“ पण तो दारूच्या निशंत नसेल तर ? सोमगांवीं तो सांपडण्याच्या बेतांत होता, रंगे ! --”
सवी काळजीच्या स्वरांत बोलली.
“तें कसं काय बाई ! --” रंगीनें उत्सुकतेने विचारले.
त्यानंतर सत्तीने तिला सविस्तर हकीकत सांगितली. ती म्हणाली-<
नाज त कककयाावायाडाी
न पद -लााटापशापा पप? फली 0?" २0ा?0पी?0)"0" प? २? २ नापपापपपपकप-----५---॥-----------------4-------2:- - व णा प क अडवत यी
काळजीच नको १०५
कयी ४९४४५४१४५४ १४४४स र ४४४८४-/५५-४४५५४/४/१ “५५४४१४ “५१८ “१८४५ ४५४४४१५४४४” -0४- ४४५४४५४४४४ ४” ४४४” ४५५१४५४५४४
रात्रीं गत्त्यांत त्यानं दारू ढोसली. ती फारच ढोसली ! गत्तवाल्याच्या अंगावर त्यानं दहा रुपय,च्या नोटीबरोबर आणखी एक पांचश रुपयांची नोट फेकली !
मन्याच्या टोळीला पकडण्याकरिता संस्थाननेंही बक्षिस लावलं होतें. पांचशे रुपयांच्या नोटीने मन्या हा एक दगखोरांपेकी असेल, असा त्या गृत्तेवाल्यास संशय आला. तो सरळ संस्थानच्या पोलिसाकडे गेला आणि त्यानें त्यांना ही बातमी दिली.
पण त्याच्यापूर्वी च मन्या कोठे तरी निघून गेला होता म्हणून तो सांपडला नाहीं. अस्तुरी आणि दारू ह्यामुळेच आमचे रामोशी सांपडतात रंग!
तं देखील सावळ्याला आपत्याकड फारसा येऊं देऊं नकोस, नाही तर, तोही सांपडल. इथं पोलिस त्याकरितांच ट्पून बसळे आहेत.
सखीची माहिती संपली. दोघीही थोडा वेळ स्तब्ध होत्या; त्या वेळीं रंगी मनांत म्हणू लागळी--
“ आपल्यामुळे सावळ्या पकडला जाण्याचा संभव आहे, हें सखीचं म्हणणं खरं आहे. कुठं कां असेना, सावळ्या खु शाल, असलां म्हणजे झालें ! "
नंतर सावळ्याची आणखी माहिती समजावी म्हणून तिनें सखीला विचारलें--
“ आतां सावळया, तुझा मन्या हे गले आहेत तरी कोठ ? तुला कांहीं माहिती आहे का ?'
सक्षी हंसत हंसत ग्हणाली--
“मला ग कसं कळणार ? आम्हांला माहिती समजली, तर ती गांवभर होण्याला वेळ लागत नाहीं. म्हणून मन्या तर मला चकार शब्द सांगत नाहीं! मी पण त्याची पर्वा करीत नाही. त्यानं दारू सोडली, कों त्याच्यासारखा माणस नाहीं रंग !
सखीचें नवर्यावरील प्रम किती वरच्या दर्जाचे आहे, हें रंगीला कळन आलें. तिलाही धडा घेण्यासारखं त्यांत होतें. फक्त काळजी राहूं नये, म्हणून तिनें सखीला आणखी विचारलेंच.--
१०६ साखर गोटी
'* पण आता मन्यानं काय ठरविळं आहे? तुळा कळलं असेल तें सांग की ग! तुझ्या गळ्याजपथ मी कोणाशी बोलणार नाही ते--
“रग, तें मी तुलासांगतेच, म्हणज तुझी काळजी पण कमी होईल--”
“* सांग बाई, सांग लवकर--'
रंगी उतावीळपणानें म्हणाळी
सखी सांगू हागळी--
“मन्या भुजंगरावांजवळ होता, तेव्हां त्याला गुप्त बातमी कळत होती. ती तो आपल्या ळोकांस कळवीत असे ! त्यामुळे सारे लोक तेव्हांच सावध होत असत । आतां पोलिस त्याला पकडणार आहेत. चोहोंकडे कडेकोट बंदोबस्त फार आहे. म्हणून त्यांनी आतां लहान लहान टोळ्या केल्या आणि ते लोक फार दूर दूर गेळे आहेत । ...''
'" आणि रगं आणखी सांगूच का, सांगते बघ.--'' सखी पूढे बोलं लागळी--
“मन्या, खाशा आणि सावळ्या ह्यांची एक टोळी फार. दूर कोठेतरी गली आहे! ती सांपडावयाची नाही मुळीं! तुला त्याची काळजीच नको.
दोन नव 2३8
व क
खुतीचें माहेर आंबेगांवी असल्यामुळे तिला सावळ्या आणि रंगी
ह्यांची लहानपणापासून माहिती होती. सावळ्याविषयीं तिला
कमालीचा आदर वाटे; आणि रंगी तर सार्यांचीच आवडती होती. हया
उभयतांवर कस॑लेंही संकट येऊ नये, असे तिला वाट. म्हणूनच ती रंगीला गढीमध्ये भटली.
परत जातांना सहाजिकच तिनें गौराबाईंची विचारपूस केली. त्याही सवीज्ली अगदीं मनमोकळंपणानें बोलल्या--
““रंगीच्या प्रकृतीकरिता आपण पानगांवी आलो, हा आपला शाहाणपणा झाला. रंगीची प्रकृति चांगली सुधारत आहे. पावसाळा सुरू झाला कीं, आपण परत आंबंगावास जाऊ.
त्यांचें सारें लक्ष आंबेगांवीं आपल्या घराकड लागलं होतें! त्या मनांत म्हणत होत्या--
“* रखमा यजमानांना कांहीं कमी पडूं देणार नाही, हें खरे, पण आपल्या- पेक्षां यजमानांचें लक्ष तिच्यावर जास्त आहे. रग्वमा तशी खंबीर मनाची आह. पण त्याचा काय नियम सांगावा, कोणाचें मन केव्हां कसें बढललतें !
पण असें कांहीं उघड दिसूं न देतां त्यांनी सवीजवळ रखमाला सांगण्या- करितां पुढील निरोप सांगितला--
“गड्याला दोन वाट्या दिल्या आहेत, त्या मागून घ्या, भितीवर लावलेल्या गोवऱ्या घरांत रचून ठेवण्यास गड्याला लावा. ताकावर निघ- णाऱ्या लोण्याचें तूप करून मगनशेठकड पाठवा. आणि यंतील ते पसे .- खिडकींत डबी आहे तिच्यांत ठवा....
१०८ साखर गोटी
८*८-४ ४-४ ९.» ९.५४.» १” ४.५४ ५ /%./% ४7७...” “५. १.५४ /%.५१%५ ५४७ ७ /४५ ५.५४ /९_//४७ /७ /४%./ ४.४७.” ७.५७ ४४/४४/४४४९ / ७.” ४.५४) /४९ ./ ४.४.” ७.” ७ _/” ४.५९. _/॥%_./९ ४” 0_/”१,
२५... के...» ७४
सखीला आणि रंगीला देखील ह्या निरोपाचे मनांत हंस् आलें!
आंबेगांवला आल्याबरोबर सखीनें पानगांवची सारी हकीकत रखमाला सांगितली. तिलाही थोड बरें वाटले.
रगी पानगांवला गल्यापासून रखमाला करमत नसे. पण कामाच्या रगाड्यांतून तिला मुळी उसतच मिळत नसे. घरची आणि शतची कामे करतां करतां तिच्या नाकीं नऊ येत. ती खंबीर मनाची आणि बळकट शरि- राची बायको असल्यामुळे सवं काम जिवापाड श्रम घेऊन चोख उरकी !
पावसाळा सुरू झाला, तरी रंगी यण्याचें चिन्ह दिसेना.
शताच्या पेरणीचीं काम सुरू झालीं. सदोबा निरलसपणे शेतकाम करण्यांत पटाईत असत. रखमाही त्यांच्या तोडीस तोडच होती !
आबा मधून मधून परगांवीं जाऊन येत. परंतु अलीकडे ते घरांतच बरेच रेंगाळू लागले होते. आपली प्रकृतिच बरोबर नाही, अशी त्यांची कुरकर होती !
रगीला आणि गोराबाईंना लवकर घरीं आणा, अशी रखमानें आबांच्या मागग किती तरी निकड लावली, पण तेथें पोरीची प्रकृति सुधारत आहे; नाहीं तर पोरोचें दुखणे क्षयावर गेलें असतें; भजंगरावांनीं उत्तम डॉक्टरांचे ओऔषध सुरू केले आहे; असें ते नहमीं रखमाला सांगत असत !
काय' असेल तें असो, आबांचींही काम करण्यांत रखमीला आनंद वाटत असे, हें खरें ! त्यांच्या घाऱ्या डोळयाची दृष्टि तिच्याकडे गली कीं, दोषही तोंडांतल्या तोंडांत हंसत.
त्यांच्या अंत:करणांतील जुन्या सुप्त भावना जागृत होत असाव्या कीं काय, असें त्यामुळें वाट !
आणि खरोखर आबांचे जूनें प्रम जागृत होऊं लागल्याची चिन्हें पण दिसूं लागलों होतीं !
रखमाच्या मनांत मात्र नवीन असा फरक नव्हता. सध्यां तिची जी मन:स्थिति होती, ती नेहमींचीच होती.
पण आबांच्या मनांत कांहीं तरी त्याच्यापुढे नवें वारे खळत आहे, हें रखमाच्या लक्षांत आल्याशिवाय राहिले नाहीं.
न. -> >... पल ०.
का य ला -दोन नवरे १०९
५-4.“ न्हय. -४-८४-<६- ५-0--४-/९--५-८४--८--*--<..४-/१५-५/५-/१५-८५-->/४८५० 0-८
योग्य समय आल्याशिवाय आपणहन कांहीं करावयाचें नाहीं, असें तिनें आपल्या मनाशीं ठरविलें.
दुष्ट लोक तिच्या संबंधानें कुजबजूही लागले होते !
ज्र ज्र ...
तो श्रावण मासांतील नागपंचमीचा दिवस होता. तो मुख्यत: स्त्रियांचा सण असल्यामुळें रखमानें नीटनेटका पोशाक केला होता. त्यामुळ तिचें तारुण्य खुलले होतें.
त्या दिवशीं दिवसभर रखमाकडं आबा सारखे निरखून पाहात होते. तिला पण आजचें आबांचें चिन्ह ठीक दिसत नव्हतें. सदोबा मळ्यांत होते. आबांना रात्रीचे जवण लवकर वाढून ती आपल्या घरीं झोंपण्यास जाणार होती. पण आबांनीं कांहीं ना कांहीं कारणानें जेवणास येण्यास उशीरच "लावला !
जेवण चाललें असतां आबा रखमाकडे टक लावून पाहात होतेच. त्यांच्या डोळ्यांत त्या वेळीं मादकता भरली होती ! रखमाही वात्रटपणा करण्याच्या हेतूनें मुद्यामच हंसली !
त्यामुळे आबांना जोर चढला व ते म्हणाले,
“ पांडवांची गोष्ट तुला माहीत आहे का ग, रखमा ?--'
'““हो तर! मला सारं माहीत आहे! '' रखमानें मान वेळावून उत्तर दिलें.
“ द्रोपदीला किती नवरे होते, सांग कों ! --
आबांनीं तिच्याकड तिरपी नजर लावून तिला विचारलें.
।“: पांच पांडव होते--
तिनें सहजपणे म्हटलें. त्यानंतर आबा जरा घ्टमळले. ते खालीं पाहून जेवं लागले
त्या रात्रीं पावसाची झिमझिम एकसारखी चाल होती. हवा पण कुंद होती. रानांत व रस्त्यांत फारच चिखल झाला होता. काम लवकर आटोपून रखमाला आपलें घर गांठावयाचें होतें.
थोड्या वेळानें आबांनीं वर मान केली व ते हंसळे. आपल्या घाऱ्या डोळ्यांची टक त्यांनीं एकसारखी तिच्याकडे लाविली.
११० साखर गोटी
रखमाला आतां कांही तरी बोलून आबांना धडा द्यावा असे वाटले.
ती म्हणाली--
“ आज तुमच्या डोक्यांत काय आलं आहे, समजत नाही मला ! काहीं वेडेचार तर नाहीत ना? ---”'
“तस काहीं नाहीं! तसं कांही नाही! मी म्हणणार होतों द्रौप- दोला पांच नवरे होते, मग एकादीला दुसरा नवरा असला तर काय होईल ?-'
आबाच्या बोलण्याचा अथ उघड उघड होता. त्यांच्या मनांत असलें पाप आलें, त्यामुळे तिच्या अंगाचा तिळपापड होऊन गला ! तिची वत्ति बेफाट होती ! तिचा संताप तिला आवरत नसे ! त्यांच्या पापी वत्तीचा तिला अत्यंत तिटकारा आला. ह्या गृहस्थाला असल्या दुष्ट विचाराबद्दल चागलेंच प्रायश्चित्त द्यावे, असे तिनें मनाशी ठरविले.
आबा हात धुण्यास मोरीवर चालले. त्या वेळी तिनें चुलीतलें जळतें लांकूड बाहेर ओढले. आबा हात धत होते, इतक्यांत ती जलदीनें तें लांकूड घेऊन त्यांच्या माग गली !
तिनें त्या जळत्या लांकडाचा घाव आबांच्या डोक्यांत एकदम हाणला ! आबांच्या डोक्याला खोक पडली. ते तिरीमिरी यंऊन खाली पडले !' तशाही स्थितीत रखमा म्हणाळी--
“ दोन नवरे! हा बघ तिचा तडाखा ' जन्माची अद्दल घडवीन मी ! मला कोण समजलास ? लग्न एकदांच होत असतं, समजलं ?--''
ती तोंडाने सारखी गरजत होती. आणि बफाट बडबड करीतच ती
घरीं चालली ! गडीमाणसांनी रंग ओळखला आणि ते सारेजण स्वयंपाक घराकडे धांवत गले. इकड तोंपर्यंत रखमानें घर गांठलें देखील ! डं जॅ र...
रखमाला त्या रात्री कसली झोंप लागते ? झालेल्या गोष्टीचें मण पाहाटपर्यंत एकसारख तिच्या डोक्यांत चाललें होतें. पाहाटंस किचित तिचा डोळा लागला.
थोडी झोंप लागते, तोंच तिला एक्र अतिशय वाईट स्वप्न पडले--
----_ -*-:-: -नपाप ८ *सााणाणाशश 2 नावात
अल्क्णणणपीणीपरीशीत राधा ीधकणशी0ी णी 0?पीप?”?ी”?ण?प?)२2ी?ण?णा णक - पा" ताक पपप ८“ ८८. ८ कयत चड तला
दोन नवरे १९९
क्ट ्टाध्ट "४-४ म "२2 ४ शकशध्ट ४४५४४८४४४५ -- “- ५८९२ “ 2२ * >/५- «- ्् च "६ “-*42 “7५ ४८४४४५४४४४ “कश ४0४८४0१ आहोटीणा
“रंगो असहाय व्थितोत रडत आहे, ' रवमा मामी, मामी , असा
ती टाहो फोडोत आहे, इतक्यात रगीच्या डोक्यांत कोणी तरी धोंडा घातला- स्वप्तांतील त्या धोडयाच्या आवाजाने रवमा खाडकन जागी झाली
आणि रडू लागलो. स्वप्तातील तो सारा प्रकार तिला खराच वाटला!
पण थोडय़ा वेळाने तो भानावर आलो. तरीही रंगीला काही वेडावाकडा त्रास होत असावा असच तिला वाटू लागल.
आणखी कांही वेळ गळा नाही, तोच तिला दरवाजावर “ रखमा मामी ! रखमा मामी ! '' अज्ञा कोणी तरी हाका मारीत असल्याचें पव आलें. तिला ही हाक कोणाची आहे हे प्रथम लक्षात आले नाही.
ती झटकन उठली. तिने दरवाजा उघडला बाहेर पाहिलेता, सख्वी
तिच्या पुढ उभी
त्या वेळो चक्क उजाडले होत, त्यामळ सखीचा उदासवाणा भकास चेहरा एकदम रग्वमाच्या नजरेस आला
गेला महिना दोड महिना सखी पानगावला गली नव्हती. ती मन्याचा तपास दुसरीकडच करीत होती. पण तिला मन्याची बातमी मळीसुद्धां कळली नव्हती !
अलीकडे पोलिस दगखोराचा बदोबस्त कडक उपाय योजन करीत होते. कित्येक वेळां त्यांना ह्या दगखोरांवर गोळीबारही करावा लागला होता! शा गोळीबारात मन्या सांपडला, असेही कोणी कोणी म्हणत होते |! पानगावच्या रामोशी मडळीकडन कांहींना कांही खरी हकीकत समजल्याजिवाय राहाणार नाही, असें वाटन सखी दोन तीन दिवसापूर्वी पानगांवला गळी होती. तेथ तिळा मन्या, सावळ्या ह्य़ांपेकी कोणी गोळीबारांत सापडळ नाहीत, अञी पक्का माहिती मिळाली. त्यामुळे तिची काळजी जरा कमी आली.
नंतर ती गढीत रंगी आणि गोराबाई ह्याना भेटण्यास गेळी. ती मन्याची बायको सर्वाच्या माहितीची असल्यामुळे तिला गढीत मज्जाव झाला नाही.
तेथ तिला रंगीसंबंधी समजळेली अत्यंत करुणाजनक हकीकत सांगण्या- करितांच सखी रखमाकडे घाईघाईने त्या वेळीं आली होती.
११२ साखर गोटी रखमाला पाहात"तांच सखीला बोलवेना. ती फक्त रडूं लागली ! “अग, बोल कीं काय ते! अशी रडं नकोस-- रखमा सहानुभूतीच्या स्वरांत बोलली.
“काय सांगू तुम्हांला मामी--
सखीला हुंदका आला.
रखमाला वाटले, हिलाही कोणी तरी दृष्ट पुरुपानें त्रास दिला असल, ह्यामुळे हिला वाईट वाटत असावे. म्हणून ती कठोर स्वरांत म्हणाली--
“ सांग, सखे ! पुरुषजातच मेळी दृष्ट! पण आपण आपलंपण सोडतां कामा नर्य--''
“तसंच हो मामी--
सखीला पुढे बोलवेना. तिच्या डोळ्यांतून धळघळ अश्व॒ वाहात होते.
दोघी घरांत गेल्या. थोड्या वेळानें रगीविपयी कळलेली सारी हकीकत सखीने रग्वमाला सांगितली.
ती हकोकत एकरन रखमाची कंबरच खचली. ती एकसारखी रड्ं ळागळली !
पण थोड्या वेळांत ती धीराने उठली; आणि सखीबरोबर पानगांवला जाण्याच्या तयारीस लागली.
पानगांव केव्हां गांठीन असे तिला होऊन गले.
आबांचा दृष्टपणा तिला आता कळसास पोहोचलेला दिसत होता. अशा दुष्टाकडे लहानपणी आपण प्रमाने पाहात होतो, ह्याचीच तिला आतां अत्यंत लाज वाटू लागळी !
तिसऱ्या प्रहराच्या सुमारास त्या दोघी पानगांवला जाऊन पोहोचल्या. पावसाची बरब््र चालच होती.
गढीकड जावयाच्या वाटत मांड्याइतर्के गवत वाढले होतें. गढीच्या स॒भोंवतीं पाण्याची डबकी सांचळली होतीं. गढीच्या आंतील बाजूच्या बागेत तण माजले होतें. गढीजवळून वाहात जाणार्या नागमोडी नदीचा प्रवाह एका खडकावर आपटून उत्पन्न होणाऱ्या आवाजाचा भसूर प्रतिध्वनि गढींत ऐकं येत होता !
दोन नवरे १९३
एका बाजूच्या खोलीत रंगीच्या उशालगत गोराबाई सचित बसल्या होत्या.
रखमाला पाहातांच गौराबाईनीं ओक्साबोक्शीं रडण्यास सुरुवात केली !
भजंगरावांनीं गढीच्या बंदोबस्ताकरितां ठेवलेलीं माणसें लागलींच तेथे गोळा झालीं. गौराबाईनीं शाहाणपणानें आपलें दुःख दाबले !
रखमाला तर रंगीची स्थिति पाहून झीटच आली ! सखी गडी- माणसांच्या पुरी माहितीची होती. त्यामुळे ती आपापल्या कामाला निघून गेली.
रंगीला बोलवत नव्हते. तिनें फक्त आपल्या कपाळास हात लावला. ती मुळूमुळू रडं लागली. पण तिला इतका अशवतपणा आला होता कीं, तिच्या डोळ्यांना देखील आतां पाणीच येईना !
गौराबाईंनी घडलेली ती भयंकर हकीकत रखमाला सांगण्यास सुरुवात केली, त्या म्हणाल्या--
“ रंगीला ह्या ठिकाणी प्रथम चांगलं बरं वाटलं. मधून मधून इकडे रगीच्या ओषधपाण्याचा तपास करण्याकरितां भूजंगरावही येत. ते म्ज- मजनें गप्पागोष्टीही करीत ! मेल्याच्या मनांत काय होतं, तें शेवटपर्यंत त्यानं आम्हांला कळूं दिलं नाहीं! --
“ ज्येष्ठ संपतां संपतां एक दिवस पांचसहा माणसं पृष्कळ सामान- सुमान घेऊन इथं आलीं. रंगीला बरं वाटलं, म्हणून सत्यनारायण करायचा आहे, असं त्यांनीं सांगितलं ! सत्यनारायण रंगीनेंच करायचा आहे, म्हणून तयार राहाण्यास तिच्या चुलत्यानं तिला बजावलं ! --
आबांचें नांव निघाल्याबरोवर रखमाच्या कपाळास आठ्या पडल्या. तिचा चेहरा लाल झाला. पण ती कांहीं बोलली नाही. फक्त दांतओंठ खाऊं लागली.
गौराबाईनीं रखमाकड पाहिटे. आपल्या यजमानांचें नांव निघाल्या- बरोबर तिच्या कपाळास आठ्या पडल्याचे पाहून त्यांना एकपरी बरेंच वाटलें. नंतर त्या पुढील हकीकत सांगू लागल्या
“ वाजंत्री पण आले ! मेला गुडभट आला ! त्यानं आपल्याबरोबर दुसरा एक धोंडभट आणला होता ! रंगीला सत्यनारायणाकरितां पाटावर
कन्नन पा -> टाफटशणिणा ह "ह यापी पस पणणणाणा णिणाणाशिगा्णचण जमवन क्क नक नला व काका केशन लड
का मा व ११४ साखर गोटी
बसविलं ! रंगीच्या मागपुढं पाहारा बसळा ' तिच्या दंडाला कोणीसं धरलं आणि तिचं लग्न भुजगरावबारोबर लावलं की ग रखमा !
''र॒गी ओरड लागळी. पण तिचं तोडच कोणीसं दाबलं! होम झाला, लग्न झटपट उरकलं ! माणस जिकडच्या तिकड निघून देखील गेली !
मळा पण दोन रट्ट मिळालं. मग मी काय करणार * त्यांच्या हातास हात मला पण लावावा लागलाच ! --'
“त्यांचा आणि भुजंगरावांचा हा दुष्ट कावा मला थोडा तरी अगोदर कळत तर मी रगीला घेऊन इथं आलेंच नसते मुळी ! सारा वाईटपणा माझ्यावर आला को ग रखमा | --''
गौराबाईना हृदका आला. तशाही स्थितीत त्या पृढ बोळ लागल्या.
“जरा सूटका झाल्याबरोबर रगीन आपलं डोक दगडावर आपटून घेतलं ! --''
“ तिचा प्राणच जायचा. पण कशी तरी वांचली ' तेव्हापासून आंथ्ररूण धरूनच आहे ही ....
'' तिला ध्यानी मनी सावळ्याशिवाय कांही ढिसत नाही. तिच्या पोटांत अन्न जात नाही. सावळ्याकरितां कुडीत प्राण ठेवून आहे ही : तो भेटला की, मी मरेन म्हणते ही ! '
* मला पण इथ डांबून ठेविळी आहे त्यानी. कूठठु कुटु हालता येत नाही मला ! "'
“गुडभटाकडून कृणाला काही सागायचं नाही, म्हणून जपथ ध्यायला लावली आहे त्यांनी ! तेहो पण आंबेंगांवला एकदां गलत, ते पून्हा इकडं येतच नाहीत!
“ रंगोच्या डोळ्यांबरोबर माझे डोळे मिटावे, असंच मी देवाजवळ मागणं मागते रखमा !--'
ह्या वेळी रंगी, रखमा आणि गोराबाई ह्या तिघीच्या अंत:करणात होत असलेली कालवाकालव लेखणीनें येथे कशी लिहितां यंणार !
रामलिंगाच्या डांगरांत २
ज्यार्तापध्यास रंगीलाइतका लागला होता, तो सावळ्या कोठ आहे, हें आंबेगाव किवा पानगाव ह्या बाजूच्या लोकांना कळणे शक्य नव्हते, इतका तो दूरच्या ठिकाणी होता. मन्या, खाशा आणि सावळ्या ह्यांची ती छोटी टोळी बार्शी जवळच्या रामलिंग डोगरांत लपून छपून होती रामालंगचा डोंगराळ भाग मोंगलाई आणि आंग्लाई यांच्या सरहद्दीवर असल्यामुळे मन्याने आपल्या धंद्याला तें ठिकाण पसंत केलें होतें. शिवाय तें ठिकाणही पवित्र आणि रमणीय असल्यामुळे तेथे राहाणाऱ्या माणसांना शांतपणे विचार करितां येत असे. त्या वर्षी त्या भागांत पाऊस चांगला पडला होता. तो श्रावण महिना चालू होता. त्या वेळी रामलिंगाजवळ निरनिराळ्या बाजूंनी आलेले स्वच्छ पाण्याचे जलप्रवाह झुळूझुळू वाहात होते. सभोंवतालच्या टेकड्यांनी आणि दर्याखोऱर््यांनी हिरव्या गार शाली अंगावर घेतलेल्या होत्या. त्या जालींत मधून मधून पिवळी, तांबडी आणि पांढरी वेलबुट्टी काढल्याचा भास संकेश्वर, चाफा आणि इतर रानवेली यांच्या फुलांच्या भरगच्च बहारामुळे होत होता त्या वेळीं त्या ठिकाणची हवा पण सुदर होती. त्यामुळ जवळपासच्या गांवच्या लोकांचें तें फिरावयास येण्याचें ठिकाण झालें होतें. तेथे सोमवारी येणाऱ्या यारत्रेकरूंमुळे तर त्या दिवशीं त्या ठिकाणास जिवंतपणाच प्राप्त होत असे.
10000 श्नळळदन्यावळाळ, द “म्योळ वाहक, कजय स २ हना. _.__7____----.*---:.--.-..--.----:-.-.:::: ---: --
११& साखर गोटी
साधु, बरागी किवा एकदोन पुजारी ह्यांखरीज तेथे रात्रीं कोणीं राहात नसत. बेराग्यांकरितां राम लिंगाच्या जवळपासच्या बाजूस झोंपडीवजा लहान लहान धमंशाळा श्रद्धाळू लोकांनी बांधन ठेवल्या होत्या.
अज्नाच एका मोठ्या झोंपडीची दुरुस्ती करून तेथे मन्याच्या टोळीनें आपले आसन ठोकले होतें.
अंगांत पिवळी कफनी परिधान करून, कपाळास यथच्छ भस्म फासून, खांद्यावर झोळी आणि हातांत चिमटा घऊन, हे त्रिवगं भिक्षच्या मिषानें दिवसभर हिडत. त्या वेळी ठिकठिकाणी पाळत ठेवीत. आणि रात्री कोणा तरी श्रीमंताच्या घरावर वेष बदळून धाड घालीत ! हाती लागलेल्या संपत्ती- पैकीं पुष्कळशी गोरगरिबांना वांटून टाकीत ! त्यांतील जरूरीपुरते पेसे ते आपल्याकरितां ठवीत !
त्यांनी आपल्याजवळ खर्चाकरितां राखून ठेविलेले पुष्कळसे पेसे मद्याच्या खरेदीकरितांच खरचं होत!
त्या तिघांत मन्याचें मद्याचे व्यसन पराकोटीला गलें होतें. खाशानें नुकताच त्याचा गुरूपदेश घेतला होता. सावळया मात्र पूर्ण मद्यद्वषी होता.
दिवसेंदिवस सावळ्याला असल्या बंडखोरीचा तिटकारा वाटूं लागला. अशा कृत्यांत धाडस असलें, तरी त्याचा शेवट बरा होणार नाहीं; महायुद्धाच्या बाम धुमींत प्रथम प्रथम आपला हात चालत असला, तरी पुढ सरकार आपला पिच्छा पुरविल्याशिवाय राहाणार नाही; अशी त्याची पक्की समजूत झाली. त्यामुळे त्याची वृत्ति उदासवाणी बन्ं लागली.
मन्या आणि खाशा यांनीं पुढ काय होईल, याचा विदेषसा विचारच केला नव्हता. त्यांना चाललेले दिवस ठोक चालले आहेत, असेंच वाटत होतें !
श्रावण महिन्यांतील अमावास्येच्या रात्रीं एका दूरच्या झोंपडींत मन्या आणि खाशा रात्रींचे धुमी पेटवून बसले होते. त्या बाजूस वाघाची भीति असल्यामुळें दुसरे कोणी बरागी तिकडे रात्रीं राहात नसत ! मन्यानें चिल- मीचा मोठा झुरका मारून ती चिलीम खाक्याच्या हातीं दिली आणि तो झोळींतील दारूच्या बाटल्या काढून आणण्यास गला.
बाहेर काळाकुट्ट अंधार पडला होता. फक्त वन्य इवापदं भक्ष्याच्या शोधार्थ हिडत होतीं. वेलीदेखील भीतीमुळे वृक्षांना घट्ट चिकटून राहिल्या
-दटानटपा लाट“ नपा
रामलिंगाच्या डोंगरांत ११०:
«८
/९./८९/९./५./५./५./५ ८९ ५ ८५.६ “९८१५८१८ “८६५ ५५८९८६८५५५” ८५८ /१ १ ५५६४५ ४४६०४४ ४६ १५४१ * ४९४४५१ ११ ४ ४४”/१/१ ११ १८१४ ५४५ ५ ८१ ५१” “९ /९../९/९../१ / *५ १५ *९/४९../.४/४ ” ४९/१७/४१४९» १ ९.५ “७ कपट
होत्या. अशा स्थितींत निर्भयपणे त्या ठिकाणापासून कांहीं भंतरावर' सावळ्या मगचमं आंथरून त्यावर सचित बसला होता !
त्याला पुष्कळ दिवसांत आंबेंगांवाकडील बातमी कळली नव्हती. रंगीकडे गेल्यास आपल्या पायांत केदेचा खोडा पडल्याशिवाय राहा- णार नाहीं, ह्याची त्याला खात्री होती. मन्याच्या नादाने कुठून ह्या फंदांत पडलों, असें त्याला होऊन गलें होतें. आतां ह्यापुढे काय करावें, कसें वागावें, याचा निर्णय त्याला कांहींच करतां येत नव्हता !
सावळ्या त्या झोंपडीत बराच वेळ नसल्यामुळे मन्यानें त्याला हाका मारण्यास सुरुवात केली. खाशानें बाहेर जाऊन त्याला शोधून काढलें. त्याला ओढीत ओढीत झोंपडीत आणले. सावळ्या अगदों रडकुडीस येऊन गेला होता. दारूची बाटली सावळ्याच्या पुढ करून मन्या .म्हणाला, |
“ सावळ्या लेका, जरा ह्यांतला अमताचा घुटका घे ! सारी काळजी दूर होईल. उगीच कां कष्टी होतोस ?-- “ मन्या, तुझ्या सगतोला लागलों, चुकलों मी ! '' सावळ्या बोलं लागला, ““ घरादाराला पारखा झालों आणि अरण्यांत येऊन पडलों. केव्हां काय होईल, ह्याचा नेम नाहीं. कसलं आयुष्य हें! --”
“ सावळया, ह्यांतच श्रपणा आहे आपला *' मन्या उत्तर देऊं लागला, “ ह्यापेक्षा शोय दाखविण्याची संधि मिळते कुठे आपल्याला ? श्रीमंत लोक कसे चळचळ कांपतात आपल्यापुढं ! खंडणी द्या, म्हटलं कीं खुश्ीन देतात ते! आपण काय, तो प्रसा भ्केलेल्या कंगाल लोकांनाच वांटतो. ह्यांत खरा परोपकार होतो. आमचे बापजादे असें करीत नसत. मुहेमाल आपल्याजवळ ठवीत; म्हणून ते गुन्ह्यांत सांपडत. आपलं तसं नाहीं ! ...”
“अरे, हें खरं, पण आपल्याला पंशाचा उपयोग नाहींच. आपण जर पैसा सांठवला, तर त्याचा उपयोग मुलांबाळांना तरी नाहीं का होणार?"
मध्येच खाशा बोलला. र
“ मुलाबाळांची काळजी कोणाला ? चालला दिवस तो ठीक! आपल्याला पकडण्याकरितां आलेल्यांच्या हातांवर तुरी देण्यांत खरी मौज वाटते, मला तर खाशा ! --'
मन्या हंसत हंसत म्हणाला. आणि त्यानें बाटली फोडलीः
-२१९८ साखर गोटी
>८५-०५-५/४-००५०-५--००८८५-८/५८.४६/४८८५/ “४०-५४१-४५८५७ “ ४*८* ४५४१५४८ “५८५५५५४५४५ “४४५१-८१ १९८५४१ ४८४४४४५ ४ ट/ ८५४४५४५९/४५-/५/०
मन्याने पेला भरून खाशाला दिला आणि दुसरा पेला तो आपल्या तोंडास लावणार, इतक्यांत सावळ्याने त्या दोघांच्या पेल्यांवर सोट मारले !
पेल्यांच तुकडे तुकडे झाळे ! दोघेजण सावळ्याकड आईडचर्यानें पाहूं लागले । त्यांना सावळ्या बोलला--
* लकांनो, किती सांगतों तुम्हांला, दारू पिऊं नका म्हणून ! दारू आणि बायका ह्याच तुमच्या ह्या धंद्याचा घात करतील । ...'
“सावळ्या, मी तर बायकोच्या देखील नादी नाहीं! ' मन्या म्हणाला, “ सखीनं मला सोडलं आहे. तही लेका दारू पी, म्हणज रंगी तूळा सोडील ' मग बायकांची तर कटकट नाही ! ढारू काय, आपल्याला केव्हांही सोडतां येईल ! ''
मन्यानें सबधच्या सबंध दारूची बाटली तोंडाला लाविली, ती हिसकावन घेऊन दूर फक्रीत, सावळ्या म्हणाला--
" मन्या, दारू सोडशील, तर मी तुमच्यांत राहीन. नाहींतर कुठही जाईन | --'
“ पण आतां जाणार कुठं ? कृठंही गलास, तरी तुझ्या मागं पोलिस हात धुवून लागलंय ! मग जाणार कुठं, भागानगराला ?' मन्या म्हणाला.
"हो! हो! कुठंही जाईन मी! कामधंदा करीन, पोटाला मिळवीन. मला असला धंदा नको ! असला पैसा नको ! तही नकोस आणि तुझी दारू तर नकोच नको ! ...'' सावळया म्हणाला.
“बघ खाला, '' मन्या म्हणाला, “ वेडपटासारखा कसा बरळतोय सावळ्या ! --''
“अरे असलं कांहीं कळत नाही मला! “ खाल्या मनापासून बोलं लागला, “ आपला देश स्वतंत्र करावा; मावळ्यांसारवा आपण पराक्रम गाजवावा; म्हणून मी तर ह्या धंद्यांत पडलों. तें राहिलं दूर ! साधे पोलिसच आपल्याला पिळीत चालले आहेत कीं ! --*
'" अरे, अशानें का देश स्वतंत्र होतो ? वेडं कुठले ? ” सावळ्या म्हणाला. न
“ हें सगळं खरं पण सावळ्या, आज मला दारू पिऊं दे! सडकून पिऊं दे ! मग उद्यांपासून सोडीन मी ! ...” |
मव कट म-अभकतान्योळा भड ाकणममननरयमहन ली: नवर डमनशचो नकाय १७120. € ---------द-->>>>>> >>> 1 एकाला ण 0 ४८-णणणणाप लाला ना.
'रामालेंगाच्या डोंगरांत ११५९
मन्या काकूळतीस येऊन बोलला.
“ दारू पाहिजे तर खुलाल पी । पण मी मात्र तुमच्या संगतीत राहाणार नाही--'
सावळ्या निश्चयपूर्वक बोलला.
“जा! जा! वाटेल तिकडे जा! रंगीकडे जा, पाहिजे तर लका, आज तरी मी दारू पिणारच ! खाद्या, काढ दुसरी बाटली । --''
मन्या अगदी घायकृतीस येऊन बोलला.
ह्या मंडळीशी हुजत घालण्यात अर्थ नाहीं, असें सावळ्यास वाटलें. तो एका कोपर्यांत डोळे मिटून स्वस्थ पडला.
त्याच्या डोळ्यांपुढ गतस्थितीची चित्र येऊं लागलीं. गळ्यात माळ घाळीत असलल्या रंगीरचे चित्र प्रथम त्याच्या डोळ्यांपुढे आले. आपण शीळ घातल्याबरोबर रंगी आपल्याकडे धांवत कशी येई, हें दुसरें चित्र डोळ्यांपुढे तर एकसारखं नाचू लागले. त्यात तो कांही वेळ रंगून गला. न
जवळचं मन्या आणि खाल्या यांचा गोधळ चालला होता. त्यामुळें मध्येच त्यांचीच चित्र त्याच्या डोळ्यांपुढ उभी राहिली.
शेवटीं, त्याच्या मनापुढ भजंगराव आळे. ह्याच ट्समाच्या कारस्थाना- मुळे आपल्यास पकडण्याकरितां पोलिसांनी वारंट आणलें. तें चुकविण्याकरितां प्रथम आपण मन्याच्या टोळीत गिरलों, त्यांत सामील झालों. आणि अनेक मोठमोठ गुन्हे केळे. इत्यादि सार्या गोष्टी त्याच्या डोळ्यांपुढ नाचं लागल्या. आतां रगीला तोंड दाखविण्यासही आपल्याला खला मागं नाहीं तेव्हां काय करावें, हें त्याला सुचेना. त्यामुळ त्याच्या जिवाची एकसारखी तगमग होऊं लागली
मन्या आणि खाक्या यांची बडबड तर आतां कळसास पोहोंचळी होती त्यामुळे ह्याना सोडून जावे, मग काय होईल तें होईल, असा त्याच्या मनाचा पक्का निश्चय झाला.
थोड्या वेळानें त्याचा डोळा लागला.
सावळ्या भल्या पाहाटस जागा झाला. त्यानें आपलें सामानसुमान भावरण्यास सुरुवात केली. त्यानें पोलिसांचा गणवेष धारण केला. चोरी करून
वट ७३4 142 “>. य न्य सौ
२२० साखर गोटी
की
॥.>९./”% ”* “४.” ७.” १७.५७. ७५ ७७४ २७.४ ७४५४१४१ ४५ ४४- ४ “0५ /२ ८४% “४८ ५-४" ७. ४५ २. ४९ &“.& १७७70० ८27 ७. ८» १५.८७. ७_. १७../७.//४_./ ५ ८ «२ ५ ./७_/७./२../”%
मिळविलेलीं दोन पिस्तुले खिञांत घातली. गप्त जागीं ठेवलेली बरीचशी रोकडही त्यानें आपल्या बरोबर घतली.
रामलिंगाचें दशन घेऊन वाट फुटेल तिकड तो चालू लागला !
त्या रात्री मन्या आणि खाल्ला यांनीं बेसुमार दारू झोकली होती । त्यांची बडबड रात्रभर चालली होती ! ठिकठिकाणीं घातलेल्या दरवड्याच्या गोष्टीही त्यांच्या तोंडून बाहेर पडत होत्या !
ही त्यांची मोठ्याने चाललेली बडबड रामलिंगच्या पुजार्याच्या कानी गेली. त्यांच्याजवळ येऊन त्यानें ती चांगली ऐकली. बक्षिसाच्या आशनें रात्रींच तो पोलिस ठाण्यावर वर्दी देण्यास गला !
उजाडण्याच्या सुमारास थंडगार वार्याच्या झुळकीनें मन्याचें डोके शांत झालें. तो जागा झाला. सावळया पळून गल्याचें त्याच्या लक्षांत आलें. त्यानें लष्करी वेष चढविला. खाशाला तो उठव लागला.
चक्क उजाडण्याच्या सुमारास बरेच पोलिस दबत दबत धमंशाळेकडे येऊं लागले. मन्याच्या तीक्ष्ण नजरेत ती गोष्ट आली. तो खाशास एकसारखा इशारा देत होता. झटकन पोलिसांनी धमंशाळेवर छापा घातला !
मन्या चटकन निसटला. बंदुकीच्या फेरी झाडीत झाडीत तो दर्या- खोऱ्यांत अदृश्य झाला !
खाशा पोलिसांच्या हातीं लागला !
पोलिस!नी धमंशाळेंची झडती घेतली. झोळींतील दारूच्या बाटल्यां- ख रीज दुसरा महत्त्वाचा मुहेमाल त्यांना सांपडला नाहीं !
सुड घेतला ! 2ण्
->:<<->--_-*
> “२ “९ /००५...७”,
र्ंगी बेसुमार आजारी असल्यामुळें गढींतील लोकच काय, पण भुजंग- राव देखील अतिशय त्रासून गले होते !
तिच्या आतताईपणाच्या वतंनानें भुजंगरावांच्या आशच्या चिधड्या चिघड्या उडन गेल्या होत्या! तिची कशीही आणि कोणत्याही प्रंकारें शुश्रूषा क्रेली, तरी तिची प्रकृति सुधारणार नाहीं, आणि तिचें मन तर मुळींच ताळ्यावर येणार ताहीं, अशी त्यांची पुरेपूर खात्री झाली होती. ह्यापुढे काय' करावें, कसें वागावे, हें त्यांना मुळीं सुचेनासे झालें होतें !
आबांच्या नादाने आपण भलतेंच करून बसलों; जुल्म जबरदस्तीने प्रम संपादन होत नसतें, ही जाणीव त्यांना फार उद्यीरा झाली !
आतां ह्या पंचांतून आपली सुटका कशी करून घ्यावी, ह्याचा मार्ग ते शोधीत होते. कांहीं तरी भयंकर उपाय योजून ह्या कटकटींतून त्य़ांना मुक्तही होतां आलें असतें, पण इतकें दृष्ट अंतःकरण त्यांचें नव्हतें.
रंगीच्य़ा डोळ्यांतील निळसर तेजाची त्यांच्य़ा मनावर पडलेली छाप अद्यापि अजिबात नाहींशी झाली नव्हती ! रंगीविषय़ींची करुणा त्यांच्या मनांत वास करीत होती. त्यामुळें रखमानें तिला आंबेगांवला नेण्याची गोष्ट काढतांच भुजंगरावांच्याच काय, पण गढींत तिच्या दिमतीस असलेल्या सार््यांच्याच डोक्यांवरील ओझे हलके झालें !
रखमानें रंगीला आंबंगांवी आणिलें आणि मोकळ्या हवेंतील साव- ळ्याच्या मळ्यांतील झोंपडींत ठवलें. त्या झोंपडींत राहिल्याने आपण आपल्या घरींच आहोंत, असें समाधान रंगीला लाभलें. आणि त्यामुळे तिच्या तोंडावर थोडी टवटवी दिसूं लागली !
८ - -प: -ामा---ा--“न-ाऱ
१२२ साखर गोटी
रंगीसंबंधानें आबांना खरी कल्पना आली नव्हती, त्यामुळे ते मनांत म्हणत, “ चार दिवस पोर रुसेल, रडेल, नतर आपोआपच वळणावर येईल ! सावळय़ानें केळेले इतके अपराध पोलिसांच्या दप्तरांत दाखल आहेत की, फांशीची नाहीं तर जन्मठेपेची तरी भिक्षा त्याला झाल्याशिवाय राहणार नाहीं!
“साखरगोटी आपलीच म्हणून सावळ्या बडबडत होता. भुजंग- रावांच्या अंगावरही त्यानं हात टाकला होता. आतां बघ म्हणावं सावळ्या, तुझी साखरगोटी गली ! रंगीही पण गेली! आणि तुझं लेका सवेस्व गेलं ! कुणाशी हष चालविला होतास, ह्याची तुला कल्पना नव्हती ! कालच्या पोरा, उगीच तुझा तंच सत्यानाश करून घेतलास--'
पण आबांनीं रंगीची झालेली अवस्था समक्ष पाहिली असती, तर तिच्याविषयी त्यांच्या अंतःकरणास थोडा तरी पाझर फुटला असता. निदान त्यांना तिची दयौ तरी आली असती. गोौराबाईनीं कितीदां तरी रंगीचा समाचार घेऊन येण्यास त्यांना सांगितलें होतें--नव्हे, विनविलें होतें--पण त्यांनीं तसें केलें नाहीं.
रंगीला आपले तोंड दाखविण्यास आबांना आतां लाज वाटत असावी. आपणच त्या खेळकर पोरीचा एक प्रकारें खून केला, असेंही तिच्या प्रकतीची चिंताजनक स्थिति ऐकून त्यांना वाटत असावें. म्हणून ती जवळ असूनही आबांना तिच्याकडे जाण्याचे ध्य होत नव्हतें !
रंगीकडे जाण्याचा लकडा गौराबाईंनीं अतिशय'च लावला, तर आबांना तिच्याकडे एकादे वेळीं जावेंसेंही वाट. पण ती रखमाच्या येथे आहे, एवढ्याच गोष्टीने त्यांच्या अंगाचा थरकांप होई ! रखमाची भीति त्यांना रात्रंदिवस वाटे. तिनें मारलेल्या जळत्या लांकडानें आबांच्या डोक्याला झालेली जखम हळुहळू भरू लागली असली, तरी त्यांच्या मस्तकांत-मनांत-रखमानें केलेली जखम कधींही भरून येणारी नव्हती !
म्हणून तर सावळयाच्या झोंपडीकडे रंगीच्या समाचाराला आबा गळे नाहींत. रंगीलाही पण त्यांचे दशन नको होतें !
आणि रखमाच्या मनांत. तर आबांचें भूत त्यांच्या दोन नवर््यांच्य
०.2“ का ज- र ८ ला टॅ रासा पणी 0०?” 0ी 0?”
सूड घेतला' कू १९३
५/€*/**ण1 “* %५/ ४.४ “0 47 अ* “०” % »४ “०७% 479 »”% »€*६ च्ड "२ --“?*>€*
वल्गनपासून एकसारख जळत होतें. त्या आगींत त्यांनीं केठेल्या रंगीच्या विटंबनंचें तेल पडून आतां तर काय, त्या आगीचा डोंब झाला होता !
गांवांत देखील आबांना बाहेर तोंड काढणे कठीण झालें होतें. रखमाचे आणि त्यांचें भांडण झालें, रखमानें आबांना चांगलाच प्रसाद दिला; ही हकीकत गांवभर होण्यास वेळ लागला नाही. त्यामुळें गांवांतही आबांची छी: थू: झाल्याजिवाय राहिली नाही.
खेड्यापाड्यांत असल्या गोष्टीचा बभ्रा हो-यास फार वेळ लागतच नाहीं मुळीं !
आबांनीं भ्जंगरावांशीं रंगीचें लग्न सक्तीने लावलें, त्यांना गुंडभटाने मदत केली, ही बातमी इतके दिवस ग्प्त राहिली असली, तरी रखमानें रंगीला आंबंगांवीं आणल्याबरोबर ह्या बातमीचा एकदम स्फोट झाला ! आणि जो तो रंगीविषयीं हळहळूं लागला. आबांना लोकांचे आणखी शिव्याशाप जसूं लागले !
ते शिव्याशाप देण्यांत आतां मगनशठही भाग घऊं लागले होते. त्यांनाही पूर्वीहतका आबांचा वचक सध्यां वाटेनासा झाला होता ! भुजंगराव आणि आबा यांनीं रोकड सांठवून ठवण्याच्या भानगडींत मगनशेठना चांगलेंच पिळून काढलें होतें ! त्यामुळ त्यांना फार मोठा चट्टा बसला होता ! त्याचा सूड कांहीं तरी घ्यावा, अशी मगनशेठची आंतून आंतून फार इच्छा होती !
तशी संधि आतां आली आहे, असे मगनशठना वाटलें. रखमाला -चिथावून आबांना कोर्टापुढ खंचावें, असा त्यांनीं बत ठरविला !
रखमा मगनशेठच्या दुकानी रंगीच्या ओऔषधपाण्याच्या जिनसांकरितां -नेंहमीं जात असे. मगनशेठ त्या वेळीं रंगीच्या प्रकृतीची पूुसतपास करीत आणि तिच्याविषयीं आपली सहानुभूति दाखवीत.
सारा गांव आवा आणि भुजंगराव यांना दोष देत आहे; आणि रंगी- -सावळ्याचें गांधी पद्धतीनें झालेलें लग्नच खरें लग्न आहे; असें लोक म्हणतात .हेंते रखमाला वरचेवर सांगत.
रखमालाही त्यामुळ बरें वाट.
शेतकऱ्यांची सृगी संपली, म्हणजे त्यांना मोकळेपणा असतो. आणि
ल्म
१२४ - साखर गोठीं
दोन पेसेही त्यांच्या हातांत खेळत असतात. अशा वेळीं तुंबलेल्या फिर्यादी- अर्यादींना सुरुवात होते.
म्हणून सुगी खलास झाल्यावरच रखमानें तशी फिर्याद रंगीकडून आबा, भुजंगराव ह्यांच्यावर करावी; म्हणजे पहिलें लग्न खरें ठरेल; आणि आबा, भुजंगराव यांची नाचक्की होऊन त्यांना शिक्षाही पण होईल; असा सल्ला मगनशेठनीं रखमाला दिला !
रखमाला असें कांहीं तरी पाहिजेच होतें. त्याशिवाय आबा व भुजंगराव' ह्या दुष्टांची खोड मोडणार नाहीं, असें तिला वाटत होतें !
अशी फिर्याद सावळ्यानें, नाहीं तर रंगीनें करावयास पाहिजे, असा तपास मगनशेठनीं तर्हेगांवास जाऊन करून आणला. त्यामुळे रखमाला ही गोष्ट रंगीच्या कानांवर घालणं भाग पडले !
रगीची प्रति खाल,वत होती. तिला आतां कशाची आज्या वाटत नव्हती, ती रखमाला म्हणत असे--
“ डोळे मि:ले कों, कृप्णासारखा वेणू वाजवीत असलेला सावळ्या मला दिसतो की ग मामी! तो भटला कीं मी जाणार! --
मामोच्या फिमादीच्या कल्पनलाही रंगीनें उत्तर दिलें होतें--
“ मागी, देवानंच माझं सावळ्याशीं लग्न लावलं आहे. दुसर्या कोणाशीं नाहीं! खर खाट क,ण ठरविणार हें! सरकार ठरविणार म्हणतेस? सरकार कांही देव नारी! हीं माणसंच--पुरुषच--कीं ! आणि देवा- सारखे पुरुष थोडेच |! माझा सावळ्या ! तुझा सदूकाका ! सखीचा मन्यादेखील ! हे मला देव वाटतात ! बाकी जो बघावा तो दृष्ट ! मामी, सारे दृष्टच ! मग न्यायाधीश पुरुष असेल, तर तोही दृष्ट नसेल कशावरून ? मामी, नको ही कटकट--
रंगोनें कानांत बोटे घालून डोळे मिटून घतले.
त्यानतर सदोबाचा विचार रखमा घऊ लागली, तेव्हां ते म्हणाले,
“ र॒गोला विठोबान सावळ्या दिला आहे. तोच तिचा खरा नवरा! साहेबांच्या कोटाला धम कसला कळतोय' ! लग्न हें धर्मातील कृत्य आहे.. तुकाराम महाराज म्हणतात
“ धर्म रक्षावयासाठी' । करणें भाटी आम्हांसी ।"
पाण णी 0000 (0 00 १णी?प0ी शाप फेणी णणणीणा हीण वणीची ल यण एणणण 0 १0१0१?0?0१ै?0ी0ी0?00४श0ी0 शिण शीणाणीणा
सूंड घेतला ! ११५
%५-८०%७%../?१_/”४५ ४४ _/% ४८१ /7१_/09_//9 //४ 7 /0% ४४%. ४१ /९२ /१ ४१% /४* ”८* »%9 ४१ "२ ४४% /*% ४ 4"* शी १_, १९ /२ »/”१_ ७१६ / ४” "२. ' »/२ 2.४१ /“९ ८४ /१.”/१* ४६.” /*./%/१ ०.”
अग, धमं राखण्याचं काम साधकड अस्त. कोर्टाचं नसतं !
र्खमासारख्या वीर स्त्रीला असला वेदांत कसा पटणार? तिनें फिर्याद करण्याचें ठरविलें. तर््हेगांवच्या वकिलांनीं योग्य सल्ला दिला. मगनशेठनीं फार मेहनत घेतली. भात्र फौजदारी फिर्याद आंगलट येईल कीं काय, अशी भीति वाटून दिवाणी फिर्याद तर्हेगांव॑ कोर्टात गुदरण्यांत आली.
ही फिर्याद कोणी केली; ती कोर्टाने कशी घेतली; वगेरे गोष्टींची चर्चा येथे करावयास हें कांहीं कोटं नव्हे.
ह्या फिर्यादीनें साऱ्या तालुक्यांत खळबळ उडून गेली ! भुजंगराव, 'आबा, गुंडभट ह्यांना धास्ती वाटं लागली !
मगनशेठ सदोबांना त्यांच्या शेताच्या तारणावर पैसे देत होते. सदोबा ते पेसे त्यांना पसंत पडलेल्या वारकरी सांप्रदायांतील चकणे वकिलांच्या पदरांत नेऊन ओतीत होते ! ते चकणे वकील ही सारी दादा महाराजांची कृपा म्हणून ते पेसे घेत होते !
सदोबा सारखे भोळें कळ त्यांच्याकडे येणें हा त्यांच्या गुरूच्या कृपेनें आलेला देवयोगच होय, असे तर््हेगांवचे वकीलही बाररूममध्ये बोलत होते !
भूजंगराव आणि आबा यांनीं सातारच्या प्रख्यात फसवे वकिलांना आपले वकीलपत्र दिले होतें.
नोटिसा, साक्षीसमन्स करितां करितां एक वर्ष निघून गेलें !
हा खटला पुष्कळ दिवस तर्हेगांव कोर्टात चालला होता. तर्हेगांवच्या *“ संभ्रम ” ह्या साप्ताहिकांत ह्या खटल्याची सविस्तर हकीकत येत असे. पुण्या मुंबईच्या वर्तमानपत्रांचे बातमीदारही मधून मधून ह्या केसची हकीकत आपापल्या पत्रांत देत असत. परंतु जांस्त विश्वसनीय माहिती स्थानिक पत्रांत येणें संभवनीय असल्यामुळे त्या संभ्रम वर्तमानपत्रांत वेळोवेळीं सविस्तर आलेल्या रिपोर्टांतील कांहीं उतारे, वाचकांच्या माहितीकरितां पुढं दिले आहेत. सारीच हकीकत द्यावयाची म्हटली, म्हणजे तो एक ग्रंथच होईल. म्हणून त्रोटक उतारे दिले आहेत.
ओं जॉ आँ
१२.4 साखर गोटी, रंगीसंबंधीं संभ्रम पत्रांत पुढील मजकर आला होता.
“ रंगौला तर्हेगांव कोर्टांत आणिलें, तेव्हां तिचा न्सता अस्थिपंजर राहिला होता. न्यायाधिशांनाच काय', पण कोर्टातील सर्वाना तिची ती स्थिति पाहून करुणा आली. तिच्या डोळ्यांतील निळसर तेजामुळं सर्वाचे लक्ष तिच्याकडे वेधले. तिनें तुटक तुटक शब्दांत आपली करुण कहाणी न्यायाधीशांना सांगितली, तिचा सारांश असा :--
“ सावळ्या आणि मी लहानपणापासून एके ठिकाणीं खळलों. आम्ही शतांतून एके ठिकाणीं कामं केलीं. आमची जोडी लहानपणा पासूनच ठरलो होती. माझ्या थोरल्या भावावर सावळयाच्या बापाचा खून करण्याचा आळ आला. तो कुठं गला त्याचा पत्ता नाहीं. माझा चुलता आबा ह्यानं मला सांभाळलं. मला भुजंग- रावाला द्यावी, असं चुलत्याला वाटत होतं. मग आमचं आम्हींच लग्न ठरविलं. एकमेकांच्या गळ्यांत माळा घालून आमचं लग्न झालं. माझा पति सावळ्याच ! त्याची मी वाट पाहाते, तो आला कौं मी प्राण सोडणार, साहेब ! --
तिच्या जबानीनें कोर्टातील सर्वांची हृदये हलून गेलीं !
ज्र जू . भुजंगरावाच्या बाजूनें सहाजिकच ग्डभटाची साक्ष झाली. तिचा मतलब असा--
“ मींच भुजंगरावांचें लग्त रंगीबरोबर वेदिक पद्धतीनें लावलें. मीच आबासाहेब मोरे यांचा अनेक पिढ्यांचा उपाध्या आहें. माझ्या जोडीला भजंगरावांचे उपाध्ये धोंडभट होते. आबासाहेबांनीं शास्त्रोक्त कन्यादान केलें. रंगी आणि भुजंगराव यांचें लग्न एका दिवसांत नवीन पद्धतीनें आटोपलें. हें लग्न भुजंगरावांच्या गढींतील बंगल्यांत झालें --'
मध्येंच गुंडभटाला न्यायाधीशांनीं विचारलें---
“ क्षत्रियांच्या लग्नाच्या पद्धतीप्रमाणं दोन तीन दिवस विवाह- समारंभ चालतोना ? तर मग . हा लग्नाचा विधि तुम्ही अगदीं झटपट कां आवरला ?---'
““ /- “*-</५/८*६/*/५//५८/५६/५६/४५/१/ -“-“१ “४८५ ८४-८४ /*/%/१-/४/”१ ४/१ “ ४ २ टीक
सूड पेवला ! १२०७. गुडभटांनी उत्तर दिले,
“ साहेब, नवीन धमंनिर्णय' मंडळाच्या विधीप्रमाणं हें लग्न आम्ही झटपट आवरलं. आणि साहेब, आतां लोकांत मोठा समारंभ करायला त्राण राहिलाय' कुठं ? आणि आम्हांला हो काय' ! थोड्या वेळांत पुष्कळ प्राप्ति झालेली बरीच की ! --
भटजी सर्वांकडे पाहून गालांतल्या गालांत हसले. त्यांना वाटलें, न्यायाधिशांना आपण चोख उत्तर दिले !
पण उलटतपासणींत त्यांची उडालेली त्रेधा फार मजेची होती ! ती आम्ही पुढील अंकीं देणार आहोंत.
ई.../ .... 4 .....
गुडभटाच्या जबानीचा संभ्रम पत्रांतील उतारा वर दिला आहे. त्याच्या जोडीला त्याच पत्राच्या एका अंकांतील रखमाच्या जबानीचा 'संभम' पत्राने दिलेला रिपोटं वाचकांची करमगूक केल्याशिवाय राहाणार नाही. संभरमकार म्हणतात-
““ रखमाच्या साक्षींत तिनें पुष्कळ नव्या नव्या गोष्टी सांगितल्या. तिला भुजंगरावांच्या फसवे वकिलांनीं पुष्कळ अडविले. तेव्हां भर कोटांत वादीच्या बाजूच्या चकणे वकिलांचे आणि प्रतिवादीच्या बाजूच्या फसवे वकिलांचे एकसारखे खटके उडत ! त्यामुळे न्यायाधिशांना देखील हंसू येई, मग इतरांची कथा काय?
रखमा आपल्या साक्षींत म्हणाली-
“ सावळ्याचं आणि रंगीचं झालेलं लग्न मी पाहिलं आहे. एकमंकांच्या गळ्यांत माळा घालून तें लग्न खाशा या मराठा भटानं लावलं. तो कुठं गला माहीत नाहीं आम्हांला !
“ भुजंगरावाचं लग्न आम्हांला ठाऊक नाहीं. आमच्यांत लग्न एकदांच होतं. ग्डभट म्हणतो, तें साफ खोटं आहे, साहेब ! त्यांच्यांत दोन लग्न होत असतील ! त्याची बायको अलीकडे उठून गेली आहे, साहेब ! अश्यीच कोणाजवळ स्वयंपाक करण्यास राहाते ती ! लोक सांगतात, तो तिचा दुसरा नवरा आहे ! --”
ह्या वेळीं गुंडभट काळाठिक्कर पडला. त्याच्या बाजूच्या फसवे
१९८ साखेरे गोटी
“९.५१ “५ .४२./”१./”४./ ४. ४.” २.४ .&£” २.५४ ८१.४७. १ ५४१९ ४४४४०१.” /”९ »/” ९ ४ ९.५४. ९-/ %./ ४-४ ४.५” ९.५ ४..५४०”” ७../ ७.» »”
वकिलांनी तिला अडविण्याचा प्रयत्त चालविला. चकणे वकिलांनी तिची
साक्ष मुद्याला धरून चालली आहे, असें जोरानें सांगितलें. न्यायाधिशांनी
हरकत जुमानली नाहीं. त्यांनीं रखमाची जबानी पुढ चाल करण्यास फर्माविलें. रखमा मुळींच न धघाबरतां साक्ष देऊं लागली, ती म्हणाली--
“ आबा फार खोटा माणूस आहे! त्यानंच सावळय़ाच्या बापाचा खून केला. मला पक्क माहीत आहे हें ! रंगीचा भाऊ हिमतराव ह्यावर आबांच्या सांगण्यानं म्यांच आळ आणला ! म्यां खोटी साक्ष दिली साहेब ! आबांसारखा दुष्ट माणूस नाहीं! त्याच्यामुळं भुजंग्या फसला ! त्यानं ठार मारलं रंगीला ! साखर- गोटीचं भांडण असं पेटलं आणि त्यानंच रंगीला जाळलं साहेब ! याला आबांचाच दृष्टावा कारण साहेब ! --”
आणि काय सांगावें, रखमाला त्यानंतर आलेलें रड आवरेना. तिनें
पुष्कळ प्रयत्न केला, पण तिला एकसारखे हुंदके येऊं लागले. पुढे ती भर कोर्टांत आबांच्या नांवानें बोट मोडीत रडू लागली !
कोर्टाने तेथेंच तिची साक्ष पुरी केली. सर्वांची दृष्टि त्या वेळीं आबा
मोरे यांचेकडे गली ! ते खालीं मान घालून कोर्टात बसले होते. त्यांना वर दृष्टि करून लोकांकडे पांहाण्याचें धेय होत नव्हतें. मग रखमाकडे त्यांना नुंसंती नजर फेकणही शक्य नव्हतें !
आबा, भुजंगराव, सदोबा, गौराबाई वगरेंच्या जबान्या आणि त्यांच्या
उलटतपासण्या यांची हकोकत संभ्रम पत्रांत केव्हां येते, इकडे लोकांचें लक्ष लागून राहात असे. सध्यांच्या झटपट लग्नाच्या पद्धतीवरही लोक साधक बाधक चर्चा करीत. हिंदंंतील विवाहविधीची पद्धति सवंत्र एक असावी, असें ह्या केसकडे दुरून दुरूनच पाहाणारे लोकही म्हणं लागले !
ही दिवाणी केस न्यायालयापुढे सुमारें दोन वष चालली होती. ह्या
केसमध्ये रखमाचे सवं दागिने खलास झाले ! आबांचा खर्च भुजंगशावांनीं चालंविळा होंता. वास्तविक कांटकोर पद्धतीनें विचार केल्यांस त्यांची स्वत:चीं स्थावंर जंगम मिळकत होती तरी कोठे ?
ह्याच खटल्याच्या निकालांचा सारांश 'संभम' पत्रांत प्रेसिद्ध झाला.
3233832288. 8.0 क सकरलपेिशॉबिि१0िॅ0ि१ॅकिणा णी
सुंडं घेतला ! १२९
न्यायाधीशांनी आपला निर्णय विस्तृत दिला होता. पण येथें फक्त 'संभ्रम' 'पत्रांतील उतारा दिला आहे.
संभमकार म्हणतात---
“ दोनदां लग्न झाल्याची ही आंबंगांवची केस बरीच गाजली आहे. ह्या केसचा निकाल मात्र अपेक्षित असाच लागला. आणि रखमासारखी जहांबाज स्त्री कोर्टांत कांहींही बरळली, तरी न्यायाधीशांनीं त्यांतील नमकें सत्य शोधून निःपक्षपातानें हा निर्णय दिलेला आहे. ह्याबद्दल आपल्या तर्हेगांवचे विद्वान् न्यायाधीश स्तुतीस पात्र आहेत.--
न्यायाधीशांनी दिलेल्या निणयाचा सारांश आम्ही पुढे देत आहों--
“८ सावळ्या आणि रंगी यांचें पवित्र प्रेम लहानपणापासूनच घाढीस लागलेलें होतें. एकमेकांनीं एकमेकांच्या गळ्यांत माळा घालून विवाहविधि केल्याचा कोर्टापुढे पुरावा आलेला आहे. तो पुरावा कितपत विश्वसनीय आहे, हें पाहाण्यावूर्वी एवढ्या विधीनेंच लग्न- विधी पुरा होतो काय, हाही प्रश्न विचारांत घेतला पाहिजे. मोरे आणि देशमुख ह्या क्षत्रिय घराण्यांतील लग्नविधीप्रमाण हा विवाह झाला आहे, असें वादीच्या विद्वान् वकीलांनाही पुरेसे सिद्ध करितां आलें नाहीं. जर ह्या मुकदम्यांत सावळ्याची जबानी झाली असती, तर घादीच्या बाजूला कदाचित् अधिक बळकटी आली असती ! '
“« सावळ्या आणि रंगी ह्यांचें लग्न रजिस्टर पद्धतीनें झालें असतें, तर लग्नाच्या कायदेशीरपणाचा प्रश्नच नव्हता--
'* उलटपक्षीं भुजंगरावांशी विवाह झालाच नाहीं, असा पुरावा पुढें आलेला नाहीं. तो विवाह जबरदस्तीने झाला, असें म्हणण्यास 'पुरेसा पुरावा नाहीं. वधूच्या मेंदूंत विकृति झाल्याची साक्ष सरकारी डॉक्टरांची असल्यामुळें वधूची कोणालाही करुणा येत असली, तरी तिचा कायद्याच्या दृष्टीनें उपयोग नाहीं.
': आबा आणि गौराबाई शपथेवर कन्यादान केल्याचे सांगतात. भुजंगराव तर म्हणतात, वधूने आनंदानें आपल्या गळ्यांत माळ "घातली. ! --
“ गुंडभटाच्या चारित्र्याशीं आम्हांला येथें सध्यां कर्तव्य नाहीं. ते
पा पाप - - -:-> :----<> ४ ----.५प-८८-- पणणणापा पी? ण)ीणी 00 टशटशण0ण णी र
| ण )टी १३० साखर गोटा
आणि धोंडभट ह्यांनीं दोन्ही घराण्यांत परंपरेने चालत आलेल्या वेदिक पद्धतीनें पण नव्या धमनिर्णय मंडळाच्या योजनेप्रमाणे हा विवाह झटपट उरकला असें सांगितले...... .. री
“खुद्द फिर्यादीच्या बाजूचे सदोबाच नुसत्या माळा घालून लग्न लावण्याची आमच्यांत चाल नाही, असं सांगतात...... र
“ह्या सवव पुराव्याचा विचार करितां मी रंगीचा भजंगरावाशी झालेला विवाह कायदेशीर ठरवितो.”
“पण ह्या वेळी मला माझे विचारपूवंक बनलेलें मत नमूद करून ठेवणे इष्ट वाटतें, तें असें कीं--
“ पूर्वी दोन तीन दिवस विवाहसमारंभ चालत असल्यामुळे त्याचा गाजावाजा भरपूर होऊन, असें लग्न जगजाहीर' होत असे. सध्यांच्या' कोणत्याही स्वरूपाच्या झटपट विवाहपद्धतीमुळे लग्न जगजाहीर होण्यास अवसरच मिळत नाही. त्यामुळें सध्यांच्या केसेससारख्या केसेस कोर्टापुढे येण्याचा जास्त संभव आहे---?”
“ म्हणून कोणाचेंही लग्न झालें की, त्याची नोंद लागलींच सरकारदप्तरीं होण्याची कांहीं तरी योजना कायद्यानें ठरविण्यांत आली पाहिजे. तसें झाल्यास पुराव्याच्या दृष्टीनें ते हितकारी होईल --?”
ह्या खटल्याचा निकाल पुण्यामुंबईच्या वतंमानपत्रांत फार गाजला.
कारण ह्या खटल्यांत गुप्तपणं गुन्हे करणार्या टोळींतील तरुणांचा संबंध असल्यामुळे ह्याला त्या वतं मानपत्रांनीं महत्त्व दिलें. नाहीं तर खड्यापाड्यां-. तील लोकांच्या जीवनांत घडून येणार्या क्रांतिकारक प्रकारांचाही उल्लेख करणें ह्या संपादकांच्या जिवावर येत असे !
ह्या खटल्याचा संभ्मम पत्रांत आलेला निकाल लोकांना वाचून दाख-
वीत असतांना मगनशेठ म्हणाले-- “ जरा आणखी थोडे रुपय रखमानें खर्च केले असते, तर आपल्यासारखा निकाल झाला असता ! आतां अपिलांत काय करायचें तें पाहुं --?
मगनशेठच्या मनांत रखमाला आणखी भरीस घालून तिला किती बुडवावयाचें होतें कोणास ठाऊक ? भांडवलशाही मनोवृत्तीचा खेड्यां- पाड्यांतील मासला हा असा दिसून येतो खरा ! *
*-.---५-*ा*-“ााणापा पापा "शाप ९ टकल ८ --ाशप*-पणणा--८५- ८८ णा --* -> --:-ना-ा
सड पेवला ! १३९
न“ ८४८१४ ४८५८१५ ४८५६ २ ५८५ ५८५५ २५८९/५/४/१ /५/४६ १२-८९ २८५ 7: > > २८१५६५ ०: 5 क र: “४२८ “५ 7४-५९ ५ “४/४४/४४/४ * “५८५८५८५ 7५५ *८४-४८४५४४४५-*/१/५ ४४४" ९९१ १७
मंबईच्या एका क्रांतिवादी पत्राला तर हा खटला म्हणज भांडवल- शाहीनें सामाजिक बाबतीतही खड्यापाड्यांत घातलेला धुमाकळच होय' असें वाटलें. त्या पत्राने आणखी असेंही म्हटलें होतें कीं,
“ सावळ्यासारख्या क्रांतिवादी तरुणाला भांड॑वलशाहीनें उघड उघड दिलेले हें आव्हानच होय --
वास्तेविक ह्या खटल्याच्या मुळाशी क्रांति वगरे कांहीं नव्हतें. साखर- गोटीच्या क्षूल्लक वादांतून निर्माण झालेले, रंगीच्या आयुष्याचा सत्यानाश करणारें हें एक जहरी विष होतें.
तें विष रंगीचा आणि सावळ्याचा दोघांचाही एकदम नाश करीत होतें. रंगी तर शय्येवर खितपत पडली होतीच. सावळ्या मोकळा होता ! तऱ्हेगांव भागांतील दंगेधोपे चालळेच होते ! दूरदूरच्या ठिकाणीं तर गंडांनी' फार धुमाकूळ घातला होता ! पानगांव येथील पोलिस ठाण्यामुळे भुजंगराव निर्धास्त होते. अशा स्थितीत पुण्याच्या एका लोकप्रिय देनिक वतंमानपत्रांत खटल्याच्या निकालानंतर सुमारें आठ दिवसांनीं पुढील हकीकत प्रसिद्ध झाली. त्यामुळे सावळ्यावरील संकट मात्र वाढलें !
सूड घेतला !
आंबंगांवच्या रंगी आणि सावळ्या यांच्या लग्नाच्या केसची कुतुहल- जनक हकीकत देऊन थोडेच' दिवस झाले. त्यानंतर एके दिवशीं रात्रीं आंबेंगांवीं एक भयंकर कृत्य घडून आलें. त्याची बातमी आमच्या बातमी- दारानें पाठविली आहे. ती जशीच्या तशीच पुढे दिली आहे--
“ लग्नाचा मुकदमा जिकल्यामुळे भुजंगरावांना आनंद होणें सहाजिक होतें. त्याबद्दल त्यांचा सत्कारही त्यांच्या चहात्यांनीं कांहीं ठिकाणीं केला, त्यांना मेजवानीकरितां दोन दिवसांपूर्वी आबा मोरे यांनीं आंबेगांवीं मुहाम बोलाविले होतें.
“रात्रीं बारा वाजल्यानंतर आबा, गुंडभट आणि भुजंगराव हे वत्रिवगं आबांच्या घरीं सुंदर मद्याचा आस्वाद घंत मजेत बसले होते ! ”
“ इतक्यांत गांवांत चोहोंकडे दगडांचा वर्षाव सुरू झाला! बंदुकींच्या फेरी झडूं लागल्या ! आबा मोरे यांच्या घरावर गुंडांनी हल्ला'
११२ सासर गोटी
४८४५१ ५८ “४” शनी “८५४4श४2४0५” “५ “५५/%४५/१४४- ४ ४/१ 0 ४४% 2५ हट पटी 2४श/८ ४ 0 शोध ५८४४
केला ! त्या गुंडांनी कांहीं पदार्थ सक्तीने हुंगावयास लावून, ह्या त्रिवर्गांना बेशुद्ध केलें! ” “ भर चांदण्या रात्रीं त्यांना गांवापासून दूर अंतरावरील माळरानांत नेलें. तेथ त्यांना खरपूस मुका मार दिला आणि त्यांचीं नाके कापून घेतलीं ! “ ह्या भयंकर कृत्यामुळे आंबंगांवच्या बाजूचे लोक हवालदिल होऊन गेले आहेत ! --" “ हा सूड सावळ्यानेंच घेतला असंला पाहिजे, असें लोक बोलत'
| 084
आहेत जॅ र; र. सावळयाचा तपास आतां पोलिस अत्यंत चिकाटीने आणि सावधपणे करूं लागले. रंगी, रखमा नि सदोबा ह्य़ांना ते सारख सतावीत होते! रंगी डोळे मिटून घेऊन परमेश्वराला आळवीत असे-- “ देवा, अश्या यातना तू किती दिवस देणार ? कसंही करून सावळथाचं मला एकदां दर्शन करून दे, मग ह्या अभागी मुलीचे डोळे मिटीव --”
भयेकर बातमी ! शद
स म का लकडा आ सा लाच **००४ ४७४७ ७.” ४४५० १.७ ००” ५०2००८ य४०यस्य्आय्शरय>रा्र
गी देवाची प्राथना करीत होती. जिवाला कंटाळल्यानें तिची ती निर्वाणीची प्राथना होती. कोटंकचेर्यांतून झालेल्या विटंबनमुळें
ती जिवाला अत्यंत कंटाळली होती !
तिच्यासारखी खेळकर आणि आनंदी पोर उभ्या आंबंगांवांत तर नव्हतीच, पण जवळपासच्या पांच पन्नास गांवांत तशी आढळेल, अशी कोणाला खात्री देतां आली नसती.
पण लहानपणापासूनच तिच्यावर एकामागून एक सारख्या आपत्ति येण्यास सुरुवात झाली होती !
तिचे आईबाप तिच्या बालपणांतच वारले होते, त्यामुळें त्यांची आठवण तिला झाली, तरी ते तिच्या डोळ्यांपुढ उभे राहात नव्हते! तीच गोष्ट तिचे वडील बंध हिंमतराव यांची. ती वयानें चार पांच वर्षांची होती, त्या वेळेपासूनच त्यांचा पत्ता नव्हता ! अशा प्रकारें अगदीं लहान वयांत*च खऱया प्रेमाच्या माणसांना ती पारखी झाली होती !
लहानपणापासून रंगीचा बराच वेळ मळ्यांत जात असे. तेथ साव- ळ्याची मामी रखमा हिच्या मार्ग माग ती नेहमीं असे. रखमा ही रंगीवर अगदीं आपल्या मुलीप्रमाणे प्रेम करी !
सावळ्या तर रंगीचा लहानपणापासूनचा खळगडी होता. त्या दोघांचें रूप आणि स्वभाव ह्याचा मेळ उत्कृष्ट बसला होता, म्हणून तर त्यांचें युढ प्रेमही जमलें !
रंगी आणि सावळ्या ह्यांचे हें प्रम अगदीं स्वाभाविक होतें. त्यांत कसलाही कृत्रिमपणा नव्हता !
ककटकनणीण 00 शाली शण 0000 नाडा य, आक सक कक ह कक. क ७ क क
१३४ साखर गोटी
“४५८४-०५
रंगीला असल्या दुःखद स्थितींतही गतकालाची वरचेवर आठवण होई, निदान सावळ्याची अखरची भट झाल्याशिवाय आपला प्राण जाऊं नये, असें तिला वाटं ! एके दिवशीं मोठ्या पाहाटस ती जागी झाली. त्यानंतर तिला कांहीं केल्या झोंप येईना. त्या वेळीं तिच्या मन:चक्षंपुढे किती तरी गतकालची चित्रे येऊं लागलीं !
“ एकदां सावळ्या मोट हाणीत होता, उंसाला पाणी पाजावयाचें होतें. पण त्याला चावडींत बोलावणे आलें. तो गेल्यावर आपण त्याची मोट चाल- विली व रखमाने उंसास पाणी लावलें. तो परत आल्यावर आपल्या पाठीवर चापटी मारून त्यानें आपण केलेल्या कामाबद्दल आपलें कोतुक केल्याची 'तिला आठवण झाली.” |
त्या वेळीं तिचें अंग थरारलें !
“ ज्वारीची ख॒रपणी दोघ जोडीजोडीनें करोत असतां, आपल्या हातांतील बोटांत कांटा बोंचला. सावळ्यानें तो झटकन् ओढन काढला ! बोटांतून भळभळ रक्त येऊं लागलें ! पण तें थांबविण्याकरितां नको नको म्हणत असतां तें माझे बोटच त्यानें तोंडांत घातलें.
ही आठवण झाल्याबरोबर तिचे डोळे भरून आले.
“ सावळ्या आपली झोंपडी बांधीत असतां आपण त्याला मदत करीत होतों. त्याच्या पायाला कुऱ्हाड लागून रक्त येऊं लागले. आपण आपल्या लुगड्याचा पदर झटकन फाडून त्याच्या पायास बांधला. त्या वेळीं त्यानें लाडक्या रागाने आपल्याकडे पाहिल्याची गोड आठवण तिला झाली--”
'““ तो पदर फाडल्याबद्दहद आबा आपणास नाहीं नाही, तें बोलले ! तेव्हां मळ्यांत आल्यावर माझ्याकडे पाहून सावळ्या म्हणाला--
“ कशी एका माणसाची खोड मोडली --'
माझा चेहरा उतरला. त्याबरोबर सावळ्यानें आपल्याला जवळ ओढून घेऊन आपल्या तोंडावरून हात फिरवीत म्हटलें होतें--
“ रंगे, हेही दिवस जातील ! वाईट वाटून घेऊं नकोस! अग, तुला असली छप्पन लुगडीं घेईन मी ! --”
ही आठवण झाल्याबरोबर एकदम तिचें हृदय भरून आलें; आणि
अयंकर बातमी ! १३१५
“४५५५५४१९०५ ४ ५५/१५/१४७४ /९./. “१...
'ती “सावळ्या ! सावळ्या ! ' असें तोंडाने पुटपुटं लागली. तो भेटावा, अशी तिला फारच उत्कंठा लागून राहिली !
पुन्हा सावळयाकरितां ती ईश्वराची प्राथंना करूं लागली. ईश्वराचे भक्त कांहीं म्हणोत, पण सगळ्याच प्राथना कांहीं त्याच्या कानांवर जात नसाव्यात, असें तिला वाटूं लागलें. कारण आपल्यासारख्या अनाथ अबलेच्या हाका त्याला एंक जात नाहींत.
मग आपल्यापेक्षा दु:खी हृदयाचे कोणी असतील, त्यांच्याकडे कदाचित् त्याला जावें लागलें असेल. तेव्हां आपल्या दु:खांत आणखी जर भर पडली, तर परमेदवराचें चित्त आपल्याकडे वेधेल, असेंही तिला त्या वेळीं वाटले, खरें !
पुढें जे कांहीं घडून येतें, त्या'चीं पूर्वंचिन्हें मनापुढे अंधुक अंधुक येऊं लागतात, अशीच स्थिति तर रंगीच्या मनाची झाली नसेलना !
अद्यापि सूय दिय होण्यास अवकाश होता. म्हणून ती पुन्हा बिछान्यावर कलंडली.
रंगी चांगली आठ वाजण्याच्या सुमारास जागी झाली. तों तिला आकाशांत सकाळींच गडगडाट होत असल्याचें ऐकं आलें ! अशी स्थिति 'फार क्वचित् होते. पण त्या दिवशीं आंबंगांवीं घडून आली खरी !
रखमा व सदोबा शतकामाला लागले होते. रंगी हलकेंच झोंपडी बाहेर य्रेऊन तोंड धत होती.
इतक्यांत भुजंगराव, आबा आणि इतर दोघे तिघे तेथें अकस्मात आले !
रंगी झटकन झोंपडींत जाऊन खाटेवर पडली आणि तिनें डोक्यावर पांघरूण ओढन घेतलें.
भुजंगराव व आबा हे दोघे त्यांच्यावर गुंडांनीं हल्ला केल्यापासून अत्यंत -चिडले होते. त्यांनीं मिरजेच्या दवाखान्यांतून आपलीं नाकें जुजबी नवीं बनव न घेतलीं असलीं, तरी झालेला अपमान त्यांना असह्य होऊन गेला होता ! लग्नाच्या दाव्यांत आपण विजयी झाल्यानें हा आपला सूड साव- ळ्यानेंच घेतला असला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली होती !
लोकही काय, सावळ्या, मन्या, खाशा वगरेंना आपण डोळ्यांनी पाहिल्याची गृप्त वर्दी भुजंगरावांच्या कानांवर घालीतच असत !
.2---“-:----८--८ “८०५८-०४-५१
९३६ साखर मोडी अर्थात् सावळ्याचा सूड घेण्याकरितां वाटल तें करण्याचें भुजंगरावांनीं ठरविलें असल्यास त्यांत नवल नाहीं!
भाणि खरोखर गडांच्या चळवळीसही पुन्हा जोर चढला होता ! आत्तां कित्येक ठिकाणीं बंडखोरांना वचक बसावा, म्हणून गोळीबारही होत होता ! पण सावळ्या किवा त्याच्या टोळीपेकीं प्रमुख माणूस अद्यापि सांपडला नव्हता !
सावळथयास पकडून देणारास एक हजार रुपयांचें बक्षिसही सरकारनें लावले होतें! त्या बक्षिसांत भुजंगरावांनीं स्वतःच्या आणखी हजार रुप- यांची भर घालून बक्षिसाची रक्कम दोन हजारांपर्यंत वाढवन घतली होती !
तरीही पण सावळ्याचा पत्ता लागत नव्हता !
रंगी आंबंगांवीं असल्यानें सावळ्या तिच्याकडे येण्याचा संभव आहे, म्हणून तिला पोलिस मधून मधून छडीत, पण त्यांत त्यांची निराशा होई !
भुजंगरावांना वाटले, रंगीला अश्शी मोकळी ठेवण्यापेक्षा जर पानगांवीं डांबून ठेवली, तर तिकडे कदाचित् सावळ्या तिला सोडविण्याकरितां येईल, मग तेथे अगदीं बिनतोड रचून ठेवलेल्या जाळ्यांत त्यास पकडतां येईल !
म्हणून भुजंगराव रंगीला पानगांवीं नण्याकरितां त्या दिवशी सावळयाच्या झोंपडीकडे आले होते.
लग्नाच्या दाव्याचा निकाल भुजंगरावांसारखा झाल्यानें त्यांच्या आतांच्या विचारास कोणाला विरोध करितां येण्यासारखा नव्हता !
आबा हे रंगीचे कायदेशीर पालक होतेच. म्हणून त्यांना घेऊन भुजंगराव तेथं आले होते.
भुजंगराव तेथे आले नाहींत, तोंच रंगीच्या प्रवासाची सारी जय्यत तयारी तेथें येऊन दाखल झाली !
भुजंगरावांचा तेथे येण्याचा उद्देश आबांनीं रंगीच्या कानांवर घातला.
लग्न झालेल्या मुलीनें सासरीं गेलें पाहिजे, असेंही आबांनीं तिला फर्माविलें !
रंगीचे शरीर धास्तीने खालीं वर होऊं लागले ! तिचा प्राण कंठाशी आला !
असामात
मर्यकर बातमी ! १३०७
< 0१५५४" / ४.” २-४" ८.१४.” ७.» ७.” ७५/ ५.” ७/% *२/४- नश १-४ ४.४ ४. च
कोणाच्याही बोलण्यास रंगी हुं का चं करीना. मग तिच्या तोंडून उत्तर कसलें निघतें ?
हें पाहून भुजंगराव चिडले आणि म्हणाले--
“ वूर्वी तुम्ही रवमाबरोबर पळून आला. मी तुमची गय केली त्या वेळीं ! पण आतां मात्र मी कोणाचं कांही एकणार नाहीं! माझी बायको अश्या वनवासांत मी राहूं देणार नाहीं ! मला तिला पानगांवीं नेलीच पाहिजे ! ”
आतां मात्र रंगीला राहावेना. ती अत्यंत क्रुद्ध झाली. तशाही अशक्त स्थितींत ती ताडकन उठून बसली. तिचे डोळे खदिरांगारासारखे लाल दिसत होते ! तिचे अस्ताव्यस्त केस तिच्या चेहर्याला भसूरपणा आणीत होते ! मात्र तिची रुक्ष, रोडकी. शरीरयष्टी कित्येक दिवस निरशन करून तपश्चर्या करणार्या योगिनीप्रमाण भासत होती !
अशा योगिनीच्या तोंडून गापवाणी बाहेर पडावी, त्याप्रमाण ती त्वेषाने उदगारली !
“ माझ्या ह्या जागंत कोण आलं आहे, मला माहीत नाहीं! हें माझं घर आहे! सावळ्याचं घर आहे ! करा तोंड काळं येथून ! --'
“त कोणाशीं बोलत आहेस समजलीस ? मी हक्कानं तुला येथून उचलून नेणार ! कोण मला आडवितो, तें पाहु! --'
भजंगराव गरजले.
“मी येथन जिवंत घराबाहेर पडणार नाहीं! जीभ हासडून प्राण देईन मी ! --''
रंगीनें अत्यंत त्वेषाने हे गब्द उच्चारले. तिला त्यामुळे भयंकर थकवा आला. आणि ती धाडकन बिछान्यावर पडली !
आबांचेंही धाबे दणाणले. त्यांनी भुजंगरावांना मागे ओढलें. तेथें आबा आणि भुजंगराव याच्या बाजूचे पुष्कळ लोकही जमले. रखमा तेथ नव्हती. ती दोतांत काम करीत होती. इतके लोक आपल्या घराकडे जमले आहेत, हें तिच्या नजरेस दुरून आल्याबरोबर ती धांवतच तेथें आली !
तिला प्रथम झोंपडीबाहेर उभे असलेले आबाच दिसले ! तिनें त्यांच्या- कडे भेदक नजरेनें पाहिलें आणि बिकट हास्य केलें !
त्या वेळीं आबांनीं खालीं मान घातली. र
१३८ साखर गोटी
_ रखमाला तेथील तंट्याचें स्वरूप अजमाविण्यास वेळ लागला नाही. ती त्या लोकांच्या घोळक्यांतून झटक्यानें झोंपडींत शिरली. रंगीच्या खाटं- जवळ उभी राहिली आणि जहरी नजरेनें भुजंगरावांकडं पाहात बोलली---
“कोण हिला नंतय बघूं या! मी खरी नागीण आहे, हें त्यानं जाणून असावं ! विषाची परीक्षा आणखी पाहूं नर्ये ! --" |
ह्या जहांबाज स्त्रीच्या तोंडीं लागण्यांत अथ नाहीं, असें भुजंगरावांना प्रथम वाटलें खरें. पण त्यांच्या समजतीप्रमाणे त्यांच्यावर सावळ्यानें जो वर्मी घाव घातला होता, त्यामुळे त्यांच्या अत्यत भडकलेल्या क्रोधापुढ विचाराचें कांहीं चालेना. ते रखमातस कृत्सित स्वरांत म्हणाले,
“ रखमे, मी उगीच बसलो म्हणून इतकी बहकं नकोस तं! पान- गांवाइून तू हिला चोरून आणलीस ! केवढा गुन्हा केला हतास, ठाऊक आहे ?”
ह्या भुजंगरावांच्या बोळण्यारने चिडून रखमा दांतओठ खात म्हणाली,
“तू चोर कामी चोर हे जग सांगल ! रगीला तूच ठार केलीस ! तुला अब्रूचीही वि.मत नाही !' घड्या पायानं निघून जा कसा ! --
रखभाच्या ह्या बालण्यानें भ॒जगराव वरमळे. आबांनी वे.व्हांच माग पाय घेतला होता. इतकया थराला ही गोप्ट यायळा नको होती, असें त्यांना वाटलें. |
आतां ह्या पचांतून कसे बाहेर पडावे, ह्याचा जो तो विचार करू लागला. | य
दतक्यांत तेथे आलेत्या मगनशेठच्या डोबयांत एक कल्पना आली आणि ते म्हणाले--
“ भुजंगराव, सातारा कोट!त अपील चाललें आहे रंगीच्या लग्नाच्या दाव्य़ाचें ! त्याचा निकाल लागत्यावर मग काय करायचं तें तुम्ही करा ! आजच कां वाद घालतां ? -- '
आतां भुजंगरावांच्या डोक्यांत लख्ख प्रकाश पडला. तरी ह्या वादांत आपण अगदीच हेरलों नाही, हे दाखविप्याकरितां भुजंगराव म्हणाले,
: “बरंबरं! हा घरांत तुम्ही कसं राहातां, हें पाहून घेईन मी ह्या बोलण्यामुळे तेथे आपलें हातचे काम टाकून आलेल्या सदोबांनाही उदी 5 ऱ्कानिसे नारमे आणि ते म्टणाले-->
| 0804
अयेकर बातमी ! १३९
“ सावळ्याची जमीन मो केली आहे. त्याने मला ती लागणीस दिली आहे. माझ्या ताब्यांत झोंपडी आहे ही --” |
त्याला हिणविण्याच्या हेतूने भजंगराव जातां जातां. वांकडी मान करून म्हणाले-- |
“बरं, बरं, वारकऱ्या ! तुला काय कळतंय' ; तं तर बाईल बुद्धीचा खरा !--'
सेदोबाला राग कसला तो माहीत नव्हता, तरीहो ते थोडे रागावले; आणि त्यांनी तुकारामाच्या अभगाचा एक चरण भुजगराव व आबा यांच्या- कड पाहात पाहात म्हटला.
भुंकत ती) द्यावी मुका । भापण त्याचे नये शिको ॥ जू ज्र श्र |
ह्यानंतर एक आठवडा भेळा नाहीं, तच सावळ्यांचा जमीनजुमला, धरदार, सारें कांहीं सरकारनें जप्त केल्याची दवडी गांववगमगारांनी नावभर पिटविळी. त्यामुळे साऱ्या आंबेंगांवावर विलक्षण दरारा वसला ! भूजंग- रावांच्या खटपटीनें ही गोप्ट घडून जाळी असावी, अस जो तो म्हण लार ला.
लोक इतक्रे भयभीत होऊन गळे को, सावळ्याली आपला दूरचा कसला का सबध आहे, असें सरकारच्या कानी गळे, तर आपलीही तीच गत होईल; आपला जमीनजुमला जप्त होईल; आपली अन्नान्न दगा होईल. म्हणून जो तो रंगी, रखमा आणि सदोबा यांच्यापासून चार चार पावलें दूर राहूं लागला.
लोकांना माणुसकीपेक्षां वित्तारचें महत्व कांहीं कांही वेळां अधिक वाटतें. ह्याचें कारण तें असलें, तरचे दुपारची वेळ निभावते. तें नसेल तर जीव देखील जगू शकत नाहीं!
सावळ्याच्या घरांतील सर्वे चीजवरत जप्त झाळी ! त्याच्या मळ्यां- तीळ झोंपडींत असलेल्या वस्तूंचीही तीच गत झाली !
आपल्याला आपल्या घरांत देखील कोगीं सुखानें म€ देत नाहीं. ह्याचें "रंगीला अतिशय वाईट वाटलें. 'पण करते काय बिचारी !
९४० साखर गोटी
५.९-४४४४४४ ४४१५१५४५१५ -“ * ह४€४-/५४/४५/"-/४”४/* “४५/१८/४४४४
तिचीं भांडींकुडीं गलीं ! सामानसुमान गले! तिच्या खाटेवर देखील जप्त होण्याची पाळी आली ! आतां मात्र तिच्यावर संकटांचा कहर झाला !
ती अतिशय विचारी होती. पण आतां तिच्या मदूचा तोल सुटू लागला ! ती हट्टास पेटली ! ती खाटंवरून उठंना ! आपलें घर ती सोडीना ! आपल्याला फरफटत बाहेर ओढून काढावें, आपले प्रेतच बाहेर न्यावें, असा तिनें अवरचा आग्रह धरिला ! ती घट्ट डोळे मिटून पडली !
रखमानें पुष्कळ सांगितले, सदोबानेंही तिला पुष्कळ विनविलें, पण तिचा हट्ट कमी होईना !
आसुरी मार्ग योजावे लागले, तरी हरकत नाही; कायद्याचा मान राखला गेलाच पाहिज, असें जप्तीस आलेल्या अधिकार्याचे मत होतें. त्यांनीं त्या आग्रही स्त्रीच्या वाटस न जातां दुसराच निर्वाणीचा मार्ग चोखाळ- ण्यास सुरुवात केली !
त्यांनीं ती झोंपडी म्हणा किवा तें घर म्हणा उध्वस्त करण्याचें ठरविलें. घराचें छप्पर उघड झालें. भिती पडल्या. आतां मात्र रखमास राहावेना.
तिनें रंगीस उचलले. तिच्या विरोधास न जुमानतां तिनें तिला आपल्या पाठकुळीस बांधलें.
रखमानें जवळच असलेल्या आपल्या शेतातील झोंपडींत तिला नलें. तेथे तिला खाटवर निजविलें.
सावळ्याच्या झोंपडींतच--त्याच्या घरांतच--आपला प्राण गेला पाहिज, अशी रंगीची इच्छा अशा प्रकारें रसातळास गेली !
तिनें दोन दिवस डोळे उघडले नाहींत ! अन्नास स्पर्श केला नाही ! ती सावळ्याचें चिंतन करीत होती ! मृत्यूची वाट पाहात होती !
पण मरण येण ही गोप्ट कोणाच्या हातची थोडीच आहे ? दोन दिव- सांनीं रखमानें प्रमाने पाजलेला गाईच्या दुधाचा घोट तिला घ्यावाच लागला !
त्या वेळीं ती रखमाच्या मांडीवर लहान बालकाप्रमाणे किती वेळ तरी पडून होती.
तिच्या मस्तकावर रखमाचा अश्रूचा अभिषक चालला होता.
पयायी ककळकककतकक्र्सकणाशशणाणती0शी ती 000000णणशनाक्कळळकक्य ट्या कक टनार--->----22-- ------4>-_-----------<-ा > >-->>--2->->2-_०-2 1220720
भर्यकर बातमी! १४१
"७४७७४७४५४४ ४५0९ “४५१४९
संकट किवा दु:ख येऊं लागलीं कीं, त्यांची एकामागन एक रांगच लागते ! रंगीच्या पाठीमागे दुःख हात धुवून लागलें होतें !
रखमाच्या झोंपडींत तिला कांहीं दिवसांनीं थोड बरें वाट्ं लागले. सदोबांनीं आपली झोंपडी घरासारखी मोठी केली. त्यांनीं गांवांतील आपला सारा पसारा तेथेंच आणला. जनावरांचा मोठा गोठा तेथेंच बांधला.
त्यांनाही पण त्या ठिकाणीं बरें वाटूं